शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पोलिस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; तत्काळ हजर व्हा

By अरुण आडिवरेकर | Updated: May 20, 2023 16:56 IST

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

 

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले आहेत. बदली झालेल्या ६१ जणांमध्ये पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार यांचा समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हाअंतर्गत बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. ६१ जणांच्या बदल्यांचे आदेश काढताना बदली झालेल्या अंमलदार यांनी त्यांच्याकडे असलेले गुन्हे आणि अर्ज प्रकरणे नेमणुकीच्या इतर पोलिस अंमलदार यांच्याकडे देऊन त्यांची नोंद ठेवावी. तसेच बदली झालेल्या अंमलदार यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिले आहेत. बदली झालेल्या अंमलदार यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बदली झालेल्या ६१ जणांमध्ये संदेश सारंग यांची शहर पोलिस स्थानकातून पोलिस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. शरद भागवत यांची शहर वाहतूक शाखा येथून शहर पोलिस स्थानक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी निखार्गे यांची पोलिस मुख्यालय येथून रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानक, प्रभाकर बोरकर यांची स्थानिक गुन्हे शाखेतून सुरक्षा शाखा, संजय कांबळे स्थानिक गुन्हे शाखेतून जिल्हा विशेष शाखा, राजेश सावंत यांची पोलिस मुख्यालय येथून रत्नागिरी ग्रामीण, प्रवीण बर्गे यांची शहर पोलिस स्थानक येथून राजापूर पोलिस स्थानक येथे बदली झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस