शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला ‘कॅज्युअल’ घेऊन कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून ...

गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हणूनच कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना या सर्व यंत्रणांना यशस्वीरीत्या करता आला. गेल्या वर्षापासून शासनाने प्रशासन आणि आरोग्य विभागासह विविध यंत्रणा यांच्या सहकार्याने अथक मेहनतीने कोरोनावर यश मिळविले. हे सारे प्रयत्न नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी होते. पण दुर्दैव असे की, आमच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कायदे, नियम करावे लागतात. यंत्रणांना रस्त्यावर दिवसरात्र, उन्हातान्हात उभे रहावे लागते. या यंत्रणांना त्याचा पगाराच्या रूपात कामाचा माेबदला मिळतो. मग काय झाले, त्या उभ्या राहिल्या तर, असं सरसकट असंवेदनशील विधान करून आपण मोकळे होतो.

तसं पाहिलं तर प्रत्येकालाच आपला जीव प्रिय असतो. मृत्यूचं नुसतं नाव निघालं तरी भीतीने घाम फुटतो. प्रत्येकालाच मृत्यूचे नावही अशुभ वाटते. ज्यांच्या घरातील आप्तांचे बळी कोरोनाने घेतले आहेत, त्यांची अवस्था कशी आहे, ती ज्यांची त्यांनाच माहीत. कोरोनाने सर्व नाती खोटी ठरवली असून, मृत्यू हेच शाश्वत असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे अखेरचे दर्शनही त्यांच्या आप्तांना झालेले नाही. गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अक्षरश: कोरोनाचे थैमान सुरू होते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाढत्या मृत्युदराने जिल्ह्याची झोप उडाली होती. म्हणूनच आता पुढचा काळ कोरोना संक्रमण वाढविण्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असा आहे. म्हणूनच आता तरी आपण कोरोनाला सहजगत्या न घेता, गांभीर्याने घ्यायला हवे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या जगात कोरोनाने केलेली हानी न विसरता येण्यासारखी आहे. त्याचे परिणाम अजूनही सादृश्य स्वरूपात आहे. आर्थिक बाबीत आपण कित्येक वर्षे मागे गेलो आहोत, म्हणूनच आता पुन्हा हा धोका नको. त्यासाठी लाॅकडाऊन पुन्हा झाले तर ते परवडण्यासारखे नाही, याचे भान आतातरी साऱ्यांनीच बाळगायला हवे.