शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर वेळीच व्हा सावध; पोटविकार वाढण्याच्या भीतीसह आहे 'हा' धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:20 IST

रत्नागिरी - अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव याबरोबरच टीव्हीसमोर बसून खाणे, जेवणे यामुळे सध्या अनेक जणांना पोटाच्या विकारांनी त्रस्त केले ...

रत्नागिरी - अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव याबरोबरच टीव्हीसमोर बसून खाणे, जेवणे यामुळे सध्या अनेक जणांना पोटाच्या विकारांनी त्रस्त केले आहे. सध्याची मुले टीव्हीसमोर बसल्याशिवाय जेवतच नाहीत, अशा तक्रारी त्यांच्या आईकडून ऐकायला येत आहेत.

सध्याची बदलती जीवनशैली, आहारशैली आणि मानसिक ताणतणाव याचा परिणाम व्यक्तीच्या पचनसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुर्वीचे घरगुती पाैष्टिक अन्न, फळे, भाज्या या दुर्मीळ झाल्या आहेत. तसेच भेसळयुक्त खाणे खावे लागत आहे. त्यातच पाणीही अशुद्ध झाले आहे. नोकरी - व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यावर बाहेरचे खाणे खावे लागते. त्यातच सध्या फास्ट फूड, जंक फूड खाणे, मात्र, शरीराची हालचाल न होता एकाच जागेवर दीर्घ काळ काम करत रहाणे, टीव्हीसमोर तासनतास बसून जेवणे या सर्व कारणांमुळे व्यक्तीची संपूर्ण पचनसंस्थाच बिघडू लागल्याने वजन, चरबी, मधुमेह आदी आजारांबरोबरच पोटांचेही विकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

पाेटविकाराची प्रमुख कारणे

दूषित पाणी, अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव ही पोटविकार वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर दूषित पाण्याचे सेवन केल्यास जंतूसंसर्ग होऊनही पोट दुखणे, आतड्याला सूज येणे, मल विसर्जनात अडथळा, अनियमितता उद्भवणे आदी अनेक प्रकारचे त्रास निर्माण होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

पोटविकारांच्या कारणांमध्ये महत्त्वाचे आणखी एक कारण म्हणजे बहुतांश व्यक्ती, विशेषत: मुले यांना टीव्हीसमोर बसून खाण्याची किंवा जेवणाची सवय असते. त्यामुळे आपण किती खातो, हे लक्षात येत नाही. यामुळे वजन वाढणे, मधुमेह, चरबी वाढणे यासारखे विकार होत आहेत. या कारणांमुळे पोटाचे विकार प्रकर्षाने वाढले आहेत.

असंतुलित आणि अनियमित आहार ही दोन महत्त्वाची कारणे पोटाच्या समस्या वाढवितात. त्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशुद्ध पिण्याचे पाणीही पोटविकाराचे कारण ठरते. काहींच्या बैठ्या कामामुळेही अपचनाची समस्या निर्माण होते. सध्या पोटाचे विकार वाढविणारे महत्त्वाचे कारण म्हणजे टीव्ही बघत जेवणे. यामुळेही पचन नीट न होण्याची समस्या उद्भवते.

- डाॅ. मनोज मणचेकर, सर्जन, रत्नागिरी

सध्याच्या आहारात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. जीवनशैलीत बदल झाल्याने काही वेळा बाहेरचे खाणे याचाही पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर सध्या बाहेरचे खाणेही वाढले आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही घरगुती पचायला हलका असा साधा आहार घेण्यापेक्षा जंक फूड, फास्ट फूड घरगुती जेवणापेक्षा अधिक आवडू लागले आहे. टीव्हीसमोर तासन् तास बसून कार्यक्रम बघतच जेवणे, यामुळे पोटात काय जातेय, हेही कळत नाही. पोटाचे त्रास वाढविणारे हे प्रमुख कारण आहे.

- डाॅ. रवींद्र गोंधळेकर, पोट विकार तज्ज्ञ, रत्नागिरी

काय म्हणतात महिला...पाेटविकार टाळायचे असतील तर...

वेळेवर आणि संतुलित आहार घ्या. जास्तीत जास्त घरगुती पदार्थ खाण्यावर भर द्या. फास्ट फूड, जंक फूड टाळा. अवेळी खाणे टाळा.

बाहेर असाल तर स्वच्छ जागा आणि आहार असल्याची खात्री करा. ताण दूर करण्यासाठी याेगासने, प्राणायाम करा. जागरण टाळा. पिण्याचे पाणी शुद्ध हवे.

जेवताना टीव्ही पूर्णपणे बंद ठेवा. मुलांनाही टीव्हीसमोर बसून जेवण्याची सवय लावू नका. एका ठिकाणी दीर्घ काळ बसू नका.

काय म्हणतात महिला...

मुलांना टीव्हीची सवय लागल्याने त्यांचा खेळही थांबला आहे. टीव्हीमुळे त्यांना जेवणाची आठवणही नसते. टीव्ही बंद असेल तर जेवणाला असहकार असतो. त्यामुळे टीव्ही बघ पण जेव असे नाईलाजाने म्हणावे लागते.

- मानसी साळवी , रत्नागिरी

खरेतर टीव्ही बघत खाणे, हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण काही वेळा नाईलाज असतो. दटावण्याचाही काही उपयोग होत नाही. त्यामुळे मुलीला जेवण्यासाठी नाईलाजाने टीव्ही लावून द्यावा लागतो.

- निधी मुसळे, रत्नागिरी

मुलांना जेवताना टीव्ही लागतो. नाही लावला तर जेवणारच नाही, असे इमोशनली ब्लॅकमेल करण्याचे मोठे हत्यार उगारतात. त्यामुळे किमान टीव्हीसमोर बसून तरी जेवेल, असा विचार करून अखेर मग नाईलाजानेच मुलीला टीव्ही लावून द्यावा लागतो.

-शगुफ्ता नाकाडे, नेवरे, रत्नागिरी

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नRatnagiriरत्नागिरीdoctorडॉक्टर