शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राष्ट्रवादी कॉँग्रेसला नवसंजीवनीची आशा

By admin | Updated: June 30, 2017 15:36 IST

रत्नागिरीत १ जुलै रोजी महामेळावा

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. ३0 : विधानसभेच्या संभाव्य मध्यावधी निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीची मोचेÊबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेला तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचा महामेळावा येत्या १ जुलै २०१७ रोजी रत्नागिरीत होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रत्नागिरीतील या मेळाव्यात विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांवर राजकीय शरसंधान साधले जाण्याची शक्यता आहे. मेळाव्यातून पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वषाÊंपासून शिवसेनेने आपले वचÊस्व निमाÊण केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही सेनेला तूल्यबळ घोडदौड जिल्ह्यात सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण या ३ विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. गुहागर व दापोली-खेड या २ विधानसभा संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला तूल्यबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जात आहे. राज्यात कॉँग्र्रेस आघाडीची सत्ता असताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद सांभाळलेले आमदार भास्कर जाधव हे मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत पक्षाच्या मेळाव्यांचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल करणाऱ्या व सध्या सेनेचे रत्नागिरीचे आमदार असलेल्या उदय सामंत यांच्यावर मेळाव्यातून जोरदार टीका सुरू केली आहे. सामंत हे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असताना रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी संघटना मजबूत होती. मात्र, सेनेत जाताना त्यांनी राष्ट्रवादीतील असंख्य नेत्या-कायÊकत्याÊंना बरोबर नेल्याने रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले. पक्षाने मंत्रीपदापासून असंख्य पदे देऊनही त्यांनी पक्षाला दगा दिल्याची टीका जाधव करीत आहेत. एकीकडे जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही प्रतिस्पधीÊ म्हणून आपले स्थान दक्षिण रत्नागिरीत निमाÊण करण्याची आवश्यकता निमाÊण झाली आहे. त्यामुळेच १ जुलै रोजी पक्षाचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घणाघाती भाषणे होणार असल्याने पक्षात नवचैतन्य निमाÊण होईल, अशी आशा राष्ट्रवादी कॉँग्रेसला वाटते आहे.