शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

कासव संवर्धन आणि संरक्षण: नऊ वर्षांत २२ हजार पिले मुक्त विहारासाठी समुद्राकडे

By शोभना कांबळे | Updated: May 13, 2025 19:12 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रात आता कासव संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे २०१६-१७ सालापासून कासवांच्या ...

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रात आता कासव संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे २०१६-१७ सालापासून कासवांच्या संवर्धनात वनविभागाला स्थानिकांचा सहभाग मिळत आहे. किनाऱ्यांवर कासवमित्र नियुक्त केल्याने कासवांच्या अंड्यांचे जतन आणि संवर्धन हाेण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांत या परिक्षेत्रात ५०५ घरट्यांमध्ये जतन केलेल्या ५२,३७३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या २२,०६१ पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने २००२ सालापासून रत्नागिरी जिल्ह्यात कासवांच्या जतन मोहिमेला सुरुवात केली. त्यामुळे वनविभागाच्या मोहिमेला या संस्थेचे महत्त्वाचे योगदान मिळाले. कासवप्रेमी, तसेच स्थानिक लोकांचा कासवांच्या संवर्धनात सहभाग वाढल्याने कासवांच्या अंड्यांचे संवर्धन मोठ्या संख्येने होऊ लागले. कासवांना रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे अंड्यांसाठी सुरक्षित वाटू लागले आहेत. त्यामुळे कासवांच्या घरट्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. विशेषत: मालगुंड आणि गावखडी या दोन किनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांची व अंड्यांची संख्या लक्षणीय आहे.वन विभागाने २०१६ - १७ रत्नागिरी परिक्षेत्रातील राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील वाडावेत्ये, माडबन, गावखडी, मालगुंड व भाट्ये या पाच समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांच्या संवर्धनाची मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केली. त्यासाठी किनाऱ्यांवर कासवमित्रांची नियुक्तीही करण्यात आली आहे.२०२३-२४ पासून कासव संवर्धनाची जबाबदारी वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरी परिक्षेत्रातील गावांमध्ये कासवांच्या संवर्धनाबाबत वनविभागाकडून, तसेच माध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच किनाऱ्यांवर स्थानिकांचे योगदान संवर्धनात महत्त्वाचे ठरत आहे.किनाऱ्यांवर संवर्धन२०२०-२१ मध्ये संवर्धित केलेल्या माडबन, गावखडी आणि वाडावेत्ये या तीन किनाऱ्यांवर २६ घरटी सापडली. त्यातील संवर्धित केलेल्या २,८२३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या ८,९७१ पिलांना समुद्रात सोडण्यात आले. त्यानंतर, २०२१ सालापासून मालगुंड, गणपतीपुळे, गणेशगुळे, कुर्ली, काळबादेवी, उंडी, आडे, भाट्ये आदी किनाऱ्यांवरही कासवे अंडी घालण्यासाठी येत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग