शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

रायपाटण येथे तत्काळ काेविड हाॅस्पिटल उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता ग्रामीण जिल्हा वार्षिक योजनेतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता ग्रामीण जिल्हा वार्षिक योजनेतील कोविड-१९च्या ३० टक्के निधीमधून ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे कोविड हॉस्पिटल किंवा डीसीएचसी तत्काळ सुरू करण्याची मागणी राजन साळवी यांनी केली. खासदार विनायक राऊत तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी केली.

या बैठकीमध्ये आमदार राजन साळवी यांनी राजापूर व लांजा तालुक्यांमध्ये शासनाच्या मालकीचे कोविड हॉस्पिटल किंवा डीसीएचसी नसल्याचे सांगितले. तसेच दिलेल्या मान्यतेनुसार ओणी येथे शासकीय इमारतीमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू होत असून, त्यांची मर्यादा २५ बेडची आहे. असे स्पष्ट करीत ग्रामीण भागात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता व ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणामध्ये येण्याकरिता रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल किंवा डीसीएचसी सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले. त्याठिकाणी ४० बेडचे हॉस्पिटल होऊन, त्यामध्ये १५ बेड हे व्हेंटीलेटर आय.सी.यू व २५ बेड ऑक्सिजनसाठी तत्काळ उपलब्ध व्हावेत. तसेच या हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात यावा, अशी मागणी केली. आमदार राजन साळवी यांनी केलेल्या मागणीला खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सहमती दर्शविली.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक किरण सामंत उपस्थित होते.

..............................

तालुक्यात वाढती रुग्णसंख्या

राजापूर तालुक्यात वेगाने काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबराेबर मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. तालुक्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे आराेग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड्सही कमी पडत असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामध्ये बराच वेळ लागत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासही वेळ लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अन्य काेविड हाॅस्पिटल उभारणे गरजेचे आहे.