शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पळण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी मात्र..

By admin | Updated: August 17, 2014 22:34 IST

रत्नागिरी जिल्हा : किरण मोरे याचा मनसुबा अधिकाऱ्यांनी उधळला- क्राईम स्टोरी

रत्नागिरी जेलमधून पळून जाण्याचा प्लॅन सराईत चोरटा किरण मोरेने आखला. पळून जाण्याआधी दहा कैद्यांना घेऊन जाण्याचा प्लॅन फसल्याने दापोली तालुक्यातील आंबवली येथील बलात्काराची शिक्षा भोगणाऱ्या रितेश कदमला सोबत घेऊन पळाला. मात्र, अवघ्या आठ दिवसांत दापोलीचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरण मोरेच्या पत्नीवर पाळत ठेवली. त्यानंतर मोबाईलचा धागा पकडून आरोपीला पनवेल येथे नाट्यमयरित्या पकडले.किरण मोरे व रितेश कदम दोघेही वेगवेगळ्या गुन्ह्यात रत्नागिरी जेलमध्ये शिक्षा भोगत होते. तेथेच त्यांची ओळख झाली. किरण मोरे हा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी, तर रितेश कदम हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी. रितेश हा जेलमधील बारीकसारीक कामे करत होता. त्यामुळे मुख्य दरवाजाची चावी कुठे असते, याची पूर्ण कल्पना त्याला होती. चावी काढून घेऊन पळून जाण्याचा १० जणांचा बेत किरण मोरेने आखला होता. मात्र, ऐनवेळी अन्य साथीदारानी साथ न दिल्याने दोघेच पळून गेले. पळाल्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली. परंतु गुन्हेगार कितीही चलाख असला तरी नकळतपणे तो एकतरी चूक करतोच. सबूत सोडतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे किरण मोरेने पत्नीला फोन करण्याची चूक केली. ती एकच चूक महागात पडली. पत्नी व मुलांच्या काळजीने तो पत्नीला नक्की फोन करेल किंवा तिला भेटायला येईल, याची पूर्ण कल्पना पोलिसांना होती. त्यावरुन पोलिसांनी किरण मोरेच्या पत्नीवर पाळत ठेवली. पत्नी कुठे जाते, कोणाला भेटते, काय बोलते या सर्व बाबींवर पाळत ठेवून दापोली पोलीस दिवस-रात्र तिच्यावर नजर ठेवून होते. यापूर्वी किरण मोरे घराशेजारील जंगलात ७ दिवस राहून गेल्याचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले. यावरुन पोलिसांनी साध्या वेशभूषेत घराशेजारी पाळत ठेवली होती. किरण मोरेची बायको पळून जाणार नाही, यासाठी पोलीस २४ तास लक्ष ठेवून होते. २९ जुलै रोजी त्याने पत्नीला मुंबईला भेटायला बोलावले व तेथेच बेत फसला.मोबाईलवरील संभाषणामुळे पोलीस सतर्क झाले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी निवडक साथीदारांना सोबत घेतले. वारकऱ्यांच्या वेशभूषेत खेड रेल्वेने पनवेल गाठले. मोरेची पत्नी मुलांना घेऊन त्याला भेटायला गेली. पनवेल प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली. सांगितल्याप्रमाणे त्याची पत्नी बाकड्यावर जाऊन बसली. सोबत कुणी नसल्याची खात्री किरण मोरेने करुन घेतली. मात्र, पोलीस वारकऱ्याच्या वेशभूषेत दबा धरुन बसले होते. योग्य वेळेची वाट पाहात होते. पत्नी व मुलांना भेटण्याचा योग साधून किरण पुढे आला. पत्नीला भेटणार तेवढ्यात साध्या वेशातील पोलीस उदय भोसले यांना मोरे याने ओळखले व तो रेल्वे ट्रॅकवरुन पळत सुटला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन रितेश कदम पळाला. परंतु सोबत पैसे नाहीत. त्यामुळे त्याने थेट आंबवली गाठली. पनवेलमधून पळालेल्या दुसऱ्या दिवशी आंजर्ले येथे नातेवाइकांकडे राहिल्याची खबर पोलिसांना लागली. तीन दिवसांनी पोलीस निरीक्षकांनी आंबवली येथे जाऊन रितेशच्या वडिलांकडे चौकशी केली. मात्र, वडिलांनी काही माहीत नसल्याचे सांगितले. रितेश हा रत्नागिरी जेलमध्ये आहे. आपल्याला तो पळाल्याचे माहीत नाही, असे भासवले व तो संपर्कात असल्याची खात्री पटली. पोलीस निरीक्षकांनी त्याच्या घराला खिडक्या किती, दारे किती याची संपूर्ण पाहणी करुन प्लॅन आखला. तो दिवसभर जंगलात राहून रात्री घरीच झोपत असल्याचा संशय मकेश्वर यांना आला. त्यांनी एक दिवशी रात्री दोन वाजता रितेश ज्या खिडकीने आत शिरायचा व घरात झोपायचा त्या खोलीत प्रवेश केला. पोलिसांनी सर्व बाजूंनी बॅटऱ्या मारायला सुरुवात केली व त्याचा पळून जाण्याच बेत फसला. दिवसा जंगल व रात्री घरात राहून त्याने काही दिवस पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या.या मोहीमेत सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी मस्के, नवनाथ जगताप, संभाजी यादव, उदय भोसले, मंगेश शिंदे, समेल सुर्वे, शैलेश सावंत-देसाई, गीता म्हापर्ले, मंगेश शिगवण, स्वप्नील शिवलकर, अनुप पाटील, सुनील पवार, विक्रम पाटील, पांडुरंग जौरत, प्रकाश जाधव, विष्णू गिम्हवणेकर, शिवराज दिवाळे, राजू मोहिते, दिवट्या गुजर, भाऊ पाटील, सिद्धे आंब्रे सहभागी झाले होते.- शिवाजी गोरेपोलिसांची कामगिरी...किरण मोरे याने रत्नागिरी जेलमधून पळून जाण्याचा प्लॅन तयार केला. मात्र, हा प्लॅन दापोली पोलिसांनी उधळून लावला. त्याला दापोली पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पनवेल येथे पकडले. हे काम करताना त्यांनी वारकऱ्याच्या वेशात खेड रेल्वेने त्यांनी पनवेल गाठले. मोरेची पत्नी मुलांना घेऊन त्याला भेटायला गेली. पनवेल प्लॅटफार्मवर गाडी थांबली सांगितल्याप्रमाणे सारे काही घडले. मात्र, मोरे याने पोलिसांना ओळखले व तो पळून जात असताना त्याला पकडले. अशा अनेक प्रकारात त्यांनी चांगली कामगिरी करीत चोरट्यांना ताब्यात घेतले. मोबाईलच्या एका धाग्यावरून हा यशस्वी तपास करण्यात आला.