शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

राष्ट्रवादी कॉँग्रेसला नवसंजीवनीची आशा

By admin | Updated: June 30, 2017 15:36 IST

रत्नागिरीत १ जुलै रोजी महामेळावा

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. ३0 : विधानसभेच्या संभाव्य मध्यावधी निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीची मोचेÊबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेला तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचा महामेळावा येत्या १ जुलै २०१७ रोजी रत्नागिरीत होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रत्नागिरीतील या मेळाव्यात विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांवर राजकीय शरसंधान साधले जाण्याची शक्यता आहे. मेळाव्यातून पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वषाÊंपासून शिवसेनेने आपले वचÊस्व निमाÊण केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही सेनेला तूल्यबळ घोडदौड जिल्ह्यात सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण या ३ विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. गुहागर व दापोली-खेड या २ विधानसभा संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला तूल्यबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जात आहे. राज्यात कॉँग्र्रेस आघाडीची सत्ता असताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद सांभाळलेले आमदार भास्कर जाधव हे मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत पक्षाच्या मेळाव्यांचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल करणाऱ्या व सध्या सेनेचे रत्नागिरीचे आमदार असलेल्या उदय सामंत यांच्यावर मेळाव्यातून जोरदार टीका सुरू केली आहे. सामंत हे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असताना रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी संघटना मजबूत होती. मात्र, सेनेत जाताना त्यांनी राष्ट्रवादीतील असंख्य नेत्या-कायÊकत्याÊंना बरोबर नेल्याने रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले. पक्षाने मंत्रीपदापासून असंख्य पदे देऊनही त्यांनी पक्षाला दगा दिल्याची टीका जाधव करीत आहेत. एकीकडे जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही प्रतिस्पधीÊ म्हणून आपले स्थान दक्षिण रत्नागिरीत निमाÊण करण्याची आवश्यकता निमाÊण झाली आहे. त्यामुळेच १ जुलै रोजी पक्षाचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घणाघाती भाषणे होणार असल्याने पक्षात नवचैतन्य निमाÊण होईल, अशी आशा राष्ट्रवादी कॉँग्रेसला वाटते आहे.