शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आजाराकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोना मृतांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आजाराकडे होणारे दुर्लक्ष, वेळीच न केली जाणारी चाचणी आणि कोरोनाबाबतची भीती यांमुळे मे महिन्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आजाराकडे होणारे दुर्लक्ष, वेळीच न केली जाणारी चाचणी आणि कोरोनाबाबतची भीती यांमुळे मे महिन्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. मे महिन्याच्या २२ दिवसांत ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. मात्र त्याबाबतची बेफिकिरी अजूनही दूर झालेली नाही. त्यातही चाचणी टाळण्याकडे लोकांचा कल असल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

मार्च महिनाअखेरीस जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या ३७६ होती. एप्रिलअखेर हीच संख्या ६५६ झाली. आता २२ मेपर्यंत ही संख्या १०४६ इतकी झाली आहे. या २२ दिवसांत जिल्ह्यात ३९० मृत्यू झाले आहेत. यात रत्नागिरी आणि चिपळूण हे दोन तालुके आघाडीवर आहेत. त्यातही गेले दोन दिवस ३० पेक्षा अधिक मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत.

मृतांमध्ये ६० वर्षांवरील लोकांची संख्या अधिक असली तरी त्याच वेळी ४० ते ६० या वयोगटातील लोकही त्यात आहेत आणि काही तरुणांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

...................

काय आहेत कारणे

१. आजारपणाकडे होणारे दुर्लक्ष

सर्दी, खोकला किंवा ताप असतानाही तो अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची तपासणी तत्काळ करून घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आजार बळावल्यानंतर लोक तपासणीला येतात आणि तोपर्यंत आजार फुप्फुसापर्यंत पोहोचतो. उशिराने सुरू झालेले उपचार हे यातील प्रमुख कारण आहे.

२. ग्रामीण भागात जवळजवळ निम्म्या घरांमध्ये वृद्ध दाम्पत्यच राहते. मुले, सुना, नातवंडे शहरात असतात. अशा वृद्धांना होणाऱ्या आजारांकडे तत्काळ लक्ष दिले जात नाही. ही वृद्ध माणसे आधी घरगुती उपचार करतात. मग आजार बरा होत नाही म्हणून रुग्णालयात जातात आणि नंतर कोरोना चाचणी होते. त्यात उपचारांना उशीर होतो.

३. कोरोना झाल्याचे समजल्यानंतर मानसिकदृष्ट्या लोक खचून जातात. त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढत नाही. अशा वेळी सकारात्मक विचारांचे बळ रुग्णाला मोठे आधार देते. मात्र कोरोनाच्या भीतीने रुग्ण दगावतात, हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे.

..............................

रुग्णांशी थेट संपर्क

सर्दी, ताप, खोकला असलेले रुग्ण जर खासगी डॉक्टरांकडे गेले तर त्याची माहिती त्याच दिवशी त्या डॉक्टरांकडून आरोग्य यंत्रणेला दिला जात आहे. आता यावर अधिक लक्ष दिले जात आहे. त्या त्या भागांतील आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णांशी सतत संपर्क साधला जाणार आहे. त्यांचा आजार कमी झाला की नाही, याची माहिती घेतली जाणार आहे. जर आजार कमी झाला नसेल तर त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यातून रुग्ण लवकर समोर येतील. अशा किती रुग्णांशी संपर्क झाला, याबाबतची माहिती दररोज जिल्हा कार्यालयाकडून तालुका पातळीवर विचारली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

.........................

सर्दी, ताप, खोकला किंवा अशक्तपणा यांबाबतचा कोणताही आजार असलेल्या रुग्णांनी आजाराच्या अगदी पहिल्या दिवशीच कोरोना चाचणी करुन घ्यावी. जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यावर लगेचच विनाविलंब उपचार होऊ शकतात. या लक्षणांचे आजार अंगावर काढू नयेत किंवा त्याकडे दुर्लक्षही केले जाऊ नये.

- डॉ. बबिता कमलापूरकर

जिल्हा आरोग्याधिकारी, रत्नागिरी