शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

विमानतळाच्या जागेसाठी वाढीव दर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : विमाने उतरण्यासाठी रत्नागिरीतील विमानतळ पुरेसे आहे. मात्र विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा ताब्यात येईपर्यंत काही ...

रत्नागिरी : विमाने उतरण्यासाठी रत्नागिरीतील विमानतळ पुरेसे आहे. मात्र विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा ताब्यात येईपर्यंत काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. अजून ५० एकर जागेची त्यासाठी गरज असून, खास बाब म्हणून त्याला अधिक दर मिळावा, असा प्रस्ताव संबंधितांकडे पाठवण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री सामंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे विमानतळाच्या कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सर्व प्रांताधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आणि ग्रामस्थही उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली.

विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्णत्त्वाला गेले आहे. येथे विमान उतरू शकते. मात्र विमानाच्या पार्किंगसाठी अधिक जागेची गरज आहे. सध्या पाच हजार रुपये गुंठा इतका दर दिला जात आहे. तो खूपच कमी आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी दीपक कपूर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. खास बाब म्हणून जागेचा अधिक मोबदला देण्याचा प्रस्ताव आपण पाठवत आहोत. त्याला नक्की मंजुरी मिळेल. अर्थात ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत विमानतळाचे काम अडू नये, यासाठी काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.

यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आपल्याकडून सुरू असून, लवकरच विमान वाहतूक सुरू व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.