शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पतीच्या मजुरीला मिळाली ‘तिच्या’ घरकामाची मदत

By admin | Updated: October 9, 2016 23:37 IST

टेंभ्येतील महिलेची कहाणी : पहाटेपासूनच होतो तिचा दिवस सुरु

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी पाठोपाठच्या तीन मुली, मजूर कामामुळे पतीला मिळणारी तुटपुंजी रक्कम त्यामुळे घरातील पाच माणसांचा प्रपंच चालवणे अवघड होते. मुली अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना पुढे शिकवले पाहिजे. मात्र, एकट्या पतीच्या मोलमजुरीतून कुटुंबाची गुजराण करणे शक्य नसल्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे, या उद्देश्यातून टेंभ्येपूल येथील संपदा सुनील आग्रे यांनी मनोमन निश्चय केला व त्या घराच्या बाहेर पडल्या. रत्नागिरीत येऊन त्यांनी ओळखीतून घरकामाची काही कामे मिळवली. संसाररूपी रथाचे एक चाक पती ओढत असले तरी दुसरे चाक आपण बनले पाहिजे तरच ऐन महागाईत रथ ओढणे शक्य होईल, हे संपदा यांना पटल्यामुळेच त्या कार्यरत आहेत. संपदा यांच्या सासरचा गोतावळा मोठा आहे. परंतु प्रत्येकाची चूल वेगळी, घरात कोणीही नोकरदार नाही. सर्व मंडळी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत. स्वत:ची शेती नाही. त्यामुळे गावातील परंतु सुस्थितीतील लोकांची शेती ‘अर्धळी’ने करावयाची जेणेकरून दररोज लागणाऱ्या तांदळाची किमान गरज तरी भागते. पावसाळ्यात शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? दररोजच्या खर्चासाठी पैशांची गरज भासतेच. गावातील मजुरीच्या कामात सातत्य नसल्यामुळे शहरात येऊन काहीतरी करावं, हा निश्चय केला. संपदा स्वत: सातवीपर्यंत शिकलेल्या. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिकता आले नाही. मात्र, मुलांना शिकवायचंच हा जणू त्यांनी पण केला होता. पदरात तीन मुली, मुलगा नसल्याची खंत मात्र त्यांनी कधीच बाळगली नाही. मुलींना त्यांच्या आवडीनुसार शिकवायचं, यासाठी त्यांनी घरकामे स्वीकारली. गेली दहा वर्षे त्या घरकाम करीत आहेत. पहाटे उठून घरातील सर्व कामे आटोपून पती व मुलांचे डबे बांधून देऊन त्या सकाळच्या गाडीने रत्नागिरीत येतात. दुपारी ३ ते ३.३०पर्यंत सर्व कामे आटोपून साडेचार वाजेपर्यंत मिळेल त्या गाडीने घरी परतात. घरी गेल्यानंतर पुन्हा घरातील अन्य कामे, स्वयंपाक हे ओघाने आलेच. वर्षभर त्यांचे वेळापत्रक जणू ठरलेले. मुलींना आईच्या कष्टाची जाण आहे. शिवाय पतीचाही पाठिंबा असल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावते. गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मोठी मुलगी दहावीमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला वाणिज्य, विज्ञान शाखेकडे जायचे होते. मात्र, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अशक्य असल्याने गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच अकरावीला प्रवेश घेतला. बारावीतही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या ती शहरातील एका खासगी रूग्णालयात नोकरी करीत आहे. दोन नंबरची कन्या बारावीत, तर तीन नंबरची कन्या इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहेत. तिन्ही मुली अभ्यासात हुशार आहेत. सर्वच मुली झाल्या म्हणून नाराज न होता संपदा व सुनील आग्रे या दाम्पत्याने मुलींसाठी कष्ट उपसण्याचा चंग बांधला आहे. रत्नागिरी शहरात घरकाम करीत असताना भात पेरणी, लागवडीबरोबर कापणीसाठी लागणाऱ्या रजा याविषयी त्या आधीच परवानगी घेतात. मुली लहान असल्यापासूनच त्या घरकाम करीत आहेत. मोठ्या मुलीचे आता वर्ष, दोन वर्षात लग्न करावयाचे आहे. दोन नंबरच्या कन्येला बारावीनंतर तिच्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. धाकटी पुढच्या वर्षी दहावीत जाणार आहे. त्यामुळे पतीच्या मजुरीत थोडासा हातभार आपणही लावा, या उद्देशाने संपदा यांची अखंड वाटचाल सुरू आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे संपदा आग्रे यांनी स्वत: घरकामं करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पतीनेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यामुळे त्यांनी ओळखीतून घरकामं मिळवली. त्यातूनच त्यांच्या हातात थोेडेफार का होईना; परंतु पैसे येऊ लागले. आपल्याला शिकता आलं नाही; परंतु मुलीतरी खूप शिकल्या पाहिजेत, या धडपडीने त्यांची वाटचाल सुरु आहे.