शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ग्राहकही होताहेत ‘हायटेक’

By admin | Updated: December 2, 2014 00:31 IST

पारदर्शी कारभार : कोकण परिमंडलास १० कोटीचा महसूल

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी --शासकीय कारभार पारदर्शी करण्यासाठी सर्व कार्यालये संगणकीकृत करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ग्राहकवर्गही आता हायटेक होऊ लागला आहे. केवळ वीज बिल भरण्याबाबतच हा मोठा फरक लक्षात येऊ लागला आहे. तासन्तास रांगेत उभे राहण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटव्दारे बिल भरण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यातून कोकण परिमंडलास दहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.घरोघरी संगणक नसले तरी स्मार्ट फोन उपलब्ध आहेत. मोबाईलव्दारे इंटरनेटमुळे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. गेल्या पाच महिन्यांचा आढावा घेता रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९०२५९ ग्राहकांनी आॅनलाईन सेवेचा लाभ घेत १० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून ४७ हजार २१ ग्राहकांनी ६ कोटी ७१ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५३ हजार ८२४ ग्राहकांनी आॅनलाईन सेवेचा लाभ घेत ३ कोटी ३० लाख रूपये भरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा महसूल निम्मा असला तरी लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मात्र अधिक आहे.कोकण परिमंडलातून जुलै महिन्यात २१ हजार ८५९ ग्राहकांनी आॅनलाईन सेवेव्दारे २ कोटी २० लाख, आॅगस्टमध्ये २२ हजार ३२३ ग्राहकांनी २ कोटी २५ लाख, सप्टेंबरमध्ये २१ हजार ९२३ ग्राहकांनी २ कोटी ९५ लाख आॅक्टोबर महिन्यात २४ हजार १५४ ग्राहकांनी २ कोटी २१ लाख, तर २० नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून १ कोटी ४ लाख मिळून सुमारे १० कोटीचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागातून जुलै ते आॅक्टोबरअखेर १२८७३ ग्राहकांनी १ कोटी ४१ लाख ९२ हजार ५७० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे. खेड विभागातून ८७१५ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेत १ कोटी २६ लाख ४३ हजार ४०० रूपये भरले आहेत. रत्नागिरी विभागातून २५,३९४ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेत २ कोटी ६२ लाख ९७ हजार १४० रूपयांचा महसूल भरला आहे. रत्नागिरी विभागातून आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांना आवाहन ग्राहकांच्या सुविधेसाठी आॅनलाईन वीजबिल सुविधा सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील मंडळींबरोबर ज्याच्याकडे संगणक उपलब्ध नसतील त्यांना महाआॅनलाईनव्दारे वीजबिल भरणे सुलभ होणार आहे. महावितरणने रत्नागिरी जिल्ह्यात महाआॅनलाईनची (महा-ई सेवा केंद्र) ९० केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. याठिकाणी ग्राहकांना विनाशुल्क वीजबिल भरता येते. परंतु वीजबिल भरल्यानंतर महावितरणची पक्की पावती केंद्र चालकाकडून घेणे क्रमप्राप्त आहे. केंद्रचालक पावती देण्यास टाळाटाळ करीत असेल किंवा शुल्क आकारणी करीत असेल तर ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. - एस. पी. नागटिळक, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.