शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रत्नागिरीतील हॉटेल रत्नसागर प्रशासनाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:19 IST

Hotel Ratnagiri- रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार एम.टी.डी.सी.च्या माध्यमातून रत्नसागर हॉटेलला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही ३० वर्षांची मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील हॉटेल रत्नसागर प्रशासनाच्या ताब्यातआता बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल

रत्नागिरी : रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार एम.टी.डी.सी.च्या माध्यमातून रत्नसागर हॉटेलला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही ३० वर्षांची मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतली आहे.रत्नागिरी शहरानजीकच्या बहुचर्चित मिऱ्या धूप संरक्षक बंधाऱ्यासाठी १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बंधारा आणि ब्रेक वॉटर अशा दोन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी.डब्ल्यू.पी.आर.एस. या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. बंधाऱ्यासाठी ११० कोटी मंजूर झाल्याने लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.गेल्या अनेक वर्षापासून मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा वाहून गेल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात मिऱ्या पंधरामाड येथील मानवी वस्तीत समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसते. त्यामुळे येथील नागरिकांना भरतीच्या वेळी जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या बंधाऱ्याचे काम कायमस्वरूपी व्हावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक आंदोलन करत आहेत.या बंधाऱ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. आता पुन्हा या कायम बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून १९० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी.डब्ल्यू.पी. आर.एस. या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बंधाऱ्याचे काम होणार आहे. त्यासाठी ११० कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :hotelहॉटेलRatnagiriरत्नागिरी