शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अणुस्कुरा घाटातील तपासणी नाका बंद

By admin | Updated: January 28, 2016 00:15 IST

कोल्हापूर-राजापूरला जवळचा मार्ग : सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

राजापूर : राजापूर-कोल्हापूर दरम्यान लगतचा मार्ग ठरणाऱ्या अणुस्कुरा घाटात १५ वर्षापूर्वी सुरु केलेला तपासणी नाका जिल्हा पोलीस दलाने अचानक बंद केल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात गुन्हेगारीत वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरकडे जाणारा लगतचा मार्ग राजापुरातून सुरु झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनय चौबे यांनी अणुस्कुरा घाटात पोलीस तपासणी नाका सुरु केला होता.मागील दीड दशकाच्या काळात राजापूर तालुका व लगतच्या भागात गुन्हे करत अणुस्कुरामार्गे पळणाऱ्या अनेक आरोपींना याच नाक्यामुळे जेरबंद करता आले होते. घाटमाथ्यावरुन कोकणात येणाऱ्या शिकाऱ्यांनादेखील पोलिसांनी तपासणी नाक्यावर ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवले होते. अणुस्कुरा घाट हा धोकादायक आहे. काहीवेळा रात्री-अपरात्री अपघात घडल्यानंतर कारवली नाक्यावरील पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून जात होते. त्यामुळे हे महत्त्वाचे तपासणी नाके जिल्हा पोलीस दलाने अचानक बंद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस हे नाके बंद आहेत.नाके बंद करण्यात आल्याने याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे तपासणी नाके बंद झाल्याने गुन्हेगारांना अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरला पळून जाणे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे भविष्यात या परिसरात गुन्ह्यांमध्ये वाढ होईल, अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे बंद केलेले तपासणी नाके तत्काळ पूर्ववत सुरु करावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. अचानक बंद करण्यात आलेल्या या नाक्यांमुळे सध्या या मार्गावरून जनावरांची वाहतूक केली जात आहे. कारवली फाटा येथे गाडी घेऊन जायची व तेथे गाड्या भरायच्या, असे प्रकार सुरु आहेत. यामुळे करक, येरडव, कारवली, पांगरी आदी गावातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)नाराजी : कार्यालय हटवण्याचा घाट?अणुस्कुरा घाटातील हे पालीस चेकपोस्ट अचानक बंद करून ते पाचलमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ सुरु करण्याचा घाट जिल्हा पोलीस प्रशासनाकडून घातला जात आहे. हे चेकपोस्ट अचानक हटवल्याने येथील सुरक्षेचा मुद्दा आता नव्याने ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.अणुस्कुरा घाटातील चेकपोस्टसाठी ग्रामस्थांना खूप मेहनत घ्यावी लागली होती. ते सुरु झाल्यानंतर आता जर ते बंद केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागेल.-प्रकाश दसवंत,उपसरपंच, कारवलीशिकाऱ्यांना मोकळे रानपश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शिकारी राजापुरात येतात. त्यांना या चेकपोस्टमुळे आळा बसत होता. मात्र, आता त्यांना मोकळे रान मिळणार आहे.