शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनाला ‘कॅज्युअल’ घेऊन कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून ...

गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हणूनच कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना या सर्व यंत्रणांना यशस्वीरीत्या करता आला. गेल्या वर्षापासून शासनाने प्रशासन आणि आरोग्य विभागासह विविध यंत्रणा यांच्या सहकार्याने अथक मेहनतीने कोरोनावर यश मिळविले. हे सारे प्रयत्न नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी होते. पण दुर्दैव असे की, आमच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कायदे, नियम करावे लागतात. यंत्रणांना रस्त्यावर दिवसरात्र, उन्हातान्हात उभे रहावे लागते. या यंत्रणांना त्याचा पगाराच्या रूपात कामाचा माेबदला मिळतो. मग काय झाले, त्या उभ्या राहिल्या तर, असं सरसकट असंवेदनशील विधान करून आपण मोकळे होतो.

तसं पाहिलं तर प्रत्येकालाच आपला जीव प्रिय असतो. मृत्यूचं नुसतं नाव निघालं तरी भीतीने घाम फुटतो. प्रत्येकालाच मृत्यूचे नावही अशुभ वाटते. ज्यांच्या घरातील आप्तांचे बळी कोरोनाने घेतले आहेत, त्यांची अवस्था कशी आहे, ती ज्यांची त्यांनाच माहीत. कोरोनाने सर्व नाती खोटी ठरवली असून, मृत्यू हेच शाश्वत असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे अखेरचे दर्शनही त्यांच्या आप्तांना झालेले नाही. गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अक्षरश: कोरोनाचे थैमान सुरू होते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाढत्या मृत्युदराने जिल्ह्याची झोप उडाली होती. म्हणूनच आता पुढचा काळ कोरोना संक्रमण वाढविण्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असा आहे. म्हणूनच आता तरी आपण कोरोनाला सहजगत्या न घेता, गांभीर्याने घ्यायला हवे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या जगात कोरोनाने केलेली हानी न विसरता येण्यासारखी आहे. त्याचे परिणाम अजूनही सादृश्य स्वरूपात आहे. आर्थिक बाबीत आपण कित्येक वर्षे मागे गेलो आहोत, म्हणूनच आता पुन्हा हा धोका नको. त्यासाठी लाॅकडाऊन पुन्हा झाले तर ते परवडण्यासारखे नाही, याचे भान आतातरी साऱ्यांनीच बाळगायला हवे.