शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

अणुस्कुरा घाटातील तपासणी नाका बंद

By admin | Updated: January 28, 2016 00:15 IST

कोल्हापूर-राजापूरला जवळचा मार्ग : सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

राजापूर : राजापूर-कोल्हापूर दरम्यान लगतचा मार्ग ठरणाऱ्या अणुस्कुरा घाटात १५ वर्षापूर्वी सुरु केलेला तपासणी नाका जिल्हा पोलीस दलाने अचानक बंद केल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात गुन्हेगारीत वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरकडे जाणारा लगतचा मार्ग राजापुरातून सुरु झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनय चौबे यांनी अणुस्कुरा घाटात पोलीस तपासणी नाका सुरु केला होता.मागील दीड दशकाच्या काळात राजापूर तालुका व लगतच्या भागात गुन्हे करत अणुस्कुरामार्गे पळणाऱ्या अनेक आरोपींना याच नाक्यामुळे जेरबंद करता आले होते. घाटमाथ्यावरुन कोकणात येणाऱ्या शिकाऱ्यांनादेखील पोलिसांनी तपासणी नाक्यावर ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवले होते. अणुस्कुरा घाट हा धोकादायक आहे. काहीवेळा रात्री-अपरात्री अपघात घडल्यानंतर कारवली नाक्यावरील पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून जात होते. त्यामुळे हे महत्त्वाचे तपासणी नाके जिल्हा पोलीस दलाने अचानक बंद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस हे नाके बंद आहेत.नाके बंद करण्यात आल्याने याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे तपासणी नाके बंद झाल्याने गुन्हेगारांना अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरला पळून जाणे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे भविष्यात या परिसरात गुन्ह्यांमध्ये वाढ होईल, अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे बंद केलेले तपासणी नाके तत्काळ पूर्ववत सुरु करावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. अचानक बंद करण्यात आलेल्या या नाक्यांमुळे सध्या या मार्गावरून जनावरांची वाहतूक केली जात आहे. कारवली फाटा येथे गाडी घेऊन जायची व तेथे गाड्या भरायच्या, असे प्रकार सुरु आहेत. यामुळे करक, येरडव, कारवली, पांगरी आदी गावातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)नाराजी : कार्यालय हटवण्याचा घाट?अणुस्कुरा घाटातील हे पालीस चेकपोस्ट अचानक बंद करून ते पाचलमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ सुरु करण्याचा घाट जिल्हा पोलीस प्रशासनाकडून घातला जात आहे. हे चेकपोस्ट अचानक हटवल्याने येथील सुरक्षेचा मुद्दा आता नव्याने ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.अणुस्कुरा घाटातील चेकपोस्टसाठी ग्रामस्थांना खूप मेहनत घ्यावी लागली होती. ते सुरु झाल्यानंतर आता जर ते बंद केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागेल.-प्रकाश दसवंत,उपसरपंच, कारवलीशिकाऱ्यांना मोकळे रानपश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शिकारी राजापुरात येतात. त्यांना या चेकपोस्टमुळे आळा बसत होता. मात्र, आता त्यांना मोकळे रान मिळणार आहे.