शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खोक्याला बळी पडले नाहीत म्हणूनच चौकशी, खासदार विनायक राऊतांचा आरोप

By अरुण आडिवरेकर | Updated: October 14, 2022 13:26 IST

कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत

रत्नागिरी : वैभव नाईक, राजन साळवी हे मातोश्रीचे प्रामाणिक शिलेदार आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते यांच्या खोक्याला बळी पडले नाहीत. त्यांनी निष्ठा, श्रद्धा जपली आणि खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत. खोक्याला दबले नाहीत म्हणून कोणत्या ना कोणत्या एजन्सीचा दबाव टाकायचा. २००२ पासूनचे व्यवहार तपासायचे, कटकारस्थान करायचे हे अत्यंत खाणेरड राजकारण आहे, असे मत रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी खासदार विनायक राऊत आज, शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, असे तुम्ही कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे १८ ऑक्टोबर रोजी शिवसैनिकांनी मोर्चाचे आयोजन केल्याचे खासदार राऊत म्हणाले.मुलांनाही सोबत घेऊन जानारायण राणे यांना दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली आहे, त्यावर खासदार राऊत म्हणाले की, ज्यांनी जबाबदारी दिली त्यांचे मी आभार मानतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण यापूर्वी मुंबई, सिंधुदुर्गात दिसून आली आहे. पुन्हा दिसेल. बरोबर दोघांनाही घ्या, एकटल्यालाच नको बापाबरोबर दोन्ही बेट्यांनाही घ्या, असे खोचकपणे सांगितले.अवधूत तटकरेंचा शिवसेनेशी संबंध नाहीअवधूत तटकरे आणि शिवसेना यांचा काहीही संबंध नाही. त्यांना आमचे मानत नाही ना त्यांनी शिवसेनेला आपल मानलं. शिवसेनेच लेबल लावून भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर तो त्यांच्या समाधानाचा विषय असेल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVaibhav Naikवैभव नाईक Rajan Salviराजन साळवीVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना