शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

कोकणातील वनौषधी होत आहे दुर्मीळ...

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

होतोय ऱ्हास : जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे

फुणगूस : जंगलतोड आणि वाढत्या तापमानामुळे येथील वनौषधींचा ऱ्हास होत आहे. आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या या वनौषधींची मागणी एकीकडे वाढत असताना त्या दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. वनौषधी संवर्धनाबाबत शासन आणि कृ षी विभागाने फारशी जागरुकता न दाखवल्याने हा वनसंपत्तीचा ठेवा नष्ट होत आहे. त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील जंगली वनस्पती जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आंबा, काजू, फणस, रातांबी, जांभूळ, साग, खैर, पळस आदी वृक्षांबरोबरच अनेक दुर्मीळ झाडे येथे आढळतात. कुडा, आघाडा, बेहडा, त्रिफळा, नागकेशर, हिरडा, धोत्रा, कोरफड आदी असंख्य प्रकारच्या वनौषधी जंगली प्रदेशात आढळत आहेत. या वनौषधीपासून घरगुती औषधे बनवून त्यापासून रुग्णांवर उपचार करण्याचे काम ग्रामीण भागातील वैद्य मंडळी करत असत. अनेक असाध्य रोगांवर ही औषधे रामबाण ठरत असल्याने डॉक्टरांपेक्षाही वैद्याकडून इलाज करुन घेण्यात धन्यता मानणारे लोक आजही दिसून येतात.अ‍ॅलोपॅथीमध्येही वनौषधींचा वापर होत असल्याने त्यांना देशाबरोबर परदेशातही मागणी असते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांची असंख्य प्रकारची औषधे बाजारात येत आहेत. या सर्वांमध्ये येथील वनौषधींचा वापर झालेला असतो. काही वनौषधींचा वापर केवळ वनौषधीसाठीच होत नसून भाजीसाठीही होतो. त्यामुळे खवय्यांची गरज म्हणूनही या वनौषधींची तोड केली जाते. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीतही त्या महत्त्वपूर्ण असल्याने कंपन्यांबरोबरच महिलावर्गातही त्यांना मागणी असते.गरज भागवण्यासाठी या औषधींची केवळ तोड होत असून, लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले नाही तर या वनौषधी पूर्णपणे नामशेष होतील. त्यांच्या लागवडीसाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येत आहे. या भागात जंगलामध्ये दुर्मीळ वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, त्याचे संवर्धन होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने यात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)