शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श। सारेच पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक सत्र पूर्णत: कोलमडलेली होती. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने पहिली ...

रत्नागिरी : कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक सत्र पूर्णत: कोलमडलेली होती. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळांमधील २ लाख ४२ हजार ३०१ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

वास्तविक गतवर्षी मार्चपासून शाळा बंद झाल्या. वार्षिक परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळांचे अध्यापन ऑनलाइन सुरू करण्यात आले. दीपावलीपर्यंत पहिली ते बारावीपर्यंत सर्वांचेच अध्यापन ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. मात्र, नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग जानेवारीपासून सुरू झाले. पालकांनी अंदाज घेत मुलांना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली. शाळांनाही मुलांच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली होती.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू असून अंतिम टप्प्यात आहेत. काही शाळांनी नववीच्या परीक्षा संपवून दहावीच्या जादा वर्गाची तयारी सुरू केली आहे. त्यातच शासनाने शनिवारी पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाचे अद्याप ऑनलाइन अध्यापन सुरू होते. ग्रामीण भागातील कित्येक पालकांकडे मोबाइल नसल्याने मुलांचे नुकसान होत होते. पहिली ते आठवीपर्यंत पास करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे काही पालकांमधून स्वागत करण्यात येत आहे, तर काही पालक मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल चिंतेत आहेत.

कोट

गतवर्षी परीक्षा न घेताच पास करण्यात आले. यावर्षी काही शाळांतून परीक्षा सुरू झाली आहे, तर काही शाळांमध्ये परीक्षा सुरू व्हायची आहे. या निर्णयामुळे मुलांचे नुकसान होत आहे. त्यापेक्षा मुलांना त्याच वर्गात बसवले असते तरी चालले असते.

-कल्पना चितळे, पालक

कोट

पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शासनाने पासचा निर्णय घेतला असला तरी यावर्षी ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांना ऑनलाइन अध्यापन पद्धतीचा किती लाभ झाला, याची खात्री पटवून घेण्यासाठी फायदा झाला असता. प्रत्यक्ष वर्गात शिकत असताना, गणितासारख्या विषयांचे आकलन होण्यास कमी पडतात. ऑनलाइनमुळे मुलांच्या भविष्यातील अभ्यासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- शकील डिंगणकर, पालक

कोट

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने ‘पास’चा निर्णय योग्य आहे. शासन निर्णयाचे पालन करण्यात येणार आहे. आतापर्यंत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन, तर पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग ऑफलाइन सुरू होते. मात्र, ज्या गावात मोबाइलची रेंज नाही, त्या गावात पालकांच्या परवानगीने शिक्षक जाऊन मार्गदर्शन करीत होते. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना मुलांच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.

जिल्ह्यातील शाळा - ३,२०२

विद्यार्थिसंख्या २,४२,३०१

चौकट

तालुकानिहाय शाळा व विद्यार्थिसंख्या

तालुका शाळा विद्यार्थी

मंडणगड १८६ ८८२५

दापोली ३५५ २५२७३

खेड ४४० २८६७३

चिपळूण ४६८ ४६९४१

गुहागर २३७ १६६६०

संगमेश्वर ४२८ २५०८२

रत्नागिरी ४३१ ५३६८९

लांजा २५१ १४९९२

राजापूर ४०६ ५३६८९