शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

जैतापूर नळपाणी योजनेचे वाजले की...

By admin | Updated: December 16, 2014 23:41 IST

बाजारवाडीचा समावेश कधी : सरपंच म्हणतात फेर टेंडरिंग प्रोसेस होणार

जैतापूर : जैतापूर ग्रामपंचायतीमार्फ त राबवण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेतून पाणी येत नसल्याने ही योजना अपयशी ठरली आहे. जैतापूर गाव खाडीकिनारी असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासते. ग्रामस्थांना ३०० ते ३५० रुपये दराने कित्येक लीटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. नळपाणी योजनेचा विषय ग्रामसभेत सातत्याने चर्चेला घेतला जातो. मात्र, ग्रामस्थांना थातूरमातूर उत्तरे देण्यात येतात. या नळपाणी योजनेसाठी अनंतवाडी, माजरेकरवाडी या भागाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ई टेंडर नंबर १/१३-१४ ग्रामपंचायत, जैतापूर रक्कम रुपये २७,७४,०८३, दहा महिन्यांची मुदत ठेकेदाराला देण्यात आली होती. ८ आॅगस्ट २०१४ रोजी टेंडर वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. २५ आॅगस्ट ही अंतिम तारीख ठेवून दुपारी ३ वाजता ते खुले करण्यात येणार होते. सदर टेंडर कोणीही घेतले नाही. अगर आजपर्यंत फेरटेंडर काढण्याची तसदी घेण्यात आली नाही. प्रत्यक्षात दळे ग्रामपंचायत हद्दीतून होळी गावच्या आरोग्य केंद्राच्या जिल्हा परिषद मालकीच्या विहिरीवरुन जैतापूर ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा होणार आहे. ही बाब दळे येथील सरपंचांना कळविल्यानंतर त्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे.या नळपाणी योजनेविषयी राजापूरचे उपशाखा अभियंता आर. एल. लटाळ यांना विचारले असता ग्रामपंचायतीने फेरटेंडर काढायला पाहिजे व दळे गावचा विरोध शमला पाहिजे, तरच ही नळ योजना दोन वाडीसाठी कार्यरत करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही या योजनेसंदर्भात पुन्हा टेंडर काढणार असल्याचे या सर्व प्रकाराबाबत सरपंच शैलजा माजरेकर यांनी सांगितल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)बाजारवाडीमध्ये चव्हाटावाडी, मधीलवाडा, मालीम गल्ली, काझी गल्ली, मुखरी गल्ली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. ग्रामपंचायतीने नळपाणी योजनेचा प्रस्ताव पाठवताना बाजारवाडीला वगळून प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी येथील सदस्य मूग गिळून गप्प बसले होते काय? असा सवाल बाजारवाडीतील नळधारकांनी विचारला आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा एक व काँग्रेसचे दोन असे एकूण तीन सदस्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत.