शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

बंधाऱ्यांची चौकशी अद्याप अपूर्णच

By admin | Updated: May 14, 2015 23:57 IST

कृषी विभाग : पाच महिने उलटले तरीही कार्यवाहीचा कागद कोराच

रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी अपूर्ण आहे. चौकशी सुरु होऊन पाच महिने सुरु झाले तरी सिमेंटच्या १८८ बंधाऱ्यांपैकी केवळ ११३ बंधाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित चौकशी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.समुद्राचे पाणी शेतात घुसून जमीन नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी शासनाने बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शासनाच्या पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, सलग समतल चर, अनघड दगडी बांध आदि बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. या बंधाऱ्यांवर सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. जिल्ह्यात १८८ बंधाऱ्यांची बांधकामे करण्यात आली होती. त्यामध्ये चिपळूणात ५, गुहागरात ९, संगमेश्वरात २६, राजापुरात ११८ आणि रत्नागिरीतील ३० बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांची कामे स्थानिक स्तरावर करण्यात येत होती. मात्र, सिमेंट बंधारे ज्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत, ती कामे निकृष्ठ दर्जाची असल्याची ओरड आजही सुरु आहे. बंधारे बांधल्यानंतर पाणी आत शिरत असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे निकृष्ठ असल्याचा जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समिती आणि स्थायी समितीमध्ये या विषयांवरुन जोरदार चर्चा झाली होती. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बैठकांमध्ये सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली होती. जिल्हा परिषदेच्या सभांमधील होणाऱ्या चौकशीच्या मागणीची दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली होती. त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी अधिकारी पी. एन. देशमुख यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता या चौकशीसाठी तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समित्यांनी गेल्या पाच महिन्यात ११३ बंधाऱ्यांची चौकशी केली. त्यामध्ये ८३ बंधारे सुस्थितीत, २३ पाणी नसलेले आणि ७ बंधारे लिकेज असल्याचे स्पष्ट झाले आहे. (शहर वार्ताहर)चौकशी पूर्ण होणार ?शासनाच्या कृषी विभागाने केलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घातले होते. तरीही ही चौकशी करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईल की नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. गेले पाच महिने ही चौकशी सुरु असून, अद्याप ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या चौकशीसाठी आणखी दिवस लागणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.