शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 9, 2017 23:21 IST

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : हातखंबा येथून जेवण करून घरी परतत असलेल्या पाच तरुणांना ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याबाबत पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे़ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ या मारहाणीला बळी पडलेल्या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़योगेश विजय आयरे, लवेश विजय आयरे, अक्षय भाटकर, अनिकेत अनिल कदम व वृषभ आलीम (परटवणे, रत्नागिरी) हे पाच मित्र हातखंबा येथे जेवण करण्यासाठी गेले होते़ जेवण आटोपून ते सोमवारी मध्यरात्री घरी येण्यासाठी निघाले़ त्यावेळी कारवांचीवाडी येथे गस्तीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले़ त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन थर्ड डिग्रीचा वापर करून मारहाण केली़ त्यावेळी लवेश आयरे व योगेश आयरे यांच्या आईने त्यांना फोन करण्याचाही प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांचे मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले होते़रात्रभर नवनवीन पोलीस येऊन या पाच तरुणांची धुलाई करत होते, तर जुने पोलीस नवख्या पोलिसांना आरोपींना कसे मारायचे, यांची प्रात्यक्षिके करून दाखवित होते़ त्यामुळे पोलिसांच्या खेळात या पाचहीजणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मध्यरात्री २ ते ५ यावेळेत या पाचही तरुणांना बेदम मारहाण करून सकाळी सोडून देण्यात आले़ त्यांची बाईक, एटीएम कार्ड व सोन्याचे ब्रेसलेट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले़ पोलिसांच्या माराने घाबरलेले हे तरुण कारवांचीवाडी ते परटवणे चालत आले़ त्यांच्या अंगावरील खाणाखुणा पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना विचारणा केली़ त्यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला़ त्यामुळे या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़