शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

कासव संवर्धन आणि संरक्षण: नऊ वर्षांत २२ हजार पिले मुक्त विहारासाठी समुद्राकडे

By शोभना कांबळे | Updated: May 13, 2025 19:12 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रात आता कासव संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे २०१६-१७ सालापासून कासवांच्या ...

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रात आता कासव संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे २०१६-१७ सालापासून कासवांच्या संवर्धनात वनविभागाला स्थानिकांचा सहभाग मिळत आहे. किनाऱ्यांवर कासवमित्र नियुक्त केल्याने कासवांच्या अंड्यांचे जतन आणि संवर्धन हाेण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांत या परिक्षेत्रात ५०५ घरट्यांमध्ये जतन केलेल्या ५२,३७३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या २२,०६१ पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने २००२ सालापासून रत्नागिरी जिल्ह्यात कासवांच्या जतन मोहिमेला सुरुवात केली. त्यामुळे वनविभागाच्या मोहिमेला या संस्थेचे महत्त्वाचे योगदान मिळाले. कासवप्रेमी, तसेच स्थानिक लोकांचा कासवांच्या संवर्धनात सहभाग वाढल्याने कासवांच्या अंड्यांचे संवर्धन मोठ्या संख्येने होऊ लागले. कासवांना रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे अंड्यांसाठी सुरक्षित वाटू लागले आहेत. त्यामुळे कासवांच्या घरट्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. विशेषत: मालगुंड आणि गावखडी या दोन किनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांची व अंड्यांची संख्या लक्षणीय आहे.वन विभागाने २०१६ - १७ रत्नागिरी परिक्षेत्रातील राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील वाडावेत्ये, माडबन, गावखडी, मालगुंड व भाट्ये या पाच समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांच्या संवर्धनाची मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केली. त्यासाठी किनाऱ्यांवर कासवमित्रांची नियुक्तीही करण्यात आली आहे.२०२३-२४ पासून कासव संवर्धनाची जबाबदारी वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरी परिक्षेत्रातील गावांमध्ये कासवांच्या संवर्धनाबाबत वनविभागाकडून, तसेच माध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच किनाऱ्यांवर स्थानिकांचे योगदान संवर्धनात महत्त्वाचे ठरत आहे.किनाऱ्यांवर संवर्धन२०२०-२१ मध्ये संवर्धित केलेल्या माडबन, गावखडी आणि वाडावेत्ये या तीन किनाऱ्यांवर २६ घरटी सापडली. त्यातील संवर्धित केलेल्या २,८२३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या ८,९७१ पिलांना समुद्रात सोडण्यात आले. त्यानंतर, २०२१ सालापासून मालगुंड, गणपतीपुळे, गणेशगुळे, कुर्ली, काळबादेवी, उंडी, आडे, भाट्ये आदी किनाऱ्यांवरही कासवे अंडी घालण्यासाठी येत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग