शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

कोरोनाला ‘कॅज्युअल’ घेऊन कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून ...

गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हणूनच कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना या सर्व यंत्रणांना यशस्वीरीत्या करता आला. गेल्या वर्षापासून शासनाने प्रशासन आणि आरोग्य विभागासह विविध यंत्रणा यांच्या सहकार्याने अथक मेहनतीने कोरोनावर यश मिळविले. हे सारे प्रयत्न नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी होते. पण दुर्दैव असे की, आमच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कायदे, नियम करावे लागतात. यंत्रणांना रस्त्यावर दिवसरात्र, उन्हातान्हात उभे रहावे लागते. या यंत्रणांना त्याचा पगाराच्या रूपात कामाचा माेबदला मिळतो. मग काय झाले, त्या उभ्या राहिल्या तर, असं सरसकट असंवेदनशील विधान करून आपण मोकळे होतो.

तसं पाहिलं तर प्रत्येकालाच आपला जीव प्रिय असतो. मृत्यूचं नुसतं नाव निघालं तरी भीतीने घाम फुटतो. प्रत्येकालाच मृत्यूचे नावही अशुभ वाटते. ज्यांच्या घरातील आप्तांचे बळी कोरोनाने घेतले आहेत, त्यांची अवस्था कशी आहे, ती ज्यांची त्यांनाच माहीत. कोरोनाने सर्व नाती खोटी ठरवली असून, मृत्यू हेच शाश्वत असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे अखेरचे दर्शनही त्यांच्या आप्तांना झालेले नाही. गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अक्षरश: कोरोनाचे थैमान सुरू होते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाढत्या मृत्युदराने जिल्ह्याची झोप उडाली होती. म्हणूनच आता पुढचा काळ कोरोना संक्रमण वाढविण्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असा आहे. म्हणूनच आता तरी आपण कोरोनाला सहजगत्या न घेता, गांभीर्याने घ्यायला हवे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या जगात कोरोनाने केलेली हानी न विसरता येण्यासारखी आहे. त्याचे परिणाम अजूनही सादृश्य स्वरूपात आहे. आर्थिक बाबीत आपण कित्येक वर्षे मागे गेलो आहोत, म्हणूनच आता पुन्हा हा धोका नको. त्यासाठी लाॅकडाऊन पुन्हा झाले तर ते परवडण्यासारखे नाही, याचे भान आतातरी साऱ्यांनीच बाळगायला हवे.