शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल ५ जूनपर्यंत ? निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 18:38 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबारावीचा निकाल ५ जूनपर्यंत शक्य ? : शिक्षण मंडळनिकालाचे काम आता अंतिम टप्प्यात

सागर पाटील 

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सर्वच विभागीय मंडळांमध्ये निकालाची लगबग सुरू असून, निकाल वेळीच जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रवारी महिन्यांत राज्यात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षां घेण्यात आल्या होत्या. कला, शास्त्र, वाणिज्य व व्होकेशनल शाखांमधून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी उत्तर पुस्तिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. यामुळे अनेक उत्तर पुस्तिका उशिरापर्यंत तपासल्या गेल्या नाहीत.या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गतवर्षी राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी हा निकाल ५ जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या अनुषंगाने विविध निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे उत्तर पुस्तिका तपासण्यास उशीर झाला असल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे.३३ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ३३६४७ विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसले होते. कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून राज्यात सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा या वर्षीदेखील कायम राहील, असा विश्वास विभागातून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी