शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Updated: May 9, 2017 23:21 IST

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : हातखंबा येथून जेवण करून घरी परतत असलेल्या पाच तरुणांना ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याबाबत पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे़ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ या मारहाणीला बळी पडलेल्या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़योगेश विजय आयरे, लवेश विजय आयरे, अक्षय भाटकर, अनिकेत अनिल कदम व वृषभ आलीम (परटवणे, रत्नागिरी) हे पाच मित्र हातखंबा येथे जेवण करण्यासाठी गेले होते़ जेवण आटोपून ते सोमवारी मध्यरात्री घरी येण्यासाठी निघाले़ त्यावेळी कारवांचीवाडी येथे गस्तीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले़ त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन थर्ड डिग्रीचा वापर करून मारहाण केली़ त्यावेळी लवेश आयरे व योगेश आयरे यांच्या आईने त्यांना फोन करण्याचाही प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांचे मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले होते़रात्रभर नवनवीन पोलीस येऊन या पाच तरुणांची धुलाई करत होते, तर जुने पोलीस नवख्या पोलिसांना आरोपींना कसे मारायचे, यांची प्रात्यक्षिके करून दाखवित होते़ त्यामुळे पोलिसांच्या खेळात या पाचहीजणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मध्यरात्री २ ते ५ यावेळेत या पाचही तरुणांना बेदम मारहाण करून सकाळी सोडून देण्यात आले़ त्यांची बाईक, एटीएम कार्ड व सोन्याचे ब्रेसलेट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले़ पोलिसांच्या माराने घाबरलेले हे तरुण कारवांचीवाडी ते परटवणे चालत आले़ त्यांच्या अंगावरील खाणाखुणा पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना विचारणा केली़ त्यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला़ त्यामुळे या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़