शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील वळणे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना नदीवरील पुलाच्या येथील कोंढेतडनजीकच्या वळणासारखी अनेक वळणे काढण्यात आली आहेत. मात्र, तरीही अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जात असलेली वाटूळ, नेरके येथील यू आकाराची वळणे, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणे ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास निर्धोक होण्याऐवजी भविष्यामध्ये अपघातांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या वाकेड ते तळगाव हद्दीत वाटूळ-ओणी आणि त्यानंतर हातिवलेपासून तळगावपर्यंत सुमारे ३७ किलाेमीटरच्या कामाचा समावेश आहे. यामध्ये रस्त्याच्या बहुतांश ठिकाणचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यातच, काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी ते सुरू आहे. नागमोड्या वळणांच्या असलेल्या या रस्त्याचा चालकांना अंदाज येत नसल्याने त्यातून अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातून, साऱ्यांनी उठाव करून मुंबई-गोवा महामार्गाचे चाैपदरीकरण व्हावे, अशी मागणी रेटून धरली अन् आता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

चौपदरीकरणामध्ये नागमोड्या वळणांना फाटा देण्यात आल्याने महामार्गावरील भविष्यातील अपघातांची संख्या कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. त्याप्रमाणे काही ठिकाणची नागमोडी आणि धोकादायक वळणे चौपदरीकरणाच्या कामामध्ये काढण्यातही आली आहेत. मात्र, अनेक वळणे अद्यापही जैसे थे स्थितीमध्ये आहेत ज्यांच्यामुळे भविष्यात अपघातांना निमंत्रण मिळू शकते. त्यामध्ये वाटूळ आणि नेरके येथील यू आकाराचे वळण, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणांचा समावेश आहे. यू आकाराच्या या वळणांवर गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे ही वळणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखली जातात.

...............................

मोकाट जनावरांचा प्रश्‍न

कोकणामध्ये मोकाट गुरे सोडली जातात. ही गुरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत असतात. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेगही सुसाट असणार आहे. सुसाट धावणाऱ्या एखाद्या गाडीसमोर अचानक मोकाट जनावर आडवे आल्यास त्यातून अपघात होणार आहे. त्याचाही प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.

.................................

महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये धोकादायक वळणे काढून रस्ता बहुतांश ठिकाणी सरळ केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणची धोकादायक वळणे तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चौपदरीकरणामध्ये प्रवास सुखकारक होण्याऐवजी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

- मनोहर गुरव, राजापूर