शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 9, 2017 23:21 IST

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : हातखंबा येथून जेवण करून घरी परतत असलेल्या पाच तरुणांना ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याबाबत पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे़ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ या मारहाणीला बळी पडलेल्या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़योगेश विजय आयरे, लवेश विजय आयरे, अक्षय भाटकर, अनिकेत अनिल कदम व वृषभ आलीम (परटवणे, रत्नागिरी) हे पाच मित्र हातखंबा येथे जेवण करण्यासाठी गेले होते़ जेवण आटोपून ते सोमवारी मध्यरात्री घरी येण्यासाठी निघाले़ त्यावेळी कारवांचीवाडी येथे गस्तीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले़ त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन थर्ड डिग्रीचा वापर करून मारहाण केली़ त्यावेळी लवेश आयरे व योगेश आयरे यांच्या आईने त्यांना फोन करण्याचाही प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांचे मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले होते़रात्रभर नवनवीन पोलीस येऊन या पाच तरुणांची धुलाई करत होते, तर जुने पोलीस नवख्या पोलिसांना आरोपींना कसे मारायचे, यांची प्रात्यक्षिके करून दाखवित होते़ त्यामुळे पोलिसांच्या खेळात या पाचहीजणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मध्यरात्री २ ते ५ यावेळेत या पाचही तरुणांना बेदम मारहाण करून सकाळी सोडून देण्यात आले़ त्यांची बाईक, एटीएम कार्ड व सोन्याचे ब्रेसलेट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले़ पोलिसांच्या माराने घाबरलेले हे तरुण कारवांचीवाडी ते परटवणे चालत आले़ त्यांच्या अंगावरील खाणाखुणा पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना विचारणा केली़ त्यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला़ त्यामुळे या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़