शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

घर दुरुस्तीचे प्रस्ताव यापुढे तालुकास्तरावर!

By admin | Updated: December 14, 2015 00:49 IST

योजना लागू : रत्नागिरीचा प्रादेशिक योजनेत समावेश

राजापूर : शासनाने ग्रामीण भागात भांडवली करमुक्त आकारणीचा निर्णय घेतला असताना आणि त्याबाबतची अंमलबजावणी सुरु असताना ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर घरांची बांधणी व दुरुस्ती याबाबतचे अधिकार गोठवत नगर रचनाकार विभागाच्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा प्रादेशिक योजनेत समावेश झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात ती योजना लागू झाली असून, यापुढे घर बांधणी, दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाने नियुक्त केलेल्या तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवावे लागणार आहेत. यापूर्वी ग्रामीण भागात ग्रामपातळीवर नवीन घरांची बांधणी व त्याची दुरुस्ती याला झटपट परवानगी मिळत असे. त्यामुळे परवानगीसाठी फारश्या अडचणी येत नव्हत्या. मात्र, आता शासनाने ही प्रक्रिया किचकट केली आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार यापुढे ग्रामीण भागात घरांची बांधणी व दुरुस्ती यासाठीचे परवानगी अधिकार तालुका पातळीवर तहसीलदारपदाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तसेच नगर रचनाकार यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी सुरु आहे. आता शासनाच्या धोरणानुसार गावाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमन १९६६च्या तरतुदीनुसार प्रारुप प्रादेशिक योजना किंंवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिध्द करण्यात आली असेल, अशा कुठल्याही गावात कोणीही व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६च्या कलम २च्या खंड (१०)अंतर्गत त्या गावच्या गावठाण क्षेत्रात पंचायतीची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही इमारत उभारु शकणार नाही. संबंधित गावातील गावठाण क्षेत्रातील जमिनीत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ९७ अन्वये नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय नगररचना अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्यानंतरच ग्रामपंचायतीकडून परवानगी दिली जाणार आहे. तसेच संबंधित गावच्या अन्य क्षेत्रात जिल्हाधिकारी किंंवा त्यांचे अधिकार सुपूर्द करण्यात आलेल्या तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय संबंधीत ग्रामपंचायतीकडून बांधकामाला परवानगी मिळणार नाही, असे निर्देश दण्यात आले आहेत. ही प्रादेशिक योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे.आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असून, या आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम ३९ व १४५ (१) अन्वये कारवाई करण्याचे निर्देश शासकीय पातळीवरुन देण्यात आले आहेत. याचा फटका आता ग्रामीण भागातील जनतेला बसणार आहे. कारण नवीन घरबांधणी असो वा दुरुस्ती यासाठी सहज परवानगी मिळणे यामुळे कठीण बनले आहे. (प्रतिनिधी)अधिसूचना : अपिलांची संधीनगररचना विभागाकडे पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात त्रुटी आढळल्यास विभागीय सहसंचालक, कोकण विभाग यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे. शासनाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नगररचनाकडे प्रस्तावसर्व ग्रामपंचायतींना यापुढे बांधकामाबाबत परवानगीसाठी आलेले सर्व अर्ज नगररचना विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवावे लागतील.