शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घर दुरुस्तीचे प्रस्ताव यापुढे तालुकास्तरावर!

By admin | Updated: December 14, 2015 00:49 IST

योजना लागू : रत्नागिरीचा प्रादेशिक योजनेत समावेश

राजापूर : शासनाने ग्रामीण भागात भांडवली करमुक्त आकारणीचा निर्णय घेतला असताना आणि त्याबाबतची अंमलबजावणी सुरु असताना ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर घरांची बांधणी व दुरुस्ती याबाबतचे अधिकार गोठवत नगर रचनाकार विभागाच्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा प्रादेशिक योजनेत समावेश झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात ती योजना लागू झाली असून, यापुढे घर बांधणी, दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाने नियुक्त केलेल्या तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवावे लागणार आहेत. यापूर्वी ग्रामीण भागात ग्रामपातळीवर नवीन घरांची बांधणी व त्याची दुरुस्ती याला झटपट परवानगी मिळत असे. त्यामुळे परवानगीसाठी फारश्या अडचणी येत नव्हत्या. मात्र, आता शासनाने ही प्रक्रिया किचकट केली आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार यापुढे ग्रामीण भागात घरांची बांधणी व दुरुस्ती यासाठीचे परवानगी अधिकार तालुका पातळीवर तहसीलदारपदाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तसेच नगर रचनाकार यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी सुरु आहे. आता शासनाच्या धोरणानुसार गावाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमन १९६६च्या तरतुदीनुसार प्रारुप प्रादेशिक योजना किंंवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिध्द करण्यात आली असेल, अशा कुठल्याही गावात कोणीही व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६च्या कलम २च्या खंड (१०)अंतर्गत त्या गावच्या गावठाण क्षेत्रात पंचायतीची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही इमारत उभारु शकणार नाही. संबंधित गावातील गावठाण क्षेत्रातील जमिनीत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ९७ अन्वये नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय नगररचना अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्यानंतरच ग्रामपंचायतीकडून परवानगी दिली जाणार आहे. तसेच संबंधित गावच्या अन्य क्षेत्रात जिल्हाधिकारी किंंवा त्यांचे अधिकार सुपूर्द करण्यात आलेल्या तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय संबंधीत ग्रामपंचायतीकडून बांधकामाला परवानगी मिळणार नाही, असे निर्देश दण्यात आले आहेत. ही प्रादेशिक योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे.आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असून, या आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम ३९ व १४५ (१) अन्वये कारवाई करण्याचे निर्देश शासकीय पातळीवरुन देण्यात आले आहेत. याचा फटका आता ग्रामीण भागातील जनतेला बसणार आहे. कारण नवीन घरबांधणी असो वा दुरुस्ती यासाठी सहज परवानगी मिळणे यामुळे कठीण बनले आहे. (प्रतिनिधी)अधिसूचना : अपिलांची संधीनगररचना विभागाकडे पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात त्रुटी आढळल्यास विभागीय सहसंचालक, कोकण विभाग यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे. शासनाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नगररचनाकडे प्रस्तावसर्व ग्रामपंचायतींना यापुढे बांधकामाबाबत परवानगीसाठी आलेले सर्व अर्ज नगररचना विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवावे लागतील.