शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही शेतीतून मिळविले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील चंद्रकांत बाबू ठोंबरे ६२ वर्षांचे आहेत; मात्र गेली ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील चंद्रकांत बाबू ठोंबरे ६२ वर्षांचे आहेत; मात्र गेली ३५ ते ४० वर्षे शेतीमध्ये असून, बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवीत आहेत. पावसाळी भात व त्यानंतर विविध पिके घेत आहेत. सेंद्रिय शेतीवर भर असल्यामुळे त्यांनी तीन गांडूळ खत युनिट उभारली आहेत. शेतासाठी आवश्यक खताचा वापर करून उर्वरित खत मात्र ते विकत आहेत.

अल्पशिक्षित असलेले ठोंबरे यांनी गेल्या ३५ वर्षांत अनुभवाचे गाठोडे बांधले आहे. पावसाळी भात उत्पादन घेतल्यानंतर भाजीपाला शेती घेत असले तरी त्यासाठी योग्य नियोजन करून शेतात विविध प्रयोगही करीत आहेत. मुळा, माठ, कोथिंबीरसह चवळी, वांगी, कुळीथ, भेंडी, पडवळ, दोडके, मिरची, पावटा लागवड करीत आहेत. सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असल्याने उत्पन्नाचा दर्जा चांगला असून, विक्री स्थानिक बाजारपेठेत हातोहात होत आहे.

निव्वळ शेती नाही, तर व्यावसायिकदृष्ट्या शेतीतून उत्पादन मिळविण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी त्यांच्या कुुटुंबीयांचे सहकार्य लाभत आहे. बियाणे निवडीपासून, खत व्यवस्थापन ते उत्पादने विक्रीपर्यंत त्यांचे बारकाईने लक्ष असते.

चंद्रकांत ठोंबरे यांनी लागवड केलेल्या भाजीपाला शेतीची पाहणी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर यांनी करून मार्गदर्शन केले.

बारमाही शेती करीत असताना चंद्रकांत ठोंबरे पालेभाज्या, तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत आहेत.

काजू , नारळ उत्पादन

ठोंबरे यांनी दोनशे काजूच्या झाडांची लागवड केली आहे. दरवर्षी त्यांना तीन ते साडेतीन टन काजू बी प्राप्त होते. शहरात चांगला दर प्राप्त होत असल्याने काजूची विक्री करीत आहेत. यावर्षी मात्र काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. पन्नास नारळ लागवड करण्यात आली असून, उत्पादित नारळ स्थानिक पातळीवर विक्री करीत आहेत. सध्या नारळाला चांगला दर प्राप्त होत असून, विक्रीही चांगल्या प्रकारे होत आहे.

मिरची उत्पादन

सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसह कोथिंबीर, वांगी, चवळी, पावटा, कुळीथ लागवड करीत आहेत. याशिवाय, हिरव्या मिरचीचे ते उत्पादन घेत आहेत. मिरची लागवडीतून चांगला फायदा होत असल्याचे ठोंबरे यांचे मत आहे. भात काढणीनंतर कुळीथ लागवड करतात. जाकादेवी, तसेच कोतवडे बाजारातच त्यांच्याकडील उत्पादित भाज्यांची विक्री होत आहे. लाॅकडाऊनमुळे घराशेजारीच विक्री शक्य होत आहे.

खतातून उत्पन्न

सेंद्रिय शेतीवर भर असल्याने ठोंबरे यांनी गांडूळ खत निर्मितीची तीन युनिट तयार केली आहेत. दर तीन महिन्यांनी एक टन खत उत्पन्न प्राप्त होत असून, वर्षाला १० ते १२ टन खत प्राप्त होत आहेत. आवश्यक तेवढे खत शेतीसाठी वापरून उर्वरित खताच्या विक्रीतून उत्पन्न मिळवीत आहेत. याद्वारे त्यांना चांगले अर्थार्जन प्राप्त होत आहे.

हळद लागवड

पावसाळ्यात भाताचे उत्पादन घेत असताना दोन गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करीत आहेत. पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावर हळद लागवड करण्यात येत आहे. २५ ते ३० किलो हळद उत्पादन घेण्यात येत असून, विक्रीतून त्यांना उत्पन्न मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या हळदीचा दर्जा चांगला असून, हळदीला चांगली मागणी होत आहे.