शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

रत्नागिरी जिल्ह्यात बलात्काराच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:48 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २०१८ या वर्षात २०१७च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. अत्यंत कडक स्वरुपाचे कायदे असतानाही बलात्कारांच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २०१८ या वर्षात २०१७च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. अत्यंत कडक स्वरुपाचे कायदे असतानाही बलात्कारांच्या संख्येत झालेली ही वाढ चिंताजनक आहे. मात्र, जिल्ह्यातील पोलिसांनी २०१८मधील बलात्काराचे सर्व गुन्हे उघड केले आहेत. तसेच जिल्हा पोलिसांनी केलेल्या जनजागृतीमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात २०१७पेक्षा २०१८ मध्ये घट झाली आहे.गुन्हेगारांना कडक शासन करणारे कायदे प्रभावीपणे वापरले जात असल्याने व जनतेलाही तक्रारी दाखल करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे याआधी गुन्हे दाखल करण्यास घाबरणाऱ्या पीडितांना बळ मिळाले. कोणालाही न घाबरता झालेल्या अन्यायाबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी आॅनलाईन व वॉट्सअ‍ॅपचे नंबरही पोलीस खात्याकडून देण्यात आले. सर्वच महत्त्वाच्या पोलीस स्थानकात येणाºयांना गुन्हे दाखल करण्याबाबत मार्गदर्शन करणारे कक्षही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळेच भीतीपोटी दाखल न होणारे गुन्हेही आता निडरपणे दाखल करण्यास पीडित पुढे येत आहेत.सन २०१७मध्ये जिल्ह्यात बलात्काराचे ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ४६ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, २०१८मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये २०१७पेक्षा ९ गुन्ह्यांनी वाढ झाली. २०१८मध्ये बलात्काराचे ५६ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले. हे सर्व गुन्हे त्याच वर्षी उघडकीस आले. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी चांगल्या प्रकारे केलेले काम यामुळेच हे शक्य झाले. अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून अधिक प्रभावीपणे पुराव्यांची मांडणी व्हावी, ही जनतेची अपेक्षा आहे.सन २०१८मध्ये २०१७ च्या तुलनेत विनयभंगाचे गुन्हे कमी झाले आहेत. २०१७मध्ये विनयभंगाचे १०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ९६ गुन्ह्यांचा तपास झाला. २०१८मध्ये विनयभंगाचे ७८ गुन्हे दाखल झाले व त्यातील ७७ गुन्ह्यांचा म्हणजेच शंभर टक्के तपास झाला. सन २०१८मध्ये रत्नागिरीत जे बलात्काराचे ५६ गुन्हे घडले त्यामधील १५ बलात्काराचे गुन्हे हे लहान मुलींवरील आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये बाजू मांडण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे.