शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मिरजोळी गावाला वायरमन नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास ...

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेजारील गावातील वायरमनला बाेलवावे लागत आहे. महावितरणने याची दखल घेऊन मिरजोळी गावाला तत्काळ वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच गावातील पथदीपही बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडत रहावे लागत आहे. एखादे वादळ आल्यास अथवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास वीजवाहिनीवर फांदी पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. अशावेळी शेजारील गावातील वायरमनला पाचारण करून वीजपुरवठा सुरळीत करावा लागत आहे. वायरमन नसल्याने वीजखांबावरील बंद दिवेसुद्धा बदलता येत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण गावामध्ये अंधार असतो. मिरजोळी हे गाव शहरालगत असूनही या गावासाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मिरजोळी ग्रामस्थांमधून होत आहे.