शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

पाखाड्यांच्या कामांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:50 IST

गुहागर नगरपंचायत : शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक काँक्रीटचा अभाव

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने आपल्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांची कामे केली जात आहेत. मात्र, एकाच वेळी सर्व कामांवर लक्ष ठेवणे म्हणजे जिकरीचे बनले आहे. परिणामी शहरातील कीर्तनवाडी मुख्य रस्ता ते गोविंद साटले घरापर्यंतच्या पाखाडीच्या कामात आवश्यक जाडीचा काँक्रीटचा थर टाकण्यात आला नसल्याची बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आली आहे, अशा तकलादू कामांमुळे सध्या नगरपंचायत त्रस्त झाली आहे.गुहागर शहरातील कीर्तनवाडी मुख्य रस्ता ते गोविंद साटले घर अशी रस्ता अनुदानातून २ मीटर रूंद व ६० मीटर लांबीच्या पाखाडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पाखाडीसाठी सुमारे २ लाख ८३ हजार इतका निधी उपलब्ध असून, हे काम मोहन पवार यांनी केले आहे. या कामामध्ये प्रथम तीन इंचाचा काँक्रीट थर टाकून त्यावर जांभा दगड असे एस्टिमेंट आहे. प्रत्यक्षात कमी जाडीचा काँक्रीटचा थर टाकून त्यावर जांभा दगड बसवला. त्यामुळे जांभा दगड समांतर रेषेत दिसत नव्हता, म्हणून त्यावर रेती, ग्रीट व सिमेंट मिसळून पाखाडीवर टाकण्यात आले. जांभ्या दगडाच्या खालच्या बाजुच्या काँक्रीटची जाडी आवश्यक प्रमाणात न घेता दगडावर माल काढून ती जाडी दाखवण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे.याबाबत नगरपंचायतीकडे विचारणा केली असता दगडाच्या खाली तीन इंच जाडीचा खडी, रेती मिक्स काँक्रीट थर नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे बिल काढले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, अशा प्रकारच्या निकृष्ट कामामुळे नगरपंचायतच त्रस्त झाली असून, खरोखरच हे काम किती टिकेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे, अशा कंत्राटदारांना यापुढे कामे देताना नगरपंचायतीने विचार करावा, असेही बोलले जात आहे. दरम्यान, या कामाबाबत मुख्याधिकारी प्रसाद शिंंगटे यांच्याजवळ विचारणा केली असता पाखाडीखाली तीन इंच जाडीचा काँक्रीट टाकला नसेल तर त्याप्रमाणे या कामाचे पेमेंट देण्यात येईल. तसेच दगडावर टाकलेला रेतीमाल हा आपल्यालाही पसंत नसल्याची कबुली दिली आहे. दिलेल्या एस्टिमेटप्रमाणे कामे होत नसतील तर खरोखरच विकासकामे दर्जेदार होतात का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)विकासकामांना गती : दर्जा ढासळलागुहागर नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यानंतर याठिकाणी विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. नगरपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांचा दर्जा राखला जात नसल्याने निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.