शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

‘ब’ वर्गातील पर्यटनस्थळी असुविधा

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

राजापूर तालुका : पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या आंबोळगडात प्राथमिक सुविधांचा अभाव

राजापूर : पर्यटकांचा ओढा कोकणात वाढावा यासाठी शासनाकडून होत असलेले प्रयत्न कसे तोकडे आहेत ते पुढे आले आहे. शासनाच्या ‘ब’ वर्गात सामाविष्ट असलेल्या आंबोळगड या निसर्गरम्य गावाला आजही अनेक प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे पर्यटक येतात पण सुविधांच्या अभावामुळे त्यांना पर्यटनाचा आनंद काही लुटता येत नाही, हे वास्तव अधोरेखीत झाले आहे.राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गरम्य परिसरात आंबोळगड वसले असून, गावाला लाभलेला विस्तीर्ण सागरकिनारा हाच खऱ्या अर्थाने पर्यटकांना मोहून टाकतो. नाटे महसुली गावाच्या हद्दीत समावेश होणाऱ्या आंबोळगडची लोकसंख्या साधारणत: हजारच्या आसपास आहे. निसर्गाने या परिसराला भरभरुन दिले आहे, पण शासनाकडून येथील सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील जनतेला उपजीविकेसाठी मुंबईसह अन्यत्र जावे लागते. त्यामुळे आज गावाची लोकसंख्या खूपच कमी असून, त्याचे परिणाम येथील शाळांवर जाणवतात. विद्यार्थी संख्या कमी असल्याने तेथील शाळाच बंद करण्याची पाळी आली होती. आंबोळगड गाव हा पर्यटनात्मकदृष्ट्या शासनाच्या ‘ब’ वर्गात सामाविष्ट असून, याठिकाणी लाभलेला समुद्रकिनारा हा खऱ्या अर्थाने पर्यटकांना खुणावत असतो. हा बीच धोकादायकही नाही.आंबोळगडला मोठा सागरकिनारा लाभला आहे. तसेच गगनगिरी महाराजांचा आश्रमही या गावात आहे. पर्यटन स्थळात समावेश असल्याने या गावाला ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या, त्या मात्र अजूनही मिळालेल्या नाहीत. प्राथमिक सुविधांची तर येथे वानवाच आहे. देशी - विदेशी पर्यटकांचा ओढा सातत्याने या गावाकडे असतो. पण इथे आल्यानंतर पर्यटकांसाठी निवास सुविधा उपलब्ध नाही. समुद्रकिनाऱ्यावर एक छोटेसे हॉटेल आहे. पण त्याला मर्यादा आहेत. याठिकाणी जादा खोल्या निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र टुरिझम मंडळाची परवानगी नाही. पर्यटनासाठी गावात आलेला पर्यटक हा कुठे ना कुठे स्थानिकांच्या घरीच वस्ती करतो. आंबोळगडमधून कुठेही मोबाईलवरुन संपर्क करायचा म्हटले तर याठिकाणी पुरेशी रेंज नाही. कारण नाटे- जैतापूर परिसरात असलेल्या विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरवरुन आंबोळगड येथे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना असुविधेचा सामना करावा लागतो. आंबोळगड गाव हा सीआरझेड खाली येतो. त्यामुळे नवीन घर बांधणीचे अधिकार हे स्थानिक ग्रामपंचायतीला नाहीत. त्यामुळे परवानगीसाठी तालुका पातळीवर यावे लागते. आजवर निर्माण झालेल्या सर्व समस्यांचा परिणाम हा आंबोळगडच्या विकास प्रक्रियेवर होत आहे. एकीकडे शासनाने आंबोळगडला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे गावातील प्रलंबित अनेक समस्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी शासन पार पाडत नाही, हेच सत्य आता पुढे आले आहे. निदान आतातरी शासनाने आंबोळगडच्या विविध समस्या सोडवाव्यात व या पर्यटन स्थळाला उर्जीतावस्था द्यावी, अशी आग्रहाची मागणी आंबोळगड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)