शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे

By मनोज मुळ्ये | Updated: January 13, 2024 13:32 IST

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला.

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी स्पर्धेत नाही, असे ठाम विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये केले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून अधिकाधिक मताधिक्य आपण देऊ, असे सांगतानाच भाजप म्हणून आम्ही या मतदार संघावर दावा करत असल्याचेही ते म्हणाले.

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला. लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही. पक्षाने कडाळ - मालवण मतदार संघाची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. तेथून अधिकाधिक मताधिक्य देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितलेली नाही. आपण इच्छुक नसल्याचेही आपण पक्षाला सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.या मतदार संघासाठी पक्ष म्हणून आम्ही दावा करत आहोत, ही बाब खरी आहे. कारण चिपळूण ते बांदा या भागात भाजपाची ताकद अधिक आहे. त्यामुळे भाजपाला ही जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. स्वत:साठी नाही, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रत्येक मुद्द्याचा विचार करुन कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निकाल दिला आहे. त्यामुळे त्याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला तरी काही उपयोग होणार नाही, असे ते म्हणाले.ठाकरे त्याच दिवशी हरले.

मुख्यमंत्री म्हणून विश्वासदर्शक ठरावाला उद्ध्व ठाकरे सामोरे गेले नाहीत, तेथेच ते हरले आहेत. त्यांनी या ठरावाला सामोरे जाणे आवश्यक होते. मात्र ते धाडस त्यांच्याकडे नाही. आता निकाल सहन होत नाही म्हणून त्यांचा तळतळाट होतो, अशी टीकाही नीलेश राणे यांनी केली.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे