शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

महामार्गावरील वळणे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना नदीवरील पुलाच्या येथील कोंढेतडनजीकच्या वळणासारखी अनेक वळणे काढण्यात आली आहेत. मात्र, तरीही अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जात असलेली वाटूळ, नेरके येथील यू आकाराची वळणे, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणे ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास निर्धोक होण्याऐवजी भविष्यामध्ये अपघातांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या वाकेड ते तळगाव हद्दीत वाटूळ-ओणी आणि त्यानंतर हातिवलेपासून तळगावपर्यंत सुमारे ३७ किलाेमीटरच्या कामाचा समावेश आहे. यामध्ये रस्त्याच्या बहुतांश ठिकाणचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यातच, काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी ते सुरू आहे. नागमोड्या वळणांच्या असलेल्या या रस्त्याचा चालकांना अंदाज येत नसल्याने त्यातून अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातून, साऱ्यांनी उठाव करून मुंबई-गोवा महामार्गाचे चाैपदरीकरण व्हावे, अशी मागणी रेटून धरली अन् आता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

चौपदरीकरणामध्ये नागमोड्या वळणांना फाटा देण्यात आल्याने महामार्गावरील भविष्यातील अपघातांची संख्या कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. त्याप्रमाणे काही ठिकाणची नागमोडी आणि धोकादायक वळणे चौपदरीकरणाच्या कामामध्ये काढण्यातही आली आहेत. मात्र, अनेक वळणे अद्यापही जैसे थे स्थितीमध्ये आहेत ज्यांच्यामुळे भविष्यात अपघातांना निमंत्रण मिळू शकते. त्यामध्ये वाटूळ आणि नेरके येथील यू आकाराचे वळण, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणांचा समावेश आहे. यू आकाराच्या या वळणांवर गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे ही वळणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखली जातात.

...............................

मोकाट जनावरांचा प्रश्‍न

कोकणामध्ये मोकाट गुरे सोडली जातात. ही गुरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत असतात. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेगही सुसाट असणार आहे. सुसाट धावणाऱ्या एखाद्या गाडीसमोर अचानक मोकाट जनावर आडवे आल्यास त्यातून अपघात होणार आहे. त्याचाही प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.

.................................

महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये धोकादायक वळणे काढून रस्ता बहुतांश ठिकाणी सरळ केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणची धोकादायक वळणे तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चौपदरीकरणामध्ये प्रवास सुखकारक होण्याऐवजी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

- मनोहर गुरव, राजापूर