शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोटे वसाहतीत सांडपाण्याचा प्रश्न

By admin | Updated: July 9, 2015 00:05 IST

प्रकार सुरुच : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही डोळेझाक

आवाशी : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सध्या रासायनिक सांडपाणी सोडण्याचा प्रकार कंपन्यांनी सुरूच ठेवला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करुनही डोळेझाक होत असल्याचा आरोप लोटे ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेंद्र चाळकेंसह ग्रामस्थांनी केला आहे.पावसाळा सुरु झाला की, इथल्या रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न दरवर्षी ऐरणीवर येतो. प्रत्येक कंपनीने सांडपाण्यावर रासायनिक प्रक्रिया करुन सीईटीपीत पाणी सोडले पाहिजे. मात्र, तसे न होता बहुतांश कंपन्यातून हे सांडपाणी विनाप्रक्रिया आवाराबाहेर नाल्यातून सोडले जात आहे. त्यामुळे वर्षातून एकदाच होणारी भातशेती धोक्यात आली आहे.पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत दूषित झाले आहेत, तर पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मागील आठवडाभरात इथल्या पाच कंपन्यांनी असे उघड्यावर सांडपाणी सोडल्याचे ग्रामस्थांसह सरपंचांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांची नावे समोर येत आहेत. या सर्व ठिकाणांची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे येथील अधिकारी अभिजीत कसबे यांनी सरपंचांसमवेत करुन पाण्याचे नमुने घेतले आहेत. तरीही या कंपन्यांवर कोणाचाच वचक नसल्याची बाब समोर येत आहे. एका केमिकल्स कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची कसबे यांनी सोमवारी पाहणी करुन पंचयादी घातली. मात्र, त्यानंतर एका कंपनीच्या लगतच्या नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्याची तक्रार भ्रमणध्वनीवरुन सरपंच चाळके यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी मोरे यांच्याकडे दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन कार्यालयात येऊन तक्रार द्या, मग काय ते बघू, असे सांगितल्याने वातावरण बिघडले आहे. (वार्ताहर)लोटे येथील एका कंपनीच्या सांडपाण्याची तक्रारही सरपंचांनी केली होती. सलग दोन वर्षांच्या पावसाळ्यात तसाच प्रकार घडल्याने या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन घेण्यास बंदी घातली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.