शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मिरजोळी गावाला वायरमन नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास ...

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेजारील गावातील वायरमनला बाेलवावे लागत आहे. महावितरणने याची दखल घेऊन मिरजोळी गावाला तत्काळ वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच गावातील पथदीपही बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडत रहावे लागत आहे. एखादे वादळ आल्यास अथवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास वीजवाहिनीवर फांदी पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. अशावेळी शेजारील गावातील वायरमनला पाचारण करून वीजपुरवठा सुरळीत करावा लागत आहे. वायरमन नसल्याने वीजखांबावरील बंद दिवेसुद्धा बदलता येत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण गावामध्ये अंधार असतो. मिरजोळी हे गाव शहरालगत असूनही या गावासाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मिरजोळी ग्रामस्थांमधून होत आहे.