शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

कोकणी मेवा विक्रीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

ग्रामसमित्या कार्यान्वित रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील व शहरातील ग्राम व वाॅर्ड सनियंत्रण समिती ...

ग्रामसमित्या कार्यान्वित

रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील व शहरातील ग्राम व वाॅर्ड सनियंत्रण समिती कार्यान्वित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून आरोग्य तपासणी करण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिल्पा नाईकचे यश

दापोली : ‘होय आम्ही शेतकरी’ फाऊंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय फळे आणि भाजीपाला केक स्पर्धेत येथील डाॅ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक शिल्पा नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. राज्यभरातून १३०० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.

सभेसाठी मुदतवाढ

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा दि.३१ डिसेंबरपर्यंत घेण्याची मुदत देण्यात आली आहे. सहकार कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थांनी आपल्या कारभाराचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. संस्थांनी सप्टेंबर अखेर वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन वार्षिक लेखा परीक्षण अहवालास मंजुरी घेणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी

रत्नागिरी : जिल्हा नियोजनच्या निधीपैकी सर्व ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे गावांमध्ये विकासकामे होणार आहेत. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग ग्रामपंचायतींना विकासकामासाठी प्राप्त होणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे.

नागरिकांनी संयम ठेवावा

रत्नागिरी : संयम ठेवा, काळजी घ्या, संकटाचे हेही दिवस जातील. कोरोना रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात तपासणी करून घ्या.

नागरिकांची गैरसोय

रत्नागिरी : शहरात रस्त्यालगत भाजी, फळे विक्रीसाठी प्रशासनाने बंदी केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. किराणा दुकानेही बंद आहेत. घरपोच सेवा देणारे विक्रेते कमी असल्याने घरातील उपलब्ध साहित्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे.

साथीचा धसका

रत्नागिरी : तापसरी, सर्दी,पडसे आदी साथरोगांचा धसका नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे साधा ताप असला तरी डाॅक्टरांकडे जाणे नागरिक टाळू लागले आहेत. परिचित डाॅक्टर किंवा औषध विक्रेत्यांकडून औषधे घेऊन आजारावर मात करीत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.