शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महामार्गावरील वळणे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना नदीवरील पुलाच्या येथील कोंढेतडनजीकच्या वळणासारखी अनेक वळणे काढण्यात आली आहेत. मात्र, तरीही अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जात असलेली वाटूळ, नेरके येथील यू आकाराची वळणे, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणे ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास निर्धोक होण्याऐवजी भविष्यामध्ये अपघातांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या वाकेड ते तळगाव हद्दीत वाटूळ-ओणी आणि त्यानंतर हातिवलेपासून तळगावपर्यंत सुमारे ३७ किलाेमीटरच्या कामाचा समावेश आहे. यामध्ये रस्त्याच्या बहुतांश ठिकाणचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यातच, काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी ते सुरू आहे. नागमोड्या वळणांच्या असलेल्या या रस्त्याचा चालकांना अंदाज येत नसल्याने त्यातून अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातून, साऱ्यांनी उठाव करून मुंबई-गोवा महामार्गाचे चाैपदरीकरण व्हावे, अशी मागणी रेटून धरली अन् आता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

चौपदरीकरणामध्ये नागमोड्या वळणांना फाटा देण्यात आल्याने महामार्गावरील भविष्यातील अपघातांची संख्या कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. त्याप्रमाणे काही ठिकाणची नागमोडी आणि धोकादायक वळणे चौपदरीकरणाच्या कामामध्ये काढण्यातही आली आहेत. मात्र, अनेक वळणे अद्यापही जैसे थे स्थितीमध्ये आहेत ज्यांच्यामुळे भविष्यात अपघातांना निमंत्रण मिळू शकते. त्यामध्ये वाटूळ आणि नेरके येथील यू आकाराचे वळण, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणांचा समावेश आहे. यू आकाराच्या या वळणांवर गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे ही वळणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखली जातात.

...............................

मोकाट जनावरांचा प्रश्‍न

कोकणामध्ये मोकाट गुरे सोडली जातात. ही गुरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत असतात. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेगही सुसाट असणार आहे. सुसाट धावणाऱ्या एखाद्या गाडीसमोर अचानक मोकाट जनावर आडवे आल्यास त्यातून अपघात होणार आहे. त्याचाही प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.

.................................

महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये धोकादायक वळणे काढून रस्ता बहुतांश ठिकाणी सरळ केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणची धोकादायक वळणे तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चौपदरीकरणामध्ये प्रवास सुखकारक होण्याऐवजी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

- मनोहर गुरव, राजापूर