शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नव प्रकाशाचा आशादीप

By admin | Updated: May 24, 2017 18:15 IST

कोकण किनारा,

मनोज मुळ्येनकारात्मक घटनांचे प्रमाण वाढले असले तरी काही माणसे खूप सकारात्मक वृत्तीने पुढे जात असतात. अशा माणसांमुळेच समाज अजून टिकून आहे. त्यात रत्नागिरीतील ‘आशादीप’सारख्या संस्थेचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. दिव्यांग मुलांची निवास व्यवस्था उभी करणाऱ्या आशादीप संस्थेचे हात मात्र अजून सशक्त नाहीत. ज्या कामाचा विचारही आपण करू शकत नाही, असं काम समर्थपणे करणाऱ्या संस्थेला ताकद देण्यासाठी तरी आपण पुढाकार घ्यायला हवा...!

शारीरिक वय वाढलं, पण बौद्धिक वाढ मात्र झाली नाही, अशा दुर्दैवी मुला-मुलींच्या शिक्षणाच्या सोयी काही प्रमाणात उपलब्ध आहेत. पण या सोयींमुळे अशा मुलांची एका ठराविक वयापर्यंत तेही दिवसातले ठराविक तास काळजी घेतली जाऊ शकते. अशा मुलांचे पुढे काय? किंबहुना जोवर आई-वडील हयात आहेत, तोवर ते मायेनं, आपुलकीनं करतील. पुढे काय? अशा मुलांची आयुष्यभराची जबाबदारी कोण घेणार? मन, भावना असलेल्या या मुलांना समजून घेऊन त्यांची आयुष्यभराची देखभाल कोण करणार... असे अनेक प्रश्न ‘त्यां’ना अस्वस्थ करत होते. या अस्वस्थतेतूनच आशेचा एक किरण जन्माला आला... आशादीप. गतिमंद मुलांसाठीची निवासी संस्था. वटवृक्षासारखी वाढणारी. अत्यंत संवेदनशील अध्यक्ष दिलीप रेडकर, ऊन-पावसाची पर्वा न करता देणगीसाठी वणवण करणारे संचालक आणि आईच्या मायेनं मुलांशी वागणारे कर्मचारी या सगळ्या या वटवृक्षाच्या पारंब्या.

साधारणपणे नऊ-दहा वर्षांपूर्वी दिलीप रेडकर यांच्याशी गप्पा झाल्या. परिचय त्या आधीचा. पण त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कँटीनमध्ये भेटलेले दिलीप रेडकर काहीसे वेगळेच होते. आशादीप संस्थेचं काम तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं. या संस्थेची समाजाला गरज का आहे, हे सांगताना रेडकर यांचे डोळे पाणावले. नुसते पाणावलेच नाहीत तर घळाघळा अश्रू वाहत होते, त्यांच्या डोळ्यातून. दिव्यांग मुलांच्या शिक्षणाच्या थोड्याफार सोयी आहेत. पण त्यांच्या निवासाचं काय, हा मोठा प्रश्न आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये निवासाचा एकही उपक्रम नाही. मोठ्या शहरात असे उपक्रम आहेत, पण त्यांची वार्षिक फी सर्वसामान्यांना परवडत नाही. म्हणून आपण खटाटोप करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी म्हणून ग्रामीण भागात अशा अनेक पालकांची त्यांनी भेट घेतली. तिथले अनुभव त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात.

एका अत्यंत वयोवृद्ध जोडप्याची २० वर्षीय मुलगी दिव्यांग आहे. आई-वडील पूर्ण थकले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्याकडे उत्पन्नाचे कसलेही साधन नाही. दिव्यांग मुलगी शेजारीपाजारी धुण्या-भांड्याची कामे करते. त्यावरच त्यांचे घर चालते. अशा मुलीबाबत काही गैरकृत्य घडलं तर? थकलेले का होईना, पण आई-वडिलांचे छत्र आज आहे. उद्याचे काय? या प्रश्नांनी दिलीप रेडकर यांना हलवून टाकलं. आपल्याही अंगावर काटा येतो, हे ऐकून. पण आपण हळहळतो आणि गप्प बसतो. रेडकर गप्प बसले नाहीत. त्यांनी अशा अत्यंत गरीब मुलांनाही सामावून घेतले जाईल, असे काम उभे करण्याचा निश्चय केला. त्यासाठी डॉ. शाश्वत शेरे यांच्या रूपाने देव धावून आला आणि एमआयडीसीत जागा मिळाली, असे रेडकर आवर्जून सांगतात.‘‘आशादीप प्रज्वलीत झाला, तीन मुलांच्या उपस्थितीत. आता इथं २३ मुले आहेत. या मुलांचं आंघोळ, वेणीफणी, खाणं भरवणं सगळंच दुसऱ्यांना करावं लागतं. माझ्या कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून मला मदत केली म्हणून संस्था तग धरून उभी राहिली. अगदी तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी जीव ओतून काम करतात. त्यांना मी जे देतो, त्याला पगार म्हणतानाही लाज वाटते म्हणून मी मानधनच म्हणतो,’’ ही भावना रेडकर यांच्या मनात कायम असते.

अक्षरश: आपलं सगळं घरदार या माणसानं आशेचा दीप प्रज्वलीत राहण्यासाठी दावणीला बांधलं आहे. आपल्याजवळचं आपलं असलेलं या माणसानं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. कोणी एक रूपया दिला तरी तो संस्थेच्याच कामात खर्च होतो, इतक्या प्रामाणिकपणे ते या संस्थेसाठी काम करतात. संस्था उभी राहत नाही, तोपर्यंत देणगीदारही मिळत नाहीत. अशावेळी साथ मिळते ती सर्वसामान्य माणसांची. पण सामान्य माणसं एकाचवेळी भरपूर पैसे देऊ शकत नाहीत. म्हणून रेडकर यांनी एक कल्पना मांडली की, दरमहा १०० रूपये दिलेत तरी चालेल. आमचा संचालक येऊन पैसे घेऊन जाईल. त्यांच्या या कल्पनेला अनेक सामान्य माणसांनी प्रतिसाद दिला आणि अजूनही १०० रूपये दरमहा लोकांकडून आणण्याची प्रथा सुरू आहे. समाजात अनेक वाईट गोष्टी घडत राहतात. पण त्याचबरोबर दिलीप रेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारखे सकारात्मक काम करणारेही खूप आहेत. त्यामुळेच समाज टिकून आहे. म्हणूनच सकारात्मक कामे मार्गी लागत आहेत.

समाजात अशा अनेक संस्था आहेत, ज्यांना सरकारी मदत मिळत नाही आणि कुणा ना कुणा धडपड्या व्यक्तींनी तहानभूक विसरून केलेल्या प्रयत्नांवर त्या उभ्या राहत आहेत. इच्छा असूनही अनेकांना त्यांच्या कामात थेट मदत करता नसेल, तर त्यांना पाठबळ तरी द्यायला हवं. नुसती सहानुभूती वाटण्यापेक्षा त्यांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देण्याची अधिक गरज आहे. तुम्हा-आम्हाला न जमणारं काम करणाऱ्या हातांना उभारी देण्यासाठी, ठोस मदतीसाठी आपण सर्वांनीच पुढे येण्याची गरज आहे. स्वत:च्या उत्पन्नातला अगदी थोडासा वाटा प्रत्येकाने दिला तरी खूप काही घडेल.