शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्पविरोधी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : ‘अणुऊर्जा हटाओ.. कोकण बचाओ.. समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मच्छी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची..’ अशा घोषणा देत मच्छिमार व प्रकल्पविरोधकांनी जेलभरो आंदोलनात स्वत:ला अटक करवून घेतली. यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह सुमारे ७०० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.आंदोलनाची सुरूवात साखरीनाटेतून सकाळी १०.३० च्या सुमारास करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : ‘अणुऊर्जा हटाओ.. कोकण बचाओ.. समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मच्छी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची..’ अशा घोषणा देत मच्छिमार व प्रकल्पविरोधकांनी जेलभरो आंदोलनात स्वत:ला अटक करवून घेतली. यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह सुमारे ७०० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.आंदोलनाची सुरूवात साखरीनाटेतून सकाळी १०.३० च्या सुमारास करण्यात आली. सुरूवातीला आंदोलनात बळी पडलेल्या तबरेज सायेकर या मच्छिमार बांधवाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी गगनभेदी घोषणा देत आंदोलनाला सुरूवात झाली. सुमारे चार ते पाच किलोमीटरचे अंतर कापत आंदोलक प्रकल्पस्थळाच्या दिशेने कुच करीत होते. मात्र, माडबनच्या सड्यावर पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना अडविल्याने तेथेच प्रकल्पग्रस्तांनी ‘कॉर्नर सभा’ घेतली.या सभेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शासनावर कडाडून टीका केली. येथील जनतेला प्रकल्प नको असतानाही तो लादण्याचे कारस्थान शासन करीत आहे. आंदोलकांना घाबरविण्यासाठी पोलीस बळाचा वापर, आंदोलकांवर खोट्या केसेस टाकणे, असे प्रकार शासन करीत आहे. मात्र येथील मच्छिमार बांधवांनी (पान १ वरून) आपली एकजूट कायम ठेवली आहे. याचे कारण म्हणजे हे आंदोलन पैशासाठी नाही तर अस्तित्वासाठी आहे, याची जाणीव मच्छीमार बांधवांना आहे. महाराष्ट्रात वीजेची कमतरता नाही. शिवाय सौरऊर्जा, समुद्राच्या लाटेवर ऊर्जा निर्मितीचे पर्याय असताना समुद्रामध्ये अणुऊर्जेचे विष टाकून आम्हा सर्वांना नष्ट करण्याचा कुटील डाव आखत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.यावेळी आमदार साळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात येथील जनतेने सुरूवातीपासून विरोध दर्शविला आहे. वेळोवेळी आंदोलने करून शासनाला ताकद दाखवून दिली आहे. याचाच परिणाम म्हणून आज प्रकल्पाचे काम ठप्प आहे. हा तुम्हा सर्वांचा विजय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनीही प्रकल्पविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.यावेळी जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिपक नागले, राजापूर सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख प्रकाश गुरव, तात्या सरवणकर, विभागप्रमुख सुनिल राणे, राजा काजवे, नरेश दुधवडकर, जिल्हा परिषद सदस्या भारती सरवणकर, सोनम बावकर, लक्ष्मी शिवलकर, पंचायत समिती उपसभापती अश्विनी शिवणेकर, नगरसेवक सौरभ खडपे, उमेश पराडकर, संतोष हातणकर, पद्मजा मांजरेकर, मन्सूर सोलकर, मंगेश चव्हाण यांच्यासह मच्छिमार बांधव व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान या कॉर्नर सभेनंतर प्रकल्पविरोधक स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. आमदार साळवी यांच्यासह तब्बल ७०० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तब्बल २० एसटी गाड्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना घेऊन साखर विद्यालयात आणण्यात आले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून आंदोलकांना सोडून देण्यात आले.मच्छिमारी बंद...साखरीनाटेतील मच्छिमार बांधवांनी आपल्या मच्छिमारी बोटी बंद ठेवत आपला उत्स्फुर्त सहभाग दर्शविला होता. तसेच साखरीनाटेतील बाजारपेठेतही शुकशुकाट होता.आमदार साळवींनाही अटकयावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या सेना पदाधिकाºयांनीही अटक करून घेतली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेºयाचा वापर केला.