शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आदर्श जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि ...

पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि हे दुष्टचक्र चालू राहते. स्ट्रेस हा मनाच्या पातळीवर सुरू होतो, पण हळूहळू आंतरिक अवयवांवर त्याचे परिणाम दिसू लागतात. ही आंतरिंद्रिये त्यांच्यापरीने लढत असतात, परंतु जेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते, तसतसा रोगांचा शिरकाव व्हायला लागतो. उदाहरणार्थ, स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होऊ लागली की मधुमेह होतो, गर्भाशयाची क्षमता कमी झाली की फायब्रॉइड्स होतात, अंडाशयामध्ये पीसीओडी, थायरॉईड, बद्धकोष्ठता, हृदयविकार, लठ्ठपणा, यकृताचे आजार इत्यादी. यांच्यावर उपाय म्हणून आपण लगेच औषधांकडे धाव घेतो. परंतु, विचार असा असावा, मी काय केले तर हे जीवनशैलीचे विकार होणार नाहीत किंवा कमी तीव्रतेत होतील किंवा शक्य तितकी वर्षे लांबणीवर टाकता येतील.

यावर सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे झोपेची क्वालिटी सुधारणे. जे लोक सातत्याने सात तासापेक्षा कमी झोपतात, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतात. हृदयाचे विकार व मधुमेह लवकर होतो. झोप पूर्णपणे सुधारल्यास ५० टक्के जीवनशैलीशी संबंधित आजार बरे होऊ शकतात. शांत झोप ही आज गरजेची असताना आपल्या या धकाधकीच्या जीवनात, कोरोनाच्या भीतीमुळे, मनातील अनेकविध संशयांमुळे, संभ्रमामुळे, पूर्वग्रहदुषित दृष्टिकोनामुळे झोपेचे खोबरे झाले आहे. त्यासाठी हे सारे बाजूला करून दिवसातील किमान आठ तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न केला तर सर्व रोगांपासून आपण चार हात दूर राहू. त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीत हे बदल करायला हवे. जसे की रोज सर्वांग सुंदर व्यायाम, योगासने, प्राणायाम दररोज नियमितपणे करणे गरजेचे आहे. मद्यपान व धूम्रपान करू नये. स्थूलता येऊ देऊ नये. यासाठी माफक आणि वेळच्यावेळी आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे. दिवसातला काही काळ का होईना फोन, टी. व्ही. आणि लॅपटॉपशिवाय घालवावा. निरोगी नाती व संभाषण कौशल्य टिकवावे. रोज थोडावेळ तरी निसर्गात घालवावा. कोणत्याही नवीन डाएट ट्रेन्डच्या मागे जाऊ नये. दिवसातील काही काळ बाह्य विश्व सोडून स्वतःबरोबर राहावं. बदल कधीही मोठ्या प्रमाणावर आणि एकदम होत नाहीत. सातत्याने जीवनशैलीमध्ये छोटे-छोटे बदल करत गेलात की, २१ दिवसात सवय लागते. तीन महिने टिकवल्याने त्यांचे चांगल्या सवयींमध्ये रूपांतर होते. अलिकडच्या धकाधकीच्या जगात मन शांत ठेवून आपणी जीवनशैली आदर्श बनवली तर येणारे ताणतणाव तर दूर होतीलच शिवाय आपल्या आरोग्याबरोबरच कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवून समाज आरोग्य निरोगी व संपन्न बनवता येईल.

डॉ . गजानन पाटील