शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता ५२ जणांना पुन्हा घर दाखवणारी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 14:33 IST

Police AshaWorker Ratnagiri-डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही क्षणिक असते. अनेकदा रागाच्या भरात किंवा काही घटनांमुळे अनेकजण आपल्या घरापासून दुरावतात. अशा दुरावलेल्यांना पुन्हा त्यांच्या घरी परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जानेवारीपासून राबवलेल्या आशा अभियानमुळे अनेकांना आधार मिळाला आहे. सन २००३पासून हरवलेल्या १८८पैकी ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देबेपत्ता ५२ जणांना पुन्हा घर दाखवणारी आशाजिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग यांची संकल्पना

तन्मय दातेरत्नागिरी : डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही क्षणिक असते. अनेकदा रागाच्या भरात किंवा काही घटनांमुळे अनेकजण आपल्या घरापासून दुरावतात. अशा दुरावलेल्यांना पुन्हा त्यांच्या घरी परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जानेवारीपासून राबवलेल्या आशा अभियानमुळे अनेकांना आधार मिळाला आहे. सन २००३पासून हरवलेल्या १८८पैकी ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात रत्नागिरीपोलिसांना यश आले आहे.अनेकदा शुल्लक कारणावरुन अनेकजण घर सोडतात किंवा काही दुर्दैवी घटनांमुळे काहींना घरापासून लांब जावे लागते. अशा अनेकांची मग फरपट होते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आयुष्यच बदलून जाते. अनेकदा अशा घटना पोलीस स्थानकामध्ये बेपत्ता म्हणून नोंदवल्या जातात तर नातेवाईक नशिबावर हवाला ठेवून हरवलेल्या आपल्या माणसांची जन्मभर वाट पाहात राहतात. पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या कार्यालयात ती एक केस म्हणून राहते. परंतु, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मात्र यामध्ये विशेष लक्ष घातले.रत्नागिरी जिल्ह्यात २००३पासून १४९ महिला तर १८ वर्षांखालील ३९ मुले-मुली हरवली होती. त्यांच्या तपासासाठी डॉ. गर्ग यांनी पुढाकार घेत १ जानेवारीपासून ७ दिवसांसाठी ह्यआशा अभियानह्णला सुरुवात केली होती. प्रत्येक पोलीस स्थानकातील कर्मचारी निवडून बेपत्ता झालेल्या महिला आणि १८ वर्षांखालील मुले-मुलींना शोधण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. हे अभियान केवळ ७ दिवसांपुरतेच मर्यादित न ठेवता, ते अद्यापपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे. या अभियानामुळे आतापर्यंत तब्बल ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी जाता आले आहे.आशामुळे आशा...डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २००३पासून बेपत्ता झालेल्या ५२ जणांना घरी परत आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये बेपत्ता झालेल्या १४९ महिलांपैकी ३४ महिला शोधण्यात पोलिसांना यश आले तर बेपत्ता झालेल्या १८ वर्षांखालील ३९ मुलांपैकी १२ मुली आणि ६ मुलांना घरी आणण्यात यश आले आहे. पोलिसांच्या आशा अभियानामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी