शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवई नदीचा श्वास मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : उन्हाळ्यात पाणीटंचाईचा आणि पावसाळ्यात पुराचा फटका बसत असलेल्या गावांच्या धडपडीतून अनेक गावांनी या समस्यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : उन्हाळ्यात पाणीटंचाईचा आणि पावसाळ्यात पुराचा फटका बसत असलेल्या गावांच्या धडपडीतून अनेक गावांनी या समस्यांवर उपाययोजना केल्या आहेत. पुराच्या समस्येचा सामना करावा लागणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांनी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने गाळमुक्त नद्या - नाले ही मोहीम यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच यंदा १०० वर्षांत झाली नाही अशी ढगफुटी होऊनही ही गावे पुरापासून सुरक्षित राहिली आहेत. यापैकी एक म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे गाव कडवई हे आहे. या गावातील मुंबईस्थित युवकांनी स्थापन केलेल्या ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवईतील नदी गाळमुक्त झाली, त्याचबरोबर गावामध्ये जलसमृद्धीचे अनेक प्रकल्पही राबविण्यात आले आहेत.

वर्षानुवर्षे भरलेल्या गाळामुळे नद्यांचे पाणी घरांमध्ये - शेतीमध्ये घुसल्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. कडवई ग्रामस्थांना दरवर्षी या संकटाचा सामना करावा लागत असे. सुमारे १८ ते २० वाड्या असलेल्या या गावाची लोकसंख्या साडेपाच हजारांच्या आसपास आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, दुर्गम असलेल्या या गावामध्ये रोजगार संधी नसल्याने बहुतांश लोकांचे वास्तव्य मुंबई तसेच परदेशात आहे. परंतु, यापैकी काहींना आपल्या गावाबद्दल कमालीची आत्मीयता असल्याने गावाच्या विकासासाठी ही मंडळी काही ना काही धडपड करत असतात.

कडवईतील मुंबईस्थित आणि स्थानिक युवकांच्या संकल्पनेतून गावाच्या विकासासाठी ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’ची निर्मिती झाली. यात पुढाकार होता तो इरफान चिकटे, सादिक खान, अख्तर मोडक आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा. सुरूवातीपासूनच या युवकांनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यातूनच गावातील नदीला गाळमुक्त करून पुराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा विचार पुढे आला. या युवकांनी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंउेशनच्या माध्यमातून कणकवली येथील एका गावात ११ किलाेमीटरचा गाळ केवळ ३० दिवसांत काढल्याचे स्वत: जाऊन पाहिले होते. त्यामुळे आपल्या गावातही ही मोहीम राबविण्याचा निर्धार केला. ‘नाम’चे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर, तालुका प्रतिनिधी भगवंतसिंह चुंडावत यांच्या माध्यमातून अडीच किलोमीटर अंतरातील गाळ काढण्याचा निर्णय झाला. जलतज्ज्ञ डाॅ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश निवाते यांनी संपूर्ण आराखडा तयार केला. या मंडळींनी या ग्रामस्थांना हिंमत देत त्यांचे मनोबल वाढवले. त्याचबरोबर कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, निरजा फाऊंडेशनचे संचालक यशवंत मराठे यांचे योगदान महत्त्वाचे होते. मराठे यांनी संस्थेच्या माध्यमातून १० लाखांची मदत या उपक्रमासाठी केली.

प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. कडवई नदीतील अडीच किलाेमीटरचा गाळ उपसा करण्यासाठी ‘नाम’ने २ पोकलेन मशीन दिल्या. ग्रामस्थांच्या एकीतून सुमारे १५ लाखांचा निधीही गोळा झाला. ग्रामस्थ आणि नाम फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा गाळ अवघ्या ४२ दिवसांत निघाला. त्यामुळे कडवई नदीचा श्वास गाळमुक्त झाला आहे.

चार बंधारेही पूर्ण...

एवढेच नव्हे तर ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या युवकांनी गावात ‘पाणी जिरवा, पाणी अडवा’ हा मंत्र जपत चार बंधाऱ्यांचे कामही हाती घेतले. त्यातील ३ बंधारे पूर्ण झाले असून, चाैथ्या बंधाऱ्याचे काम पावसामुळे अपूर्ण राहिले आहे. ते आता पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाची पाठीवर थाप...

रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कडवई येथे भेट देऊन गाळ उपशाची माहिती घेतली आणि या सर्वांचे काैतुक केले. एवढेच नव्हे तर प्रशासनाच्यावतीने एक पोकलेन मशीन देण्याचे जाहीर केले आणि त्याची पूर्तताही केली.