शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

आदर्श जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि ...

पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि हे दुष्टचक्र चालू राहते. स्ट्रेस हा मनाच्या पातळीवर सुरू होतो, पण हळूहळू आंतरिक अवयवांवर त्याचे परिणाम दिसू लागतात. ही आंतरिंद्रिये त्यांच्यापरीने लढत असतात, परंतु जेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते, तसतसा रोगांचा शिरकाव व्हायला लागतो. उदाहरणार्थ, स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होऊ लागली की मधुमेह होतो, गर्भाशयाची क्षमता कमी झाली की फायब्रॉइड्स होतात, अंडाशयामध्ये पीसीओडी, थायरॉईड, बद्धकोष्ठता, हृदयविकार, लठ्ठपणा, यकृताचे आजार इत्यादी. यांच्यावर उपाय म्हणून आपण लगेच औषधांकडे धाव घेतो. परंतु, विचार असा असावा, मी काय केले तर हे जीवनशैलीचे विकार होणार नाहीत किंवा कमी तीव्रतेत होतील किंवा शक्य तितकी वर्षे लांबणीवर टाकता येतील.

यावर सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे झोपेची क्वालिटी सुधारणे. जे लोक सातत्याने सात तासापेक्षा कमी झोपतात, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतात. हृदयाचे विकार व मधुमेह लवकर होतो. झोप पूर्णपणे सुधारल्यास ५० टक्के जीवनशैलीशी संबंधित आजार बरे होऊ शकतात. शांत झोप ही आज गरजेची असताना आपल्या या धकाधकीच्या जीवनात, कोरोनाच्या भीतीमुळे, मनातील अनेकविध संशयांमुळे, संभ्रमामुळे, पूर्वग्रहदुषित दृष्टिकोनामुळे झोपेचे खोबरे झाले आहे. त्यासाठी हे सारे बाजूला करून दिवसातील किमान आठ तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न केला तर सर्व रोगांपासून आपण चार हात दूर राहू. त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीत हे बदल करायला हवे. जसे की रोज सर्वांग सुंदर व्यायाम, योगासने, प्राणायाम दररोज नियमितपणे करणे गरजेचे आहे. मद्यपान व धूम्रपान करू नये. स्थूलता येऊ देऊ नये. यासाठी माफक आणि वेळच्यावेळी आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे. दिवसातला काही काळ का होईना फोन, टी. व्ही. आणि लॅपटॉपशिवाय घालवावा. निरोगी नाती व संभाषण कौशल्य टिकवावे. रोज थोडावेळ तरी निसर्गात घालवावा. कोणत्याही नवीन डाएट ट्रेन्डच्या मागे जाऊ नये. दिवसातील काही काळ बाह्य विश्व सोडून स्वतःबरोबर राहावं. बदल कधीही मोठ्या प्रमाणावर आणि एकदम होत नाहीत. सातत्याने जीवनशैलीमध्ये छोटे-छोटे बदल करत गेलात की, २१ दिवसात सवय लागते. तीन महिने टिकवल्याने त्यांचे चांगल्या सवयींमध्ये रूपांतर होते. अलिकडच्या धकाधकीच्या जगात मन शांत ठेवून आपणी जीवनशैली आदर्श बनवली तर येणारे ताणतणाव तर दूर होतीलच शिवाय आपल्या आरोग्याबरोबरच कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवून समाज आरोग्य निरोगी व संपन्न बनवता येईल.

डॉ . गजानन पाटील