शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

आयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:42 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी/बारावीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

ठळक मुद्देआयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणीमंडळातर्फे आयटीआय संस्थांना इंडेक्स क्रमांक

रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी/बारावीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.शासकीय अथवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राज्यभरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकत असतात. एक ते दोन वर्षाच्या रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणानंतर मिळणारा रोजगार अथवा व्यवसाय सुरू करण्याची संधी यामुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

राज्य मंडळाकडून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यां विद्यार्थ्यांना दहावी/बारावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अकरावी किंवा पदवीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांच्या पुढील अभ्यासक्रमांसाठी हे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. राज्य शासनाने जून २०१८मध्ये याबाबतचे परिपत्रक काढले होते. मात्र, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही आता सुरू झाली आहे.दहावी, बारावीची परीक्षा येत्या मार्च/एप्रिलमध्ये होणार आहेत. त्यानंतर पुन्हा जुलै २०१९मध्ये राज्य मंडळाकडून पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना राज्य मंडळाच्या विभागीय कार्यालयांकडून इंडेक्स क्रमांक दिला जाणार आहे.

राज्य मंडळाच्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणे बेस्ट फाइव्ह या सुविधेचाही लाभ आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आयटीआयचे चार विषय व राज्य मंडळाचे भाषा विषय यातील पाच विषयांच्या कमाल गुणांनुसार गुणपत्रिका दिली जाणार आहे.

मार्च/एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी/बारावीचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. मात्र, आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाचे दोन भाषा विषय व ग्रेडच्या परीक्षा (पर्यावरण, आरोग्य शिक्षण) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

उर्वरित विषयांसाठी ते शिकत असलेल्या अभ्यासक्रमाचे विषय त्यांना निवडता येणार आहेत. आठवी उत्तीर्ण अथवा दहावी अनुत्तीर्ण प्रवेश पात्रता असलेल्या आयटीआय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना केवळ दहावीची मराठी, इंग्रजी विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण पात्रता असणाºया अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना बारावीचे मराठी व इंग्रजी भाषेचे पेपर द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरण, आरोग्य आदींच्या ग्रेड परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागणार आहेत.रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राबरोबरच दहावी, बारावी उत्तीर्णतेची संधी यामुळे उपलब्ध होणार असून, भविष्यात या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देता येणार आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजRatnagiriरत्नागिरी