शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘सील’ करण्याचा दळभद्रीपणा योग्यच

By admin | Updated: May 20, 2016 22:50 IST

महेंद्र मयेकर : २६ मे रोजी सावरकर नाट्यगृहात पाणी योजनेचे सादरीकरण

रत्नागिरी : पालिका सभागृह सील करण्याचा दळभद्रीपणा नगराध्यक्ष म्हणून मला का करावा लागला, याचे उत्तर खासदार विनायक राऊत यांनीच दिले आहे. हा निर्णय घेतला नसता तर त्याचे कायदेशीर परिणाम खासदार राऊत यांच्यासह सर्वांनाच भोगावे लागले असते. त्यामुळे कायद्याच्या कक्षेत जे होते ते आपण केले. हा दळभद्रीपणा असेल तर मला मान्य आहे. आता येत्या २६ मे २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात वाढीव नळपाणी योजनेचे मोठ्या पडद्यावर ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ केले जाणार असून, लोकप्रतिनिधींसह जनतेसाठीही हे प्रेझेंटेशन खुले राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने व मी पुढाकार घेतलेल्या शहराच्या वाढीव नळपाणी योजनेचा गाजावाजा बराच केला गेला. पाणी योजनेसाठी ज्यांचा काडीचाही सहभाग नाही, त्यांनी योजनेच्या प्रेझेंटेशनसाठी सभागृहाची केलेली मागणी नियमानुसार मान्य करता येणारी नव्हती. मात्र, सेनेच्या काही नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे पालिकेत कायदा व सुव्यवस्था स्थिती राखली जावी व खासदार राऊत गोत्यात येऊ नयेत म्हणूनच आपण पंचांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा सभागृह व स्थायी समिती सभागृह सील केले होते. अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर गुन्हा दाखल झाला असता. या योजनेवरून श्रेयवाद लाटण्यासाठीच साऱ्या घडामोडी झाल्या. परंतु आपण हा विषय संपुष्टात आणण्यासाठीच येत्या २६ मे रोजी सावरकर नाट्यगृहात वाढीव नळपाणी योजनेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवले आहे. हे प्रेझेंटेशन नागरिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे शहरातील १५ ठिकाणी या योजनेचे प्रेझेंटेशन देण्याची आवश्यकता राहणार नाही. खासदार राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत या सर्वांना यावेळी आमंत्रित केले जाणार आहे. पालिकेने या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही एजन्सी नेमली आहे. पालिकेची ही योजना असून, त्यासाठी पालिकेने साडेदहा कोटी रुपये राखून ठेवले आहेत. उर्वरित निधी शासनाकडून मिळणार आहे. साडेदहा कोटींपैकी पाच कोटी रक्कम पालिकेने शासनाकडे जमा केली आहे. रक्कमही लवकरच जमा केली जाणार आहे. एकूण ६८.४० कोटी खर्चाची ही योजना आहे. (प्रतिनिधी)राऊत यांची सूचना स्वागतार्हविनायक राऊत हे आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत. त्यांच्याबाबत मला आदरच आहे. नगरसेवकांनी कशी चुकीची भूमिका घेतली हे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगून आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी अन्य पदाधिकारी व नगरसेवकांसह जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेतली. याला योजनेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन म्हणता येणार नाही. मात्र, रत्नागिरीत दररोज बाहेरून येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करताना ते प्रमाण २५ हजारऐवजी दुप्पट करण्याची खासदारांची सूचना चांगली असल्याचे मयेकर यांनी आवर्जून सांगितले.आढावा बैठकच चुकीची...?शासनाच्या मंत्र्यांना प्रशासकीय कामावर देखभाल करण्याचे व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून वा त्यांना भेटीसाठी बोलावून विचारविनिमय करून सूचनावजा आदेश देण्याचे अधिकार आहेत, असे अधिकार मंत्र्यांचा दर्जा असलेल्या विरोधी पक्षनेते, अशासकीय सदस्यांना नाहीत. संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी आयोजित केलेल्या बैठका किंवा दौरे यांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित नाही, असा शासनादेश ११ मार्च २०१६ रोजी शासनाने काढला आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेत गेल्या आठवड्यात आमदारांनी घेतलेली आढावा बैठक चुकीची होती, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले.