शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भारताने तीन मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे

By admin | Updated: January 13, 2016 21:57 IST

अनिल काकोडकर : वेळणेश्वर महाविद्यालयात दोन विज्ञान विभागांचे उद्घाटन

 गुहागर : भारताला नवीन विकासाची क्षितिजे पादाक्रांत करायची असतील तर भारताने शिक्षण, सुविधा व दळणवळण या तीन मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केले. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे विद्याप्रसारक मंडळाचे सेंटर फॉर करियर अ‍ॅड स्कील डेव्हलोपमेंट आणि कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट या दोन विभागांचे उद्घाटन काकोडकर व प्रसिध्द उद्योगपती दीपक घैसास यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काकोडकर म्हणाले की, आज आपण ज्ञान युगात वावरत आहोत. या ज्ञान युगात टिकून राहण्यासाठी प्रक्रिया आधारित दृष्टीकोन व व्यावसायिकता यांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षणाकडे संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. शिक्षण, उद्योग, संशोधन यांचा एकत्रित असा दृष्टीकोन म्हणजेच होलिस्टिक अ‍ॅप्रोच अंगिकारला पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणात हा सकारात्मक बदल करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. भारतातील बहुसंख्य लोक हे आजही खेडेगावात राहतात. शहरातील बेरोजगारांपेक्षा खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण हे अधिक आहे. त्यासाठी खेडेगावातच उद्योग व तंत्रज्ञान यांचा विकास करणे आवश्यक आहे, असे काकोडकर म्हणाले. अनुभवी शास्त्रज्ञांचा ग्रामीण भागातील विद्यार्थांना फायदा मिळावा, यासाठी विद्या प्रसारक मंडळाने निर्माण केलेले कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. व्याख्याने, प्रकल्प यांच्या माध्यमातून याचा निश्चितच फायदा होईल. आपण सर्वांनी समाजातील या नवीन तंत्रज्ञानाच्या युगाचा अंगिकार केला पाहिजे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमप्रसंगी उद्योगपती दीपक घैसास यांनी त्यांच्या अनुभवात आलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख करून उद्योग, उद्योजकता व उद्योजक यांच्या विविध पैलूंविषयी माहिती सांगितली. चांगला उद्योजक होण्यासाठी अभिजात कल्पकता असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी केले. शिक्षणामुळे कौशल्य असलेले विद्यार्थी तर घडायला हवेतच, पण सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडणेही आवश्यक आहे. या कार्यक्रमप्रसंगी विविध विज्ञान शाखांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट या संकल्पनेचे जनक व विद्या प्रसारक मंडळाचे सचिव जयंत कयाल, नातू प्रतिष्ठानचे संचालक डॉ. विनय नातू, महाविद्यालयाचे संचालक डॉ. कमलाकर देसाई, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा कामत उपस्थित होत्या. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थांचे व डॉ. अनिल काकोडकरांचे चर्चा सत्र आयोजित केले होते. बुधवारी दिवसभर विविध वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थांसाठी कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट शास्त्रज्ञांची व्याख्याने पार पाडली. या व्याख्यानात डॉ. राजेंद्र आगरकर यांनी आरोग्यविषयक व्याख्यान दिले. (प्रतिनिधी)