शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

राष्ट्रवादी कॉँग्रेसला नवसंजीवनीची आशा

By admin | Updated: June 30, 2017 15:36 IST

रत्नागिरीत १ जुलै रोजी महामेळावा

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. ३0 : विधानसभेच्या संभाव्य मध्यावधी निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीची मोचेÊबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेला तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचा महामेळावा येत्या १ जुलै २०१७ रोजी रत्नागिरीत होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रत्नागिरीतील या मेळाव्यात विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांवर राजकीय शरसंधान साधले जाण्याची शक्यता आहे. मेळाव्यातून पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वषाÊंपासून शिवसेनेने आपले वचÊस्व निमाÊण केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही सेनेला तूल्यबळ घोडदौड जिल्ह्यात सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण या ३ विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. गुहागर व दापोली-खेड या २ विधानसभा संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला तूल्यबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जात आहे. राज्यात कॉँग्र्रेस आघाडीची सत्ता असताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद सांभाळलेले आमदार भास्कर जाधव हे मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत पक्षाच्या मेळाव्यांचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल करणाऱ्या व सध्या सेनेचे रत्नागिरीचे आमदार असलेल्या उदय सामंत यांच्यावर मेळाव्यातून जोरदार टीका सुरू केली आहे. सामंत हे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असताना रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी संघटना मजबूत होती. मात्र, सेनेत जाताना त्यांनी राष्ट्रवादीतील असंख्य नेत्या-कायÊकत्याÊंना बरोबर नेल्याने रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले. पक्षाने मंत्रीपदापासून असंख्य पदे देऊनही त्यांनी पक्षाला दगा दिल्याची टीका जाधव करीत आहेत. एकीकडे जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही प्रतिस्पधीÊ म्हणून आपले स्थान दक्षिण रत्नागिरीत निमाÊण करण्याची आवश्यकता निमाÊण झाली आहे. त्यामुळेच १ जुलै रोजी पक्षाचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घणाघाती भाषणे होणार असल्याने पक्षात नवचैतन्य निमाÊण होईल, अशी आशा राष्ट्रवादी कॉँग्रेसला वाटते आहे.