शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

कोकणातील वनौषधी होत आहे दुर्मीळ...

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

होतोय ऱ्हास : जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे

फुणगूस : जंगलतोड आणि वाढत्या तापमानामुळे येथील वनौषधींचा ऱ्हास होत आहे. आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या या वनौषधींची मागणी एकीकडे वाढत असताना त्या दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. वनौषधी संवर्धनाबाबत शासन आणि कृ षी विभागाने फारशी जागरुकता न दाखवल्याने हा वनसंपत्तीचा ठेवा नष्ट होत आहे. त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील जंगली वनस्पती जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आंबा, काजू, फणस, रातांबी, जांभूळ, साग, खैर, पळस आदी वृक्षांबरोबरच अनेक दुर्मीळ झाडे येथे आढळतात. कुडा, आघाडा, बेहडा, त्रिफळा, नागकेशर, हिरडा, धोत्रा, कोरफड आदी असंख्य प्रकारच्या वनौषधी जंगली प्रदेशात आढळत आहेत. या वनौषधीपासून घरगुती औषधे बनवून त्यापासून रुग्णांवर उपचार करण्याचे काम ग्रामीण भागातील वैद्य मंडळी करत असत. अनेक असाध्य रोगांवर ही औषधे रामबाण ठरत असल्याने डॉक्टरांपेक्षाही वैद्याकडून इलाज करुन घेण्यात धन्यता मानणारे लोक आजही दिसून येतात.अ‍ॅलोपॅथीमध्येही वनौषधींचा वापर होत असल्याने त्यांना देशाबरोबर परदेशातही मागणी असते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांची असंख्य प्रकारची औषधे बाजारात येत आहेत. या सर्वांमध्ये येथील वनौषधींचा वापर झालेला असतो. काही वनौषधींचा वापर केवळ वनौषधीसाठीच होत नसून भाजीसाठीही होतो. त्यामुळे खवय्यांची गरज म्हणूनही या वनौषधींची तोड केली जाते. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीतही त्या महत्त्वपूर्ण असल्याने कंपन्यांबरोबरच महिलावर्गातही त्यांना मागणी असते.गरज भागवण्यासाठी या औषधींची केवळ तोड होत असून, लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले नाही तर या वनौषधी पूर्णपणे नामशेष होतील. त्यांच्या लागवडीसाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येत आहे. या भागात जंगलामध्ये दुर्मीळ वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, त्याचे संवर्धन होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने यात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)