शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ ‘आयटक’ची रत्नागिरीत जनजागरण यात्रा

By मेहरून नाकाडे | Updated: November 21, 2023 19:05 IST

कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा

रत्नागिरी : केंद्र व राज्य सरकारच्या वाढत्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विरोधात आयटकच्या महाराष्ट्र राज्य काैन्सिलतर्फे दि. २० नोव्हेंबर ते दि. १८ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरात मंगळवारी (दि. २१ रोजी) जनजागरण यात्रा काढण्यात आली. भर दुपारी जिल्हा परिषद भवन येथून निघालेली जनजागरण यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागरण यात्रा आलेनंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी महाराष्ट्र स्टेट वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष काॅ. सल्लाउद्दीन नाकाडे, राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक लाड, काैन्सिल सदस्य राम भाटकर, वर्कस फेडरेशनचे सचिव महेश डिंगणकर यांनी जनजागरण यात्रेचे नेतृत्व केले व सभेत मार्गदर्शन केले.कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करत केंद्र सरकारचे राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खासगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घ्यावे. विविध विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करून आठ तासाच्या कामांसाठी दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन निश्चित करा यासह अनेक मागण्यांचा या यात्रेत समावेश करण्यात आला आहे. या मागण्या जनजागरण यात्रेच्या निमित्ताने राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांतर्फे शासनाकडे करण्यात येणार आहेत. या मागण्यांची शासनाने तातडीने पूर्तता करण्याची मागणी आयटक तर्फे करण्यात आली आहे.मागण्यांची पूर्तता न केल्यास सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी, जनविरोधी व देश विरोधी धोरणाच्या विरोधात राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर तीव्र स्वरूपाचे प्रदीर्घ आंदोलन छेडण्याचा इशारा आयटक संघटनेतर्फे यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकार