शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे

By मनोज मुळ्ये | Updated: January 13, 2024 13:32 IST

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला.

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी स्पर्धेत नाही, असे ठाम विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये केले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून अधिकाधिक मताधिक्य आपण देऊ, असे सांगतानाच भाजप म्हणून आम्ही या मतदार संघावर दावा करत असल्याचेही ते म्हणाले.

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला. लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही. पक्षाने कडाळ - मालवण मतदार संघाची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. तेथून अधिकाधिक मताधिक्य देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितलेली नाही. आपण इच्छुक नसल्याचेही आपण पक्षाला सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.या मतदार संघासाठी पक्ष म्हणून आम्ही दावा करत आहोत, ही बाब खरी आहे. कारण चिपळूण ते बांदा या भागात भाजपाची ताकद अधिक आहे. त्यामुळे भाजपाला ही जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. स्वत:साठी नाही, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रत्येक मुद्द्याचा विचार करुन कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निकाल दिला आहे. त्यामुळे त्याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला तरी काही उपयोग होणार नाही, असे ते म्हणाले.ठाकरे त्याच दिवशी हरले.

मुख्यमंत्री म्हणून विश्वासदर्शक ठरावाला उद्ध्व ठाकरे सामोरे गेले नाहीत, तेथेच ते हरले आहेत. त्यांनी या ठरावाला सामोरे जाणे आवश्यक होते. मात्र ते धाडस त्यांच्याकडे नाही. आता निकाल सहन होत नाही म्हणून त्यांचा तळतळाट होतो, अशी टीकाही नीलेश राणे यांनी केली.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे