शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर वेळीच व्हा सावध; पोटविकार वाढण्याच्या भीतीसह आहे 'हा' धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:20 IST

रत्नागिरी - अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव याबरोबरच टीव्हीसमोर बसून खाणे, जेवणे यामुळे सध्या अनेक जणांना पोटाच्या विकारांनी त्रस्त केले ...

रत्नागिरी - अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव याबरोबरच टीव्हीसमोर बसून खाणे, जेवणे यामुळे सध्या अनेक जणांना पोटाच्या विकारांनी त्रस्त केले आहे. सध्याची मुले टीव्हीसमोर बसल्याशिवाय जेवतच नाहीत, अशा तक्रारी त्यांच्या आईकडून ऐकायला येत आहेत.

सध्याची बदलती जीवनशैली, आहारशैली आणि मानसिक ताणतणाव याचा परिणाम व्यक्तीच्या पचनसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुर्वीचे घरगुती पाैष्टिक अन्न, फळे, भाज्या या दुर्मीळ झाल्या आहेत. तसेच भेसळयुक्त खाणे खावे लागत आहे. त्यातच पाणीही अशुद्ध झाले आहे. नोकरी - व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यावर बाहेरचे खाणे खावे लागते. त्यातच सध्या फास्ट फूड, जंक फूड खाणे, मात्र, शरीराची हालचाल न होता एकाच जागेवर दीर्घ काळ काम करत रहाणे, टीव्हीसमोर तासनतास बसून जेवणे या सर्व कारणांमुळे व्यक्तीची संपूर्ण पचनसंस्थाच बिघडू लागल्याने वजन, चरबी, मधुमेह आदी आजारांबरोबरच पोटांचेही विकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

पाेटविकाराची प्रमुख कारणे

दूषित पाणी, अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव ही पोटविकार वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर दूषित पाण्याचे सेवन केल्यास जंतूसंसर्ग होऊनही पोट दुखणे, आतड्याला सूज येणे, मल विसर्जनात अडथळा, अनियमितता उद्भवणे आदी अनेक प्रकारचे त्रास निर्माण होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

पोटविकारांच्या कारणांमध्ये महत्त्वाचे आणखी एक कारण म्हणजे बहुतांश व्यक्ती, विशेषत: मुले यांना टीव्हीसमोर बसून खाण्याची किंवा जेवणाची सवय असते. त्यामुळे आपण किती खातो, हे लक्षात येत नाही. यामुळे वजन वाढणे, मधुमेह, चरबी वाढणे यासारखे विकार होत आहेत. या कारणांमुळे पोटाचे विकार प्रकर्षाने वाढले आहेत.

असंतुलित आणि अनियमित आहार ही दोन महत्त्वाची कारणे पोटाच्या समस्या वाढवितात. त्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशुद्ध पिण्याचे पाणीही पोटविकाराचे कारण ठरते. काहींच्या बैठ्या कामामुळेही अपचनाची समस्या निर्माण होते. सध्या पोटाचे विकार वाढविणारे महत्त्वाचे कारण म्हणजे टीव्ही बघत जेवणे. यामुळेही पचन नीट न होण्याची समस्या उद्भवते.

- डाॅ. मनोज मणचेकर, सर्जन, रत्नागिरी

सध्याच्या आहारात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. जीवनशैलीत बदल झाल्याने काही वेळा बाहेरचे खाणे याचाही पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर सध्या बाहेरचे खाणेही वाढले आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही घरगुती पचायला हलका असा साधा आहार घेण्यापेक्षा जंक फूड, फास्ट फूड घरगुती जेवणापेक्षा अधिक आवडू लागले आहे. टीव्हीसमोर तासन् तास बसून कार्यक्रम बघतच जेवणे, यामुळे पोटात काय जातेय, हेही कळत नाही. पोटाचे त्रास वाढविणारे हे प्रमुख कारण आहे.

- डाॅ. रवींद्र गोंधळेकर, पोट विकार तज्ज्ञ, रत्नागिरी

काय म्हणतात महिला...पाेटविकार टाळायचे असतील तर...

वेळेवर आणि संतुलित आहार घ्या. जास्तीत जास्त घरगुती पदार्थ खाण्यावर भर द्या. फास्ट फूड, जंक फूड टाळा. अवेळी खाणे टाळा.

बाहेर असाल तर स्वच्छ जागा आणि आहार असल्याची खात्री करा. ताण दूर करण्यासाठी याेगासने, प्राणायाम करा. जागरण टाळा. पिण्याचे पाणी शुद्ध हवे.

जेवताना टीव्ही पूर्णपणे बंद ठेवा. मुलांनाही टीव्हीसमोर बसून जेवण्याची सवय लावू नका. एका ठिकाणी दीर्घ काळ बसू नका.

काय म्हणतात महिला...

मुलांना टीव्हीची सवय लागल्याने त्यांचा खेळही थांबला आहे. टीव्हीमुळे त्यांना जेवणाची आठवणही नसते. टीव्ही बंद असेल तर जेवणाला असहकार असतो. त्यामुळे टीव्ही बघ पण जेव असे नाईलाजाने म्हणावे लागते.

- मानसी साळवी , रत्नागिरी

खरेतर टीव्ही बघत खाणे, हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण काही वेळा नाईलाज असतो. दटावण्याचाही काही उपयोग होत नाही. त्यामुळे मुलीला जेवण्यासाठी नाईलाजाने टीव्ही लावून द्यावा लागतो.

- निधी मुसळे, रत्नागिरी

मुलांना जेवताना टीव्ही लागतो. नाही लावला तर जेवणारच नाही, असे इमोशनली ब्लॅकमेल करण्याचे मोठे हत्यार उगारतात. त्यामुळे किमान टीव्हीसमोर बसून तरी जेवेल, असा विचार करून अखेर मग नाईलाजानेच मुलीला टीव्ही लावून द्यावा लागतो.

-शगुफ्ता नाकाडे, नेवरे, रत्नागिरी

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नRatnagiriरत्नागिरीdoctorडॉक्टर