शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

निवळीतील हॉटेल वृंदावन सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

- प्रवाशांना टेबल सर्व्हिस लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेवून, प्रवाशांना टेबल सर्व्हिस ...

- प्रवाशांना टेबल सर्व्हिस

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेवून, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टाॅरंटना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करून फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे, तसेच हॉटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे.

या अनुषंगाने २५ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावनला भेट दिली. त्यावेळी हे हॉटेल सुरू असल्याचे व एका आराम बसमधील प्रवासी हे टेबल सर्व्हिस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दीही दिसली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीचे तहसीलदार, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत या हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये टेबल सर्व्हिस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लंघन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तत्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यंत सीलबंद केले, तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल आस्थापनावर १३ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.

हॉटेल सील करण्याच्या कारवाईत तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासोबत पालीचे मंडल अधिकारी सुरेंद्र कांबळे, रत्नागिरीचे मंडल अधिकारी विलास सरफरे, तलाठी अरविंद शिंदे, महसूल सहायक रवी खाके व कोतवाल डिचोलकर यांनी सहभाग घेतला. दंडात्मक कारवाई अन्न व औषध विभागाचे निरीक्षक पाचपुते प्रशासन यांच्या पथकाने केली.

------------------------

आरामबसवरही कारवाई

मुंबईला जाणारी एक आरामबस काही प्रवाशांसह उभी होती. या आरामबसवर उपप्रादेशिक अधिकारी व पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात आली.

------------------

सर्व हॉटेल व रेस्टॉरंट यांनी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच फक्त घरपोच सेवा द्यावयाची आहे. तसेच हॉटेल सेवापुरवठादार/डिलीव्हरी बॉय/इतरांनी कोरोना चाचणी (जास्तीत जास्त १० दिवस अलिकडील) निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे.

- शशिकांत जाधव, तहसीलदार, रत्नागिरी.

-------------------------