शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

जीवितहानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक : चंद्रकांत सूर्यवंशी

By शोभना कांबळे | Updated: October 13, 2023 18:36 IST

रत्नागिरी : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात ...

रत्नागिरी : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात धरुन येणाऱ्या आपत्तीला सामोरे गेल्यास जीवितहानी टाळू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी कर्मचारी यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ही शपथ दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आपत्ती म्हणजे काय, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, येणाऱ्या आपत्तीविषयी नेहमीच सजग रहायला हवे. विविध आपत्तींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन वाढविले पाहिजे. यातून आपले अनुभव समृद्ध होतील. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खात्री करावी. त्यावर येणारी माहिती खोटी असेल, तर ते विसरायला हवे. खरी असेल, तर त्यावर मात कसे करता येईल, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाने आजचा दिवस जाहीर केला आहे. डब्लूएचओने मानवी प्रजातीला असणाऱ्या १० धोक्यांची यादी बनविली आहे. यात प्रथम क्रमांकावर पर्यावरण बदलाचा मुद्दा आहे. आपत्ती व्यवस्थापनात मन लावून काम करणे हे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनीही अनुभव कथन करुन ‘मॉक ड्रिल’ घेण्याबाबत सूचना केली. यावेळी सर्वसाधारण शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकार अजय सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी