शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाखाड्यांच्या कामांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:50 IST

गुहागर नगरपंचायत : शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक काँक्रीटचा अभाव

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने आपल्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांची कामे केली जात आहेत. मात्र, एकाच वेळी सर्व कामांवर लक्ष ठेवणे म्हणजे जिकरीचे बनले आहे. परिणामी शहरातील कीर्तनवाडी मुख्य रस्ता ते गोविंद साटले घरापर्यंतच्या पाखाडीच्या कामात आवश्यक जाडीचा काँक्रीटचा थर टाकण्यात आला नसल्याची बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आली आहे, अशा तकलादू कामांमुळे सध्या नगरपंचायत त्रस्त झाली आहे.गुहागर शहरातील कीर्तनवाडी मुख्य रस्ता ते गोविंद साटले घर अशी रस्ता अनुदानातून २ मीटर रूंद व ६० मीटर लांबीच्या पाखाडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पाखाडीसाठी सुमारे २ लाख ८३ हजार इतका निधी उपलब्ध असून, हे काम मोहन पवार यांनी केले आहे. या कामामध्ये प्रथम तीन इंचाचा काँक्रीट थर टाकून त्यावर जांभा दगड असे एस्टिमेंट आहे. प्रत्यक्षात कमी जाडीचा काँक्रीटचा थर टाकून त्यावर जांभा दगड बसवला. त्यामुळे जांभा दगड समांतर रेषेत दिसत नव्हता, म्हणून त्यावर रेती, ग्रीट व सिमेंट मिसळून पाखाडीवर टाकण्यात आले. जांभ्या दगडाच्या खालच्या बाजुच्या काँक्रीटची जाडी आवश्यक प्रमाणात न घेता दगडावर माल काढून ती जाडी दाखवण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे.याबाबत नगरपंचायतीकडे विचारणा केली असता दगडाच्या खाली तीन इंच जाडीचा खडी, रेती मिक्स काँक्रीट थर नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे बिल काढले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, अशा प्रकारच्या निकृष्ट कामामुळे नगरपंचायतच त्रस्त झाली असून, खरोखरच हे काम किती टिकेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे, अशा कंत्राटदारांना यापुढे कामे देताना नगरपंचायतीने विचार करावा, असेही बोलले जात आहे. दरम्यान, या कामाबाबत मुख्याधिकारी प्रसाद शिंंगटे यांच्याजवळ विचारणा केली असता पाखाडीखाली तीन इंच जाडीचा काँक्रीट टाकला नसेल तर त्याप्रमाणे या कामाचे पेमेंट देण्यात येईल. तसेच दगडावर टाकलेला रेतीमाल हा आपल्यालाही पसंत नसल्याची कबुली दिली आहे. दिलेल्या एस्टिमेटप्रमाणे कामे होत नसतील तर खरोखरच विकासकामे दर्जेदार होतात का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)विकासकामांना गती : दर्जा ढासळलागुहागर नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यानंतर याठिकाणी विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. नगरपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांचा दर्जा राखला जात नसल्याने निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.