शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

लाॅकडाऊननंतरही रुग्णवाढ थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : जिल्ह्यासह महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ३ ते ९ जून या कालावधीत ...

रत्नागिरी : जिल्ह्यासह महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ३ ते ९ जून या कालावधीत लाॅकडाऊन आणखी कडक केले होते. मात्र, तरीही रुग्णवाढ कमी झालेली नाही. उलट वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ८ हजारपेक्षा रुग्णसंख्या वाढली आहे. एप्रिल-मे महिन्यापेक्षाही जून महिन्यात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येचा आलेख उंचावणार, अशी शक्यता वाटू लागली आहे.

कोरोनाच्या संख्येत शिमगोत्सव झाल्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातही १५ एप्रिलनंतर आठवड्याचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. तरीही संख्या आटोक्यात न आल्याने पुढे तो सात दिवसांचा आणि त्यानंतर पंधरा दिवसांचा करण्यात आला. १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत लाॅकडाऊन करूनही जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी न होता वाढू लागला. त्यामुळे एप्रिल अखेर जिल्ह्यातील या महिन्यातच रुग्णसंख्या ११ हजार २५४ इतकी झाली, तर एकूण संख्या २२ हजार २८३ झाली. उलट १५ एप्रिलनंतर दरदिवशी सापडलेल्या रुग्णांची संख्या ५०० पेक्षा जास्त झाली आणि अगदी ७९१ पर्यंत पाेहोचली. एकूण मृत्यूंची संख्या ६५६ होती.

लाॅकडाऊन वाढले, तरीही संख्येचा आलेख खाली न येता अधिकच वाढला. लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील दुकानेच केवळ सुरू होती. मात्र, तरीही १ ते ३१ मे या महिनाभराच्या कालावधीत १४ हजार १५६ रुग्ण जिल्ह्यात वाढले, तर एकूण मृत्यूचा आकडा १,२३९ (३.४० टक्के) वर पोहोचला.

जून महिन्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही, हे लक्षात येताच, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ३ ते ९ जून या कालावधीत लाॅकडाऊन अधिक कडक केले. त्यामुळे दूध आणि औषधे वगळून इतर सर्वच अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या, तसेच कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे या कालावधीत अधिकाधिक रुग्ण सापडणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू का होईना कमी होईल, असे वाटत हाेते.

मात्र, आता १५ जून उजाडले, तरीही जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी न होता अधिकच वाढली आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत दररोज ३८९ ते अगदी ५९२ पर्यंत रुग्ण बाधित होत आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर यात कुठेही रुग्णवाढ कुठेही आटोक्यात आलेली दिसत नाही.

चाचण्या वाढल्या, पण...

आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असली, तरी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अतिवेगाने पसरला आहे. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाच्या चाचण्या वाढण्याबरोबरच ग्रामीण भागात अजूनही आजार घरातच लपविला जात आहे. त्यासाठी गावच्या कृती दलाने याबाबत सतर्क राहून दर दिवशीच माहिती घ्यायला हवी. काही गावातील कृती दल आता सक्रिय झाल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात काही अंशी त्यांना यश मिळत आहे.

महिना रुग्णवाढ मृत्यू

एप्रिल ११,२५४ २८०

मे १४,१५६ ५८३

१ ते १४ जून ७,७४७ २९५

आतापर्यंत ४४,६४९ १५३४

१ ते १५ जून या दरम्यानची रुग्णसंख्या

१ ६५५

२ ६१०

३ ३८९

४ ५९०

५ ५८२

६ ५६७

७ ४२९

८ ५६७

९ ५२५

१० ५३८

११ ६९३

१२ ४२६

१३ ५८४

१४ ५९२