शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर केल्यास वाहने जप्त; जिल्हाधिकाऱ्यांचा राजकीय पक्षांना इशारा

By शोभना कांबळे | Updated: March 21, 2024 20:10 IST

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही दिले निर्देश

शोभना कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: रोड शो करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. दुचाकीला जास्तीत जास्त एक फूट बाय अर्धा फूट आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. तीनचाकी, चारचाकी वाहनांवर बॅनरला बंदी, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेबाबत येथील अल्प बचत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची गुरूवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये दुचाकीचा वापर, रोड शो बाबतची नियमावली, मिरवणुका आणि निवडणूक सभांमध्ये लाऊडस्पीकर, झेंड्यांचा वापर, तात्पुरते अभियान कार्यालय, एसएमएसचा गैरवापर रोखणे याबाबतचा समावेश होता. ते म्हणाले, स्थानिक कायदे, न्यायालयाचे आदेश किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांच्या अधिन राहून रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, लाऊडस्पीकर किंवा साऊंड ॲम्लीफायर चालवता येणार नाही. न्यायालयाचे आदेश आणि स्थानिक कायद्यांच्या आधीन राहून प्रमुख रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, रक्तपेढ्या आणि प्रचंड गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाणारे मार्ग टाळून, शक्य असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी किंवा गर्दी नसलेल्या वेळेत रोड शोचे वेळापत्रक ठेवावे. अपर जिल्हाधिकारी बर्गे यांनीही विविध नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

भयमुक्त आणि पारदर्शी वातावरण निवडणूक पार पडावी, यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष रहायला हवे. विशेषत: आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, यावर सुरुवातीपासूनच भर द्यावा. निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, केलेले पत्रव्यवहार याविषयी सखोल अवलोकन करावे. दिलेल्या जबाबदारीची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४