शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात बलात्काराच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:48 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २०१८ या वर्षात २०१७च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. अत्यंत कडक स्वरुपाचे कायदे असतानाही बलात्कारांच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २०१८ या वर्षात २०१७च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. अत्यंत कडक स्वरुपाचे कायदे असतानाही बलात्कारांच्या संख्येत झालेली ही वाढ चिंताजनक आहे. मात्र, जिल्ह्यातील पोलिसांनी २०१८मधील बलात्काराचे सर्व गुन्हे उघड केले आहेत. तसेच जिल्हा पोलिसांनी केलेल्या जनजागृतीमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात २०१७पेक्षा २०१८ मध्ये घट झाली आहे.गुन्हेगारांना कडक शासन करणारे कायदे प्रभावीपणे वापरले जात असल्याने व जनतेलाही तक्रारी दाखल करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे याआधी गुन्हे दाखल करण्यास घाबरणाऱ्या पीडितांना बळ मिळाले. कोणालाही न घाबरता झालेल्या अन्यायाबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी आॅनलाईन व वॉट्सअ‍ॅपचे नंबरही पोलीस खात्याकडून देण्यात आले. सर्वच महत्त्वाच्या पोलीस स्थानकात येणाºयांना गुन्हे दाखल करण्याबाबत मार्गदर्शन करणारे कक्षही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळेच भीतीपोटी दाखल न होणारे गुन्हेही आता निडरपणे दाखल करण्यास पीडित पुढे येत आहेत.सन २०१७मध्ये जिल्ह्यात बलात्काराचे ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ४६ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, २०१८मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये २०१७पेक्षा ९ गुन्ह्यांनी वाढ झाली. २०१८मध्ये बलात्काराचे ५६ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले. हे सर्व गुन्हे त्याच वर्षी उघडकीस आले. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी चांगल्या प्रकारे केलेले काम यामुळेच हे शक्य झाले. अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून अधिक प्रभावीपणे पुराव्यांची मांडणी व्हावी, ही जनतेची अपेक्षा आहे.सन २०१८मध्ये २०१७ च्या तुलनेत विनयभंगाचे गुन्हे कमी झाले आहेत. २०१७मध्ये विनयभंगाचे १०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ९६ गुन्ह्यांचा तपास झाला. २०१८मध्ये विनयभंगाचे ७८ गुन्हे दाखल झाले व त्यातील ७७ गुन्ह्यांचा म्हणजेच शंभर टक्के तपास झाला. सन २०१८मध्ये रत्नागिरीत जे बलात्काराचे ५६ गुन्हे घडले त्यामधील १५ बलात्काराचे गुन्हे हे लहान मुलींवरील आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये बाजू मांडण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे.