शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी जिल्ह्यात लावणी खोळंबली

By admin | Updated: June 27, 2014 01:08 IST

पावसाने फिरवली पाठ : ९५ टक्के भात पेरणी पूर्ण, पुढची कामे मात्र रखडली

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९५ टक्के भातपेरणी पूर्ण झाली आहे. मात्र पावसाच्या विलंबामुळे लावणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ७००० हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची पेरणी झाली आहे. येत्या चार - पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर भातपिकाचे नुकसान होण्याची भीती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर भातपेरणीला सुरूवात केली होती. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाताला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात अधूनमधून पडणारा पाऊस पेरणीला सध्या तरी पूरक असल्याने आता रोपे चांगली उगवली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७००० हेक्टर क्षेत्रात भातपेरणी करण्यात आली आहे. १३०८ हेक्टर क्षेत्रात नागलीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात नियमित नसला तरी सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पेरणीच्या कामात कुठलीच अडचण आली नाही. भातरोपे चांगली उगवली आहेत. त्यामुळे सध्या अधूनमधून पडणाऱ्या या पावसामुळे या रोपांचीही चांगली वाढ झाली आहे. सध्या पावसाला अनुकूल असे वातावरण जिल्ह्यात दिसू लागले असून, ३० तारखेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. मात्र, अधिकच लांबला तर मात्र, रोपे सुकून जाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली. राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यातील काही ठिकाणी भातरोपांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तेथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयाकडून सायफरमेथ्रीन या कीटकनाशकाचा पुरवठा या क्षेत्रात करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले. संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पेरणीचे काम झाले असून, त्या तुलनेने गुहागर आणि मंडणगडमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. (प्रतिनिधी)