शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘सील’ करण्याचा दळभद्रीपणा योग्यच

By admin | Updated: May 20, 2016 22:50 IST

महेंद्र मयेकर : २६ मे रोजी सावरकर नाट्यगृहात पाणी योजनेचे सादरीकरण

रत्नागिरी : पालिका सभागृह सील करण्याचा दळभद्रीपणा नगराध्यक्ष म्हणून मला का करावा लागला, याचे उत्तर खासदार विनायक राऊत यांनीच दिले आहे. हा निर्णय घेतला नसता तर त्याचे कायदेशीर परिणाम खासदार राऊत यांच्यासह सर्वांनाच भोगावे लागले असते. त्यामुळे कायद्याच्या कक्षेत जे होते ते आपण केले. हा दळभद्रीपणा असेल तर मला मान्य आहे. आता येत्या २६ मे २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात वाढीव नळपाणी योजनेचे मोठ्या पडद्यावर ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ केले जाणार असून, लोकप्रतिनिधींसह जनतेसाठीही हे प्रेझेंटेशन खुले राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने व मी पुढाकार घेतलेल्या शहराच्या वाढीव नळपाणी योजनेचा गाजावाजा बराच केला गेला. पाणी योजनेसाठी ज्यांचा काडीचाही सहभाग नाही, त्यांनी योजनेच्या प्रेझेंटेशनसाठी सभागृहाची केलेली मागणी नियमानुसार मान्य करता येणारी नव्हती. मात्र, सेनेच्या काही नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे पालिकेत कायदा व सुव्यवस्था स्थिती राखली जावी व खासदार राऊत गोत्यात येऊ नयेत म्हणूनच आपण पंचांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा सभागृह व स्थायी समिती सभागृह सील केले होते. अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर गुन्हा दाखल झाला असता. या योजनेवरून श्रेयवाद लाटण्यासाठीच साऱ्या घडामोडी झाल्या. परंतु आपण हा विषय संपुष्टात आणण्यासाठीच येत्या २६ मे रोजी सावरकर नाट्यगृहात वाढीव नळपाणी योजनेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवले आहे. हे प्रेझेंटेशन नागरिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे शहरातील १५ ठिकाणी या योजनेचे प्रेझेंटेशन देण्याची आवश्यकता राहणार नाही. खासदार राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत या सर्वांना यावेळी आमंत्रित केले जाणार आहे. पालिकेने या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही एजन्सी नेमली आहे. पालिकेची ही योजना असून, त्यासाठी पालिकेने साडेदहा कोटी रुपये राखून ठेवले आहेत. उर्वरित निधी शासनाकडून मिळणार आहे. साडेदहा कोटींपैकी पाच कोटी रक्कम पालिकेने शासनाकडे जमा केली आहे. रक्कमही लवकरच जमा केली जाणार आहे. एकूण ६८.४० कोटी खर्चाची ही योजना आहे. (प्रतिनिधी)राऊत यांची सूचना स्वागतार्हविनायक राऊत हे आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत. त्यांच्याबाबत मला आदरच आहे. नगरसेवकांनी कशी चुकीची भूमिका घेतली हे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगून आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी अन्य पदाधिकारी व नगरसेवकांसह जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेतली. याला योजनेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन म्हणता येणार नाही. मात्र, रत्नागिरीत दररोज बाहेरून येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करताना ते प्रमाण २५ हजारऐवजी दुप्पट करण्याची खासदारांची सूचना चांगली असल्याचे मयेकर यांनी आवर्जून सांगितले.आढावा बैठकच चुकीची...?शासनाच्या मंत्र्यांना प्रशासकीय कामावर देखभाल करण्याचे व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून वा त्यांना भेटीसाठी बोलावून विचारविनिमय करून सूचनावजा आदेश देण्याचे अधिकार आहेत, असे अधिकार मंत्र्यांचा दर्जा असलेल्या विरोधी पक्षनेते, अशासकीय सदस्यांना नाहीत. संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी आयोजित केलेल्या बैठका किंवा दौरे यांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित नाही, असा शासनादेश ११ मार्च २०१६ रोजी शासनाने काढला आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेत गेल्या आठवड्यात आमदारांनी घेतलेली आढावा बैठक चुकीची होती, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले.