शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवई नदीचा श्वास मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : उन्हाळ्यात पाणीटंचाईचा आणि पावसाळ्यात पुराचा फटका बसत असलेल्या गावांच्या धडपडीतून अनेक गावांनी या समस्यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : उन्हाळ्यात पाणीटंचाईचा आणि पावसाळ्यात पुराचा फटका बसत असलेल्या गावांच्या धडपडीतून अनेक गावांनी या समस्यांवर उपाययोजना केल्या आहेत. पुराच्या समस्येचा सामना करावा लागणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांनी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने गाळमुक्त नद्या - नाले ही मोहीम यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच यंदा १०० वर्षांत झाली नाही अशी ढगफुटी होऊनही ही गावे पुरापासून सुरक्षित राहिली आहेत. यापैकी एक म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे गाव कडवई हे आहे. या गावातील मुंबईस्थित युवकांनी स्थापन केलेल्या ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवईतील नदी गाळमुक्त झाली, त्याचबरोबर गावामध्ये जलसमृद्धीचे अनेक प्रकल्पही राबविण्यात आले आहेत.

वर्षानुवर्षे भरलेल्या गाळामुळे नद्यांचे पाणी घरांमध्ये - शेतीमध्ये घुसल्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. कडवई ग्रामस्थांना दरवर्षी या संकटाचा सामना करावा लागत असे. सुमारे १८ ते २० वाड्या असलेल्या या गावाची लोकसंख्या साडेपाच हजारांच्या आसपास आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, दुर्गम असलेल्या या गावामध्ये रोजगार संधी नसल्याने बहुतांश लोकांचे वास्तव्य मुंबई तसेच परदेशात आहे. परंतु, यापैकी काहींना आपल्या गावाबद्दल कमालीची आत्मीयता असल्याने गावाच्या विकासासाठी ही मंडळी काही ना काही धडपड करत असतात.

कडवईतील मुंबईस्थित आणि स्थानिक युवकांच्या संकल्पनेतून गावाच्या विकासासाठी ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’ची निर्मिती झाली. यात पुढाकार होता तो इरफान चिकटे, सादिक खान, अख्तर मोडक आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा. सुरूवातीपासूनच या युवकांनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यातूनच गावातील नदीला गाळमुक्त करून पुराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा विचार पुढे आला. या युवकांनी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंउेशनच्या माध्यमातून कणकवली येथील एका गावात ११ किलाेमीटरचा गाळ केवळ ३० दिवसांत काढल्याचे स्वत: जाऊन पाहिले होते. त्यामुळे आपल्या गावातही ही मोहीम राबविण्याचा निर्धार केला. ‘नाम’चे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर, तालुका प्रतिनिधी भगवंतसिंह चुंडावत यांच्या माध्यमातून अडीच किलोमीटर अंतरातील गाळ काढण्याचा निर्णय झाला. जलतज्ज्ञ डाॅ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश निवाते यांनी संपूर्ण आराखडा तयार केला. या मंडळींनी या ग्रामस्थांना हिंमत देत त्यांचे मनोबल वाढवले. त्याचबरोबर कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, निरजा फाऊंडेशनचे संचालक यशवंत मराठे यांचे योगदान महत्त्वाचे होते. मराठे यांनी संस्थेच्या माध्यमातून १० लाखांची मदत या उपक्रमासाठी केली.

प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. कडवई नदीतील अडीच किलाेमीटरचा गाळ उपसा करण्यासाठी ‘नाम’ने २ पोकलेन मशीन दिल्या. ग्रामस्थांच्या एकीतून सुमारे १५ लाखांचा निधीही गोळा झाला. ग्रामस्थ आणि नाम फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा गाळ अवघ्या ४२ दिवसांत निघाला. त्यामुळे कडवई नदीचा श्वास गाळमुक्त झाला आहे.

चार बंधारेही पूर्ण...

एवढेच नव्हे तर ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या युवकांनी गावात ‘पाणी जिरवा, पाणी अडवा’ हा मंत्र जपत चार बंधाऱ्यांचे कामही हाती घेतले. त्यातील ३ बंधारे पूर्ण झाले असून, चाैथ्या बंधाऱ्याचे काम पावसामुळे अपूर्ण राहिले आहे. ते आता पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाची पाठीवर थाप...

रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कडवई येथे भेट देऊन गाळ उपशाची माहिती घेतली आणि या सर्वांचे काैतुक केले. एवढेच नव्हे तर प्रशासनाच्यावतीने एक पोकलेन मशीन देण्याचे जाहीर केले आणि त्याची पूर्तताही केली.