शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची वाढ झपाट्याने वाढत असली, तरी रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज या तालुक्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची वाढ झपाट्याने वाढत असली, तरी रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज या तालुक्यात १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात कोरोनाची सर्वात जास्त संख्या असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खोदाईची कामे कधी थांबणार

रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला असला, तरी रत्नागिरी शहर परिसरातील रस्त्यांची खोदाईची कामे सुरू आहेत. शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी खोदाई करून साइडपट्ट्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर, पुन्हा या साइडपट्ट्यांची खोदाई सुरू झाल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.

मासेमारी व्यवसाय तोट्यात

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. वातावरणातील सततच्या बदलामुळे मासेमारी अनेकदा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढल्याने त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. त्यामुळे मच्छीमार तोट्यात असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पाणीटंचाईने लोक हैराण

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टंचाईग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने लोकांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. ५ गावांतील ७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू असून, २ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तोही अपुरा पडत आहे.

मजुरांचे हाल

रत्नागिरी : कोरोनाचा सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला असला, तरी हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दानशूरांनी मोठ्या प्रमाणात गरीब, मजुरांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असले, तरी मदत करणाऱ्यांनी हात अखडते घेतले आहेत.

काजू बी व्यवसाय ठप्प

रत्नागिरी : जिल्ह्यात काजू बीच्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, हा व्यवसाय सिझननुसार असल्याने एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे काजू बी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

लसीकरण केंद्रांवर गर्दी

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला, तरी लसी मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. शासनाकडून जसा लसींचा पुरवठा करण्यात येतो, त्याप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

हातगाडीवाल्यांचा व्यवसाय तेजीत

रत्नागिरी : सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यामध्ये फळांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही हातगाडीवाले फळ विक्रेते फिरताना दिसतात. अनेकांच्या मास्कही नसतात. त्यामुळे या हातगाडीवाल्यांना कोण रोखणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.