शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील वनौषधी होत आहे दुर्मीळ...

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

होतोय ऱ्हास : जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे

फुणगूस : जंगलतोड आणि वाढत्या तापमानामुळे येथील वनौषधींचा ऱ्हास होत आहे. आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या या वनौषधींची मागणी एकीकडे वाढत असताना त्या दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. वनौषधी संवर्धनाबाबत शासन आणि कृ षी विभागाने फारशी जागरुकता न दाखवल्याने हा वनसंपत्तीचा ठेवा नष्ट होत आहे. त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील जंगली वनस्पती जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आंबा, काजू, फणस, रातांबी, जांभूळ, साग, खैर, पळस आदी वृक्षांबरोबरच अनेक दुर्मीळ झाडे येथे आढळतात. कुडा, आघाडा, बेहडा, त्रिफळा, नागकेशर, हिरडा, धोत्रा, कोरफड आदी असंख्य प्रकारच्या वनौषधी जंगली प्रदेशात आढळत आहेत. या वनौषधीपासून घरगुती औषधे बनवून त्यापासून रुग्णांवर उपचार करण्याचे काम ग्रामीण भागातील वैद्य मंडळी करत असत. अनेक असाध्य रोगांवर ही औषधे रामबाण ठरत असल्याने डॉक्टरांपेक्षाही वैद्याकडून इलाज करुन घेण्यात धन्यता मानणारे लोक आजही दिसून येतात.अ‍ॅलोपॅथीमध्येही वनौषधींचा वापर होत असल्याने त्यांना देशाबरोबर परदेशातही मागणी असते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांची असंख्य प्रकारची औषधे बाजारात येत आहेत. या सर्वांमध्ये येथील वनौषधींचा वापर झालेला असतो. काही वनौषधींचा वापर केवळ वनौषधीसाठीच होत नसून भाजीसाठीही होतो. त्यामुळे खवय्यांची गरज म्हणूनही या वनौषधींची तोड केली जाते. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीतही त्या महत्त्वपूर्ण असल्याने कंपन्यांबरोबरच महिलावर्गातही त्यांना मागणी असते.गरज भागवण्यासाठी या औषधींची केवळ तोड होत असून, लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले नाही तर या वनौषधी पूर्णपणे नामशेष होतील. त्यांच्या लागवडीसाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येत आहे. या भागात जंगलामध्ये दुर्मीळ वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, त्याचे संवर्धन होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने यात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)