शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

निवळीतील हॉटेल वृंदावन सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

- प्रवाशांना टेबल सर्व्हिस लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेवून, प्रवाशांना टेबल सर्व्हिस ...

- प्रवाशांना टेबल सर्व्हिस

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेवून, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टाॅरंटना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करून फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे, तसेच हॉटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे.

या अनुषंगाने २५ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावनला भेट दिली. त्यावेळी हे हॉटेल सुरू असल्याचे व एका आराम बसमधील प्रवासी हे टेबल सर्व्हिस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दीही दिसली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीचे तहसीलदार, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत या हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये टेबल सर्व्हिस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लंघन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तत्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यंत सीलबंद केले, तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल आस्थापनावर १३ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.

हॉटेल सील करण्याच्या कारवाईत तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासोबत पालीचे मंडल अधिकारी सुरेंद्र कांबळे, रत्नागिरीचे मंडल अधिकारी विलास सरफरे, तलाठी अरविंद शिंदे, महसूल सहायक रवी खाके व कोतवाल डिचोलकर यांनी सहभाग घेतला. दंडात्मक कारवाई अन्न व औषध विभागाचे निरीक्षक पाचपुते प्रशासन यांच्या पथकाने केली.

------------------------

आरामबसवरही कारवाई

मुंबईला जाणारी एक आरामबस काही प्रवाशांसह उभी होती. या आरामबसवर उपप्रादेशिक अधिकारी व पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात आली.

------------------

सर्व हॉटेल व रेस्टॉरंट यांनी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच फक्त घरपोच सेवा द्यावयाची आहे. तसेच हॉटेल सेवापुरवठादार/डिलीव्हरी बॉय/इतरांनी कोरोना चाचणी (जास्तीत जास्त १० दिवस अलिकडील) निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे.

- शशिकांत जाधव, तहसीलदार, रत्नागिरी.

-------------------------