शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जनआशीर्वाद यात्रा आज राजापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

राजापूर : केेंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनआशीर्वाद यात्रा २७ आगॅस्ट रोजी राजापुरात दाखल होत आहे. ...

राजापूर : केेंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनआशीर्वाद यात्रा २७ आगॅस्ट रोजी राजापुरात दाखल होत आहे. सायंकाळी ४.२५ वाजता ही जनआशीर्वाद यात्रा राजापुरात येणार आहे. राजापूर एस. टी. डेपोसमोरील जैतापकर बिल्डर्स प्रांगणात या नारायण राणे यांचे व जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत होणार आहे. ही माहिती भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली आहे. नारायण राणे राजापुरात येणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

२७ ऑगस्टपासून पुन्हा ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. रत्नागिरी, हातखंबा, पाली आणि लांजानंतर यात्रा सायंकाळी ४.२५ वाजता राजापुरात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे. राजापुरात एस. टी. डेपोसमोरील जैतापकर बिल्डर्स प्रांगणात यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मंत्री राणे यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर राजापुरातील रिफायनरी समर्थक संघटनांसह विविध सामाजिक संघटना राणे यांची भेट घेणार आहेत. या संघटनांशी राणे संवाद साधणार आहेत. त्यानंतर राणे मार्गदर्शन करणार आहेत. राणे व या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व राजापूरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजित गुरव यांनी केले आहे.