शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘ब’ वर्गातील पर्यटनस्थळी असुविधा

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

राजापूर तालुका : पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या आंबोळगडात प्राथमिक सुविधांचा अभाव

राजापूर : पर्यटकांचा ओढा कोकणात वाढावा यासाठी शासनाकडून होत असलेले प्रयत्न कसे तोकडे आहेत ते पुढे आले आहे. शासनाच्या ‘ब’ वर्गात सामाविष्ट असलेल्या आंबोळगड या निसर्गरम्य गावाला आजही अनेक प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे पर्यटक येतात पण सुविधांच्या अभावामुळे त्यांना पर्यटनाचा आनंद काही लुटता येत नाही, हे वास्तव अधोरेखीत झाले आहे.राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गरम्य परिसरात आंबोळगड वसले असून, गावाला लाभलेला विस्तीर्ण सागरकिनारा हाच खऱ्या अर्थाने पर्यटकांना मोहून टाकतो. नाटे महसुली गावाच्या हद्दीत समावेश होणाऱ्या आंबोळगडची लोकसंख्या साधारणत: हजारच्या आसपास आहे. निसर्गाने या परिसराला भरभरुन दिले आहे, पण शासनाकडून येथील सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील जनतेला उपजीविकेसाठी मुंबईसह अन्यत्र जावे लागते. त्यामुळे आज गावाची लोकसंख्या खूपच कमी असून, त्याचे परिणाम येथील शाळांवर जाणवतात. विद्यार्थी संख्या कमी असल्याने तेथील शाळाच बंद करण्याची पाळी आली होती. आंबोळगड गाव हा पर्यटनात्मकदृष्ट्या शासनाच्या ‘ब’ वर्गात सामाविष्ट असून, याठिकाणी लाभलेला समुद्रकिनारा हा खऱ्या अर्थाने पर्यटकांना खुणावत असतो. हा बीच धोकादायकही नाही.आंबोळगडला मोठा सागरकिनारा लाभला आहे. तसेच गगनगिरी महाराजांचा आश्रमही या गावात आहे. पर्यटन स्थळात समावेश असल्याने या गावाला ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या, त्या मात्र अजूनही मिळालेल्या नाहीत. प्राथमिक सुविधांची तर येथे वानवाच आहे. देशी - विदेशी पर्यटकांचा ओढा सातत्याने या गावाकडे असतो. पण इथे आल्यानंतर पर्यटकांसाठी निवास सुविधा उपलब्ध नाही. समुद्रकिनाऱ्यावर एक छोटेसे हॉटेल आहे. पण त्याला मर्यादा आहेत. याठिकाणी जादा खोल्या निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र टुरिझम मंडळाची परवानगी नाही. पर्यटनासाठी गावात आलेला पर्यटक हा कुठे ना कुठे स्थानिकांच्या घरीच वस्ती करतो. आंबोळगडमधून कुठेही मोबाईलवरुन संपर्क करायचा म्हटले तर याठिकाणी पुरेशी रेंज नाही. कारण नाटे- जैतापूर परिसरात असलेल्या विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरवरुन आंबोळगड येथे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना असुविधेचा सामना करावा लागतो. आंबोळगड गाव हा सीआरझेड खाली येतो. त्यामुळे नवीन घर बांधणीचे अधिकार हे स्थानिक ग्रामपंचायतीला नाहीत. त्यामुळे परवानगीसाठी तालुका पातळीवर यावे लागते. आजवर निर्माण झालेल्या सर्व समस्यांचा परिणाम हा आंबोळगडच्या विकास प्रक्रियेवर होत आहे. एकीकडे शासनाने आंबोळगडला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे गावातील प्रलंबित अनेक समस्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी शासन पार पाडत नाही, हेच सत्य आता पुढे आले आहे. निदान आतातरी शासनाने आंबोळगडच्या विविध समस्या सोडवाव्यात व या पर्यटन स्थळाला उर्जीतावस्था द्यावी, अशी आग्रहाची मागणी आंबोळगड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)