शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

आजाराकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोना मृतांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आजाराकडे होणारे दुर्लक्ष, वेळीच न केली जाणारी चाचणी आणि कोरोनाबाबतची भीती यांमुळे मे महिन्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आजाराकडे होणारे दुर्लक्ष, वेळीच न केली जाणारी चाचणी आणि कोरोनाबाबतची भीती यांमुळे मे महिन्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. मे महिन्याच्या २२ दिवसांत ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. मात्र त्याबाबतची बेफिकिरी अजूनही दूर झालेली नाही. त्यातही चाचणी टाळण्याकडे लोकांचा कल असल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

मार्च महिनाअखेरीस जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या ३७६ होती. एप्रिलअखेर हीच संख्या ६५६ झाली. आता २२ मेपर्यंत ही संख्या १०४६ इतकी झाली आहे. या २२ दिवसांत जिल्ह्यात ३९० मृत्यू झाले आहेत. यात रत्नागिरी आणि चिपळूण हे दोन तालुके आघाडीवर आहेत. त्यातही गेले दोन दिवस ३० पेक्षा अधिक मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत.

मृतांमध्ये ६० वर्षांवरील लोकांची संख्या अधिक असली तरी त्याच वेळी ४० ते ६० या वयोगटातील लोकही त्यात आहेत आणि काही तरुणांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

...................

काय आहेत कारणे

१. आजारपणाकडे होणारे दुर्लक्ष

सर्दी, खोकला किंवा ताप असतानाही तो अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची तपासणी तत्काळ करून घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आजार बळावल्यानंतर लोक तपासणीला येतात आणि तोपर्यंत आजार फुप्फुसापर्यंत पोहोचतो. उशिराने सुरू झालेले उपचार हे यातील प्रमुख कारण आहे.

२. ग्रामीण भागात जवळजवळ निम्म्या घरांमध्ये वृद्ध दाम्पत्यच राहते. मुले, सुना, नातवंडे शहरात असतात. अशा वृद्धांना होणाऱ्या आजारांकडे तत्काळ लक्ष दिले जात नाही. ही वृद्ध माणसे आधी घरगुती उपचार करतात. मग आजार बरा होत नाही म्हणून रुग्णालयात जातात आणि नंतर कोरोना चाचणी होते. त्यात उपचारांना उशीर होतो.

३. कोरोना झाल्याचे समजल्यानंतर मानसिकदृष्ट्या लोक खचून जातात. त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढत नाही. अशा वेळी सकारात्मक विचारांचे बळ रुग्णाला मोठे आधार देते. मात्र कोरोनाच्या भीतीने रुग्ण दगावतात, हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे.

..............................

रुग्णांशी थेट संपर्क

सर्दी, ताप, खोकला असलेले रुग्ण जर खासगी डॉक्टरांकडे गेले तर त्याची माहिती त्याच दिवशी त्या डॉक्टरांकडून आरोग्य यंत्रणेला दिला जात आहे. आता यावर अधिक लक्ष दिले जात आहे. त्या त्या भागांतील आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णांशी सतत संपर्क साधला जाणार आहे. त्यांचा आजार कमी झाला की नाही, याची माहिती घेतली जाणार आहे. जर आजार कमी झाला नसेल तर त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यातून रुग्ण लवकर समोर येतील. अशा किती रुग्णांशी संपर्क झाला, याबाबतची माहिती दररोज जिल्हा कार्यालयाकडून तालुका पातळीवर विचारली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

.........................

सर्दी, ताप, खोकला किंवा अशक्तपणा यांबाबतचा कोणताही आजार असलेल्या रुग्णांनी आजाराच्या अगदी पहिल्या दिवशीच कोरोना चाचणी करुन घ्यावी. जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यावर लगेचच विनाविलंब उपचार होऊ शकतात. या लक्षणांचे आजार अंगावर काढू नयेत किंवा त्याकडे दुर्लक्षही केले जाऊ नये.

- डॉ. बबिता कमलापूरकर

जिल्हा आरोग्याधिकारी, रत्नागिरी