शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

बंधाऱ्यांची चौकशी अद्याप अपूर्णच

By admin | Updated: May 14, 2015 23:57 IST

कृषी विभाग : पाच महिने उलटले तरीही कार्यवाहीचा कागद कोराच

रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी अपूर्ण आहे. चौकशी सुरु होऊन पाच महिने सुरु झाले तरी सिमेंटच्या १८८ बंधाऱ्यांपैकी केवळ ११३ बंधाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित चौकशी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.समुद्राचे पाणी शेतात घुसून जमीन नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी शासनाने बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शासनाच्या पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, सलग समतल चर, अनघड दगडी बांध आदि बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. या बंधाऱ्यांवर सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. जिल्ह्यात १८८ बंधाऱ्यांची बांधकामे करण्यात आली होती. त्यामध्ये चिपळूणात ५, गुहागरात ९, संगमेश्वरात २६, राजापुरात ११८ आणि रत्नागिरीतील ३० बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांची कामे स्थानिक स्तरावर करण्यात येत होती. मात्र, सिमेंट बंधारे ज्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत, ती कामे निकृष्ठ दर्जाची असल्याची ओरड आजही सुरु आहे. बंधारे बांधल्यानंतर पाणी आत शिरत असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे निकृष्ठ असल्याचा जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समिती आणि स्थायी समितीमध्ये या विषयांवरुन जोरदार चर्चा झाली होती. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बैठकांमध्ये सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली होती. जिल्हा परिषदेच्या सभांमधील होणाऱ्या चौकशीच्या मागणीची दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली होती. त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी अधिकारी पी. एन. देशमुख यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता या चौकशीसाठी तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समित्यांनी गेल्या पाच महिन्यात ११३ बंधाऱ्यांची चौकशी केली. त्यामध्ये ८३ बंधारे सुस्थितीत, २३ पाणी नसलेले आणि ७ बंधारे लिकेज असल्याचे स्पष्ट झाले आहे. (शहर वार्ताहर)चौकशी पूर्ण होणार ?शासनाच्या कृषी विभागाने केलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घातले होते. तरीही ही चौकशी करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईल की नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. गेले पाच महिने ही चौकशी सुरु असून, अद्याप ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या चौकशीसाठी आणखी दिवस लागणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.