शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

परतीच्या प्रवासासाठी गाड्यांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी शासकीय निर्बंध शिथिल असल्याने यावर्षी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. पाच दिवसांच्या गाैरी-गणपती विसर्जनानंतर अनेक ...

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी शासकीय निर्बंध शिथिल असल्याने यावर्षी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. पाच दिवसांच्या गाैरी-गणपती विसर्जनानंतर अनेक मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे व एस.टी. ने जादा गाड्यांची व्यवस्था उपलब्ध केली आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तब्बल १ लाख ९१६ मुंबईकर गावी आले होते. यामध्ये रेल्वेद्वारे ३१०९०, बसद्वारे २४८५८, खासगी वाहनातून २२,२९९, खासगी आराम बसने २२,६६९ लोक आले आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी ११०० एस. टी. बसेस मुंबईतून दाखल झाल्या हाेत्या. गणेशोत्सवात दि. १४ सप्टेंबरपासून ते दि.२२ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्याचे नियोजन रत्नागिरी विभागातून करण्यात आले आहे. आतापर्यंत ९९९ जादा गाड्यांचे आरक्षण झाले असून, त्यामध्ये २१५ ग्रुप बुकिंगच्या गाड्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६९ गाड्या मुंबईला रवाना झाला आहेत. उर्वरित ३० गाड्यांचे नियोजन दि.२२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या दिवसाला ५० गाड्या धावत असून, गणेशोत्सवासाठी दि. ६ ते २५ सप्टेंबरपर्यंत विशेष २६४ गाड्या फेऱ्या धावत आहेत. दिवा-सावंतवाडी व दादर रत्नागिरी या दोन पॅसेंजर आरक्षित गाड्या सुरू केल्या आहे. या दाेन्ही गाड्यांना सर्व स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या आरक्षित असल्याने डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी हाेत नाही. मांडवी, कोकणकन्या स्पेशल गाड्यांना जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

----------------------

रत्नागिरी विभागाने यावर्षी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या गावी एस.टी.ची उपलब्धता केली होती. त्यानुसार २३० गाड्या गावातील मुंबईकरांसाठी सोडण्यात आल्या. एस.टीच्या या उपक्रमामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर झाली.

------------------------

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर २५३ फेऱ्या सोडण्यात आल्या असून, परतीसाठी विशेष १० गाड्यांचे नियोजन केले आहे. सर्वच विशेष गाड्यांचे आगाऊ आरक्षण असल्याने मुंबईकरांना तातडीचे तिकीट मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे एस. टी. व खासगी आराम बसच्या गाड्यांना गर्दी होत आहे.

--------------------

मास्कबरोबर दोन्ही लसीकरण झालेल्यांचा युनिव्हर्सल पास, ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केले असल्याचे प्रमाणपत्र या गोष्टी सक्तीच्या होत्या. मात्र, एस.टी.मध्ये मास्क सक्तीचा होता; परंतु लसीकरणाची मात्रा, कोरोना प्रमाणपत्राची सक्ती नसल्याने एस.टी.ला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लाभला.