शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पावसाअभावी जिल्ह्यात लावणी खोळंबली

By admin | Updated: June 27, 2014 01:08 IST

पावसाने फिरवली पाठ : ९५ टक्के भात पेरणी पूर्ण, पुढची कामे मात्र रखडली

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९५ टक्के भातपेरणी पूर्ण झाली आहे. मात्र पावसाच्या विलंबामुळे लावणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ७००० हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची पेरणी झाली आहे. येत्या चार - पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर भातपिकाचे नुकसान होण्याची भीती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर भातपेरणीला सुरूवात केली होती. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाताला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात अधूनमधून पडणारा पाऊस पेरणीला सध्या तरी पूरक असल्याने आता रोपे चांगली उगवली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७००० हेक्टर क्षेत्रात भातपेरणी करण्यात आली आहे. १३०८ हेक्टर क्षेत्रात नागलीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात नियमित नसला तरी सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पेरणीच्या कामात कुठलीच अडचण आली नाही. भातरोपे चांगली उगवली आहेत. त्यामुळे सध्या अधूनमधून पडणाऱ्या या पावसामुळे या रोपांचीही चांगली वाढ झाली आहे. सध्या पावसाला अनुकूल असे वातावरण जिल्ह्यात दिसू लागले असून, ३० तारखेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. मात्र, अधिकच लांबला तर मात्र, रोपे सुकून जाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली. राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यातील काही ठिकाणी भातरोपांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तेथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयाकडून सायफरमेथ्रीन या कीटकनाशकाचा पुरवठा या क्षेत्रात करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले. संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पेरणीचे काम झाले असून, त्या तुलनेने गुहागर आणि मंडणगडमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. (प्रतिनिधी)