शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

मुसळधार पावसाने जिल्ह्यात हानी

By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST

घरे-गोठ्यांची पडझड : गुहागर एस. टी. स्थानकात पाणीच पाणी; पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी : शुक्रवारपासून संततधारेने सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरे, गोठ्यांची पडझड झाली आहे. रत्नागिरीनजीकच्या मुरुगवाडा येथील एका घराजवळील खड्डा पावसाने मोठा होत गेला असून या घराला धोका निर्माण झाला आहे. तसेच गुहागर येथे एस. टी. स्थानक परिसराला तलावाचेच रूप आले आहे. खेड येथे दरड कोसळल्याने माती मार्गावर आली आहे. गुरुवार रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारीही दिवसभरात अनेकवेळा जोरदार सरी कोसळल्या. रात्रीपासून पुन्हा पावसाला अधिकच जोर आला. शनिवारीही सकाळपासूनच संततधार सुरूच होती. दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मुरुगवाडा येथील सागर शिरधनकर यांच्या घराशेजारी खड्डा पडला असून, या पावसाने तो मोठा होत गेला आहे. त्यामुळे या घराला धोका निर्माण झाला आहे. चिपळूण तालुक्यातील विल्ये येथील दीपक भुवड यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे, तर डॉ. केळकर यांच्या घराभोवतालची संरक्षक भिंत कोसळली आहे. कोझरवाडी येथील बाळ नाके यांच्या घराच्या पडवीवर नारळाचे झाड पडल्याने नुकसान झाले आहे. गुहागर शहरात पाणी भरले असून एस. टी. व त्यासमोरील रस्त्याला चक्क तलावाचेच रूप आले आहे. गुहागर-चिखली-कारूळ रस्त्यावरील दोन ठिकाणी मोरी खचल्या आहेत. तसेच पालपेणे-साखरी-त्रिशुळ मार्गावरील मोरी ढासळली आहे. काजुर्ली येथील प्रमिला मोहिते यांच्या घरावर फांदी पडल्याने कौले फुटून ४५५० रुपयांचे नुकसान झाले आहे. साखरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ ची कंपाऊंड वॉल कोसळून २९,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड येथे सकाळी दरड कोसळल्याने माती रस्त्यावर आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने ही माती दूर हटवली. दापोली तालुक्यातील हर्णे येथील रमाकांत कवळे तसेच सुनंदा बोरकर यांच्या घरांचे अंशत: २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नथुराम वैद्य यांच्या घराच्या कुंपणाची भिंत कोसळून १ लाख ५ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. गव्हे येथे आग्रे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यातही या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. भिंगळोली येथील मनीषा चव्हाण यांच्या घराचे १४,८५० रुपयांचे नुकसान झाले आहे. घरावरील सिमेंटचे पत्रे फुटले असून, दरवाजा मोडला आहे. मधुकर मर्चंडे यांच्या घरावर बांध कोसळला असून सिमेंटचे पत्रे, कौले फुटली आहेत. पालघर येथील चंद्रकांत तपकिरी यांचे कंपाऊंड अंशत: कोसळल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी येथील रुक्मिणी वाडकर (३६ हजार), सुरेंद्र वाडकर (८ हजार ३00), ममता वाडकर (८ हजार) आणि सरिता सुतार (१ हजार ३00) यांच्या घराचे नुकसान झाले आहे. राजापूर बाजारपेठमधील वरची वाडी येथील बाळकृष्ण खडपे यांची पडवी कोसळल्याने ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या २४ तासात जिल्ह्यात दापोलीत सर्वाधिक पाऊस (१७३ मिलीमीटर) पडल्याची नोंद असून त्याखालोखाल मंडणगड (१५६ मिलीमीटर ) व गुहागरमध्ये (११४ मिलीमीटर) पाऊस पडला आहे. चिपळूण (७२ मिलीमीटर), रत्नागिरीत (७९ मिलीमीटर) मध्यम, तर संगमेश्वर (३३ मिलीमीटर), लांजा (३१ मिलीमीटर) आणि राजापूरमध्ये (३८ मिलीमीटर) कमी पाऊस पडल्याची नोंद आहे. पुन्हा मुुसळधार? येत्या ४८ तासांत काही ठिकाणी ७ ते २० सेंटीमीटर्सपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.