शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:08 IST

अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. शनिवारी सुमारे दीड तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चिपळूण रेल्वेस्थानकावरही शेकडो प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. दुपारी दीड वाजताचे सुमारास धीम्यागतीने रेल्वे वाहतूक सुरू झाली.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा कोकण रेल्वेलाही फटकावाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

चिपळूण : अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. शनिवारी सुमारे दीड तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चिपळूण रेल्वेस्थानकावरही शेकडो प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. दुपारी दीड वाजताचे सुमारास धीम्यागतीने रेल्वे वाहतूक सुरू झाली.पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी रात्रीपासून ढगफुटीसारखा पाऊस पडला. या पावसाने सर्वच यंत्रणेला तडाखा दिला. मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता तर दुसऱ्या बाजूला कोकण रेल्वेलादेखील याचा फटका बसला. रेल्वेमार्गावर वीर-माणगाव दरम्यान घोडनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार गाड्या यामुळे थांबविण्यात आल्या होत्या.रत्नागिरी - दादर पॅसेंजर गाडी वीर स्थानकावर थांबविण्यात आली होती. तर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली होती. त्याचप्रमाणे एर्नाकुुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस गाडी करंजाडी येथे तर मांडवी एक्स्प्रेस गाडी रोहा येथे थांबविण्यात आली होती.

त्यामुळे कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळपत्रक कोलमडले. रेल्वे वाहतूक लवकर सुरू व्हावी यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत होते. अखेर मार्गावरील पाणी ओसरल्याने रेल्वेच्या पथकाने पाहणी केल्यानंतर वाहतूक धिम्यागतीने सुरु करण्यात आली.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी