शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

मान्सून आला तरी तहान मात्र भागेना

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

भीषण पाणी टंचाई : वाड्यांची संख्या वाढली

रत्नागिरी : गतवर्षीच्या पाणीटंचाईपेक्षा यंदा पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या जास्त आहे. पाऊस सुरु झाला असला तरी जिल्ह्यातील १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई सुरु आहे.मागील आठवड्यात १२१ गावांतील २८४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना १३ शासकीय आणि १५ खासगी टँकर अशा एकूण २८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आठवडाभराच्या कालावधीत यामध्ये १ गाव आणि ६ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली. मंडणगड, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यांमध्ये चालू आठवड्यात एकाही गावाची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली तालुक्यात एका गावातील एक वाडी, गुहागरमध्ये ३ वाड्यांची व चिपळूणमध्ये २ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. गतवर्षी आजच्या दिवशी १२३ गावांतील २७७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, चालू आठवड्यामध्ये गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्तांमध्ये १३ वाड्या जास्त आहेत.दरवर्षी त्या-त्याच गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. मात्र तरीही त्या गावांसाठी कायमस्वरुपी पर्याय शोधण्याबाबत लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणुकीचा विचार होत नाही त्यामुळे उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो. (शहर वार्ताहर)